शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
3
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
4
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
5
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
6
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
7
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
8
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
9
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
10
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
11
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
12
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
13
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
14
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
15
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
16
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
17
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
18
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
19
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
20
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

प्रवीण पोटेंच्या संकल्पनेचा राज्यभरात उमटणार ठसा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2016 00:02 IST

शेतामध्ये जाणारे रस्ते वर्षानुवर्षे नादुरुस्त, रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वाढलेले अतिक्रमण यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या न्यायालयापर्यंत जातात.

अमरावती : शेतामध्ये जाणारे रस्ते वर्षानुवर्षे नादुरुस्त, रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वाढलेले अतिक्रमण यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या न्यायालयापर्यंत जातात. आता या समस्या निकाली निघणार आहेत. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी जिल्ह्यासाठी राबविलेली ‘पालकमंत्री रस्ते विकास योजने’ची संकल्पना मुख्यमंत्र्यांना आवडली. त्यांनी या योजनेला लाभलेल्या लोकसहभागाची माहिती जाणून घेऊन ही योजना राज्यात राबविण्याचे सुतोवाच केले होते. शुक्रवारी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या योजनेसाठी १०० कोटींची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांची ‘लाईफ लाईन’ असणाऱ्या वहिवाटीचे पाणंद रस्त्यांच्या विकासाची ना.प्रवीण पोटे यांची संकल्पना आता राज्यात साकार होत आहे. लोकसहभाग व एमआईजीएस या माध्यमातून जिल्ह्यात अल्पावधीत दीड हजारावर पाणंद रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला होता. हीच योजना आता राज्यात ‘पालकमंत्री पाणंद रस्ते जेसीबी मशीन खरेदी योजना’ या नावाने साकारली जात आहे. शेतांमधील वर्षानुवर्षे अतिक्रमणात असलेल्या नादुरुस्त पाणंद रस्त्यांची दुरूस्ती तसेच जलयुक्त शिवार योजनेतील कामांसाठी जेसीबी मशीन खरेदी करण्यात येणार आहे. योजनेंतर्गत बेरोजगार युवकांना जेसीबी खरेदीसाठी राष्ट्रीयीकृत बॅँकांमार्फत कर्ज देण्यात येणार आहे. युवकांनी घेतलेल्या बॅँकाच्या कर्जाची हमी आता राज्य शासन घेणार आहे. यासाठी १०० कोटींची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. (प्रतिनिधी)‘पालकमंत्री पांदण रस्ते योजने’साठी अर्थसंकल्पात १०० कोटींची तरतूद शेतकऱ्यांच्या वहिवाटीसाठी व शेतमाल घरापर्यंत तसेच बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्यामध्ये पाणंद रस्त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे ३० फूट रुंदीचे पाणंद रस्ते दुतर्फा बुजले होते. शेतकऱ्यांनीदेखील रस्त्यावर अतिक्रमण तसेच नांगरणी करून हे रस्ते वाहितीत घेतले होते. या रस्त्याने ये-जा करणे कठीण झाल्याचे हेरून ना. प्रवीण पोटे यांनी जुन्याच योजनेला जिल्ह्यात ‘पालकमंत्री पाणंद रस्ते विकास योजना’ असे नवे स्वरुप दिले. यासाठी त्यांनी जिल्ह्यात महसूल अधिकारी, कर्मचारी व तलाठ्यांची कार्यशाळा घेतली. त्यांना संकल्पना समजावून सांगितली. प्रत्येक तलाठ्याला त्यांच्या कार्यक्षेत्रात ५ पाणंद रस्त्यांचे ‘टार्गेट’ दिले. प्रसंगी ना.पोटे यांनी शेतकऱ्यांचे समुपदेशन करून स्वत: त्यांचे राजीनामे घेतले. यात लोकसहभाग असल्याने लोकांना या योजनेविषयी जिव्हाळा निर्माण झाला. परिणामी अल्पावधीत यंत्रणा, अधिकारी व नागरिकांच्या समन्वयातून हजारो किलोमीटरच्या पाणंद रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. जिल्ह्यातील यशस्वी, लोकाभिमुख अभियानाचा ठसा आता राज्यात उमटणार आहे. दुष्काळ, नैसर्गिक संकटामुळे हवालदिल शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून खऱ्या अर्थाने बळीराजाला समर्पित असा हा लोकाभिमुख अर्थसंकल्प आहे. शासनाने पायाभिमुख सुविधांना प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यात आपण राबविलेली ‘पालकमंत्री पाणंद विकास योजना’ आता राज्यासाठी राबविण्यात येत आहे. यासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. - प्रवीण पोटे, पालकमंत्री, अमरावती