शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
4
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
5
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
6
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
7
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
8
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
10
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
11
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
12
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
13
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
14
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
16
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
17
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
18
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
19
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 
20
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

पेरणीपूर्वही काढता येणार पीक विमा

By admin | Updated: June 28, 2014 23:21 IST

हवामानावर आधारित पीक विमा योजना ही जिल्ह्यातील खरीपाच्या सोयाबीन, कपाशी, मूग व उडीद पिकासाठी लागू करण्यात आली. अपुरा पाऊस, पावसातील खंड, अती पाऊस या तीन हवामान घटकाच्या

मुदत ३० जून : पीक बदल झाल्यास कळवावी लागणार माहितीअमरावती : हवामानावर आधारित पीक विमा योजना ही जिल्ह्यातील खरीपाच्या सोयाबीन, कपाशी, मूग व उडीद पिकासाठी लागू करण्यात आली. अपुरा पाऊस, पावसातील खंड, अती पाऊस या तीन हवामान घटकाच्या धोक्यापासून शेती पिकाला संरक्षण मिळते. जिल्ह्यात खरीपाच्या पेरणी आता सुरवात होत असताना पीक विम्याची मुदत ३० जून २०१४ संपत आहे. या पार्श्वभूमिवर पेरणीपूर्व देखील पीक विमा काढता येऊ शकतो. मात्र पेरणीपश्चात पीक बदल झाल्यास शेतकऱ्यांना या बदलाची माहिती शेतकऱ्यांना बँकेला व कृषी विभागाला कळवावी लागणार आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ ४५ मि. मी. पाऊस झालेला आहे. खऱ्या अर्थाने पेरणीला शुक्रवारपासून सुरवात झाली आहे. कपाशी पिकासाठी १० जून ते १० जुलै दरम्यान ८० मि. मी. पेक्षा कमी पाऊस झाल्यास प्रत्येक १० मि. मी. करीता २७५ रूपये आहे याची नुकसान भरपाई २२०० प्रति हेक्टरपर्यंत मिळू शकते. यामध्ये ८८० रूपये प्रति एकर अशी मर्यादा सिमीत करण्यात आली आहे. हवामानावर आधारित पीक विमा योजनेचा महत्वाचा ट्रिगर कमी पर्जन्यमान आहे. २५ जून ते ३१ आॅक्टोबर दरम्यान पर्जन्यमान तसेच पावसातील खंड यावर पीक विम्याचे संरक्षण आधारित आहे. सोयाबीन पिकासाठी २० जून ते ५ जुलै दरम्यान ८० मि.मी. पेक्षा कमी पाऊस पडल्यास १४०० रूपयेपर्यंत प्रति हेक्टर नुकसान भरपाई मिळू शकते. ही मर्यादा एकरी ५६० रूपयेपर्यंत आहे. २० जून ते १५ आॅक्टोबरपर्यंत पिकाला संरक्षण मिळू शकते. या कालावधीत अति पाऊस किंवा पावसामध्ये खंड पडल्यास प्रति एकर ३०० रूपये प्रति हेक्टरी ७५०० रूपये विम्याचे संरक्षण मिळू शकते. योजनेत सहभागी होण्यासाठी लाभार्थ्याने विमा हप्ता शेतकरी पुरावा म्हणून ७/१२ उताऱ्यासह अर्जासोबत बँकेत विमा हप्ता भरणे गरजेचे आहे. सोमवार दि. ३० ला संपणार मुदतजिल्ह्यात पथदर्शी स्वरुपात राबविण्यात येणाऱ्या हवामानावर आधारित पीक विम्याची मुदत सोमवार दि. ३० जूनला संपत आहे. जिल्ह्यात पेरणीला सुरुवात होत असतानाच मुदत संपत असल्याने शेतकऱ्यात संभ्रम निर्माण झाला होता परंतु पेरणीपूर्वीही पीक विमा काढता येतो परंतु पेरणी पश्चात पीक बदल झाल्यास याची माहिती कृषी विभागासह बँकेला कळवावी लागणार आहे. योजनेला मिळू शकते मुदतवाढखरीप २०१४ हंगामासाठी हवामानावर आधारित पीक विमा योजनेची मुदत ३० जूनला संपत आहे. जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाचा खंड पडल्यामुळे खरीपाच्या कपाशी, सोयाबीन, मूग व उडीद पिकाची लागवड झालेली नाही. यासाठी कृषी विभागाद्वारा १५ जुलै २०१४ पर्यंत योजनेला मुदतवाढ मागितलेली आहे. कृषी आयुक्त कार्यालये प्रस्ताव पाठविण्यात असल्याने कृषी विभागाने सांगितले. तुर्तास या हवामानावर आधारित पीक विमा योजनेला मुदतवाढ मिळालेली नाही. (प्रतिनिधी)