शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

अन् मदतीअभावी तडफडत ‘त्यांनी’ सोडले प्राण !

By admin | Updated: November 19, 2015 00:42 IST

दुचाकीने जाताना अपघात झाला. रक्ताच्या थारोळ्यात तिघे पडलेले. बघ्यांची गर्दी जमलेली. जो-तो हळहळतो.

माणुसकी उरलीय कोठे? : मुलीच्या आक्रोशानेही द्रवले नाही बघ्यांचे हृदय संदीप मानकर अमरावतीदुचाकीने जाताना अपघात झाला. रक्ताच्या थारोळ्यात तिघे पडलेले. बघ्यांची गर्दी जमलेली. जो-तो हळहळतो. कुणी थांबलेला तर कुणी बघून पुढे निघून गेलेला. अपघाताची वार्ता कळताच एका जखमीची मुलगी पोलिसांच्या आधी घटनास्थळी पोहोचली. वडिलांची रक्तबंबाळ अवस्था बघून तिने मदतीसाठी आक्रोश सुरू केला. प्रत्येकाजवळ विनवणी करून पित्याचे प्राण वाचविण्याचे साकडे घातले. मात्र, तेथे जमलेल्यांपैकी कोणालाही पाझर फुटला नाही. शेवटी त्या मुलीला तिच्या पित्याला गमवावे लागले. या हृदयद्रावक घटनेनंतर कुठे गेलीय माणुसकी, हा प्रश्न मात्र प्रकर्षाने बोचू लागला आहे. मंगळवारी दुपारी पाऊण वाजताची वेळ होती. एक गृहस्थ खोलापूरवरुन अमरावतीकडे दुचाकीने जात असताना झांजी या गावाजवळ विरुध्द दिशेने येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. भर रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात चौघे जण पडले. त्यातील दोघांच्या डोक्याला गंभीर तर एकाच्या नाकाला गंभीर इजा झाली. तर एक जण किरकोळ जखमी झाला. सर्वप्रथम अमरावती येथील एका सामाजिक कार्यात रस असलेल्या तरूणीला हा अपघात दिसून आला. तिने दुचाकी थांबवून इतरांच्या मदतीने अपघातग्रस्तांच्या भ्रमणध्वनीवरुन त्यांच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती दिली. इतकेच नव्हे तर त्या मार्गाने ये-जा करणारी वाहने थांबवून अपघातातील जखमींना रूग्णालयात नेण्यासाठी आर्जवदेखील केले. पण, पोलिसांच्या पुढच्या ससेमिऱ्याच्या धास्तीने कोणीही मदतीचा उदारपणा दाखविला नाही. पश्चात या अपघातात मरण पावलेले खोलापूर येथील बाबाराव रावळे यांच्या कुटुंबाला अपघाताची माहिती देण्यात आली. थोड्या वेळाने घटनास्थळी एका वृत्तपत्राचे प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्तेदेखील पोहोचले. त्यांनी प्रथम खोलापूर पोलिसांना सूचना देऊन आरोग्य विभागाच्या १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेला पाचारण केले. परंतु ही रूग्णवाहिका भातकुलीवरुन झांझी येथे पोहोचेपर्यंत बराच वेळ उलटून गेला होता.पाऊण तास चालली मदतीची याचनाअमरावती : पोलीसही सूचना मिळाल्यानंतर तब्बल अर्ध्या तासाने घटनास्थळी पोहोचले. वाहन उपलब्ध नसल्यामुळे उशीर झाला, असे एका पोलिसाने खासगीत सांगितले.विशेष म्हणजे, पोलीस पोहोचण्यापूर्वी मृत बाबाराव रावळे यांची मुलगी माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचली होती.वडिलांची रक्तबंबाळ अवस्था बघून हादरलेल्या या मुलीचा मदतीसाठी गोंधळ सुरू होता. बघ्यांना ती मदतीची मागणी करीत होती. वडिलांना इस्पितळात नेण्यासाठी ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसोर हात जोडत होती. परंतु कोणालाच पाझर फुटत नव्हता. अपघातस्थळी अनेकांची गर्दी होती. त्यात स्वत:ला समाजसेवी म्हणविणारे होते, कथित राजकीय नेते होते तर सर्वसामान्य जनताही होती. मात्र, पोलिसांची भानगड नको म्हणून कोणीही अपघातग्रस्तांची मदत केली नाही. शेवटी अपघातग्रस्तांचे प्राण वाचलेच नाहीत.या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. संवेदनशील मने अंतर्मुख करणारी ही घटना आहे. माणुसकी कुठे हरवलीय, हा प्रश्न देखील यामुळे निर्माण झाला आहे. अमरावती विभागात दोन वर्षात अपघातात १५०० पेक्षा अधिक नागरिकांचे प्राण गेलेत. अपघातग्रस्तांना मदत केल्यानंतर पोलिसांकडून चौकशा सुरू होतात. मदत करणाऱ्यालाच चौकशांना सामोरे जावे लागते. असे अनेकांना वाईट अनुभव असल्याने लोक अपघातग्रस्तांना मदत करण्यास धजावत नाहीत, हे वास्तव आहे. मात्र, समाजाता रूजत असलेली ही भावना चुकीची आहे. त्रयस्थांचा अपघात कोरड्या नजरांनी पाहणारे आपण आपल्या आप्तस्वकियांच्या मदतीसाठी मात्र धावपळ करतो. हिच भावना इतरांसाठीही ठेवल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात. या अपघातातही जखमींना वेळीच मदत मिळाली असती तर बाबाराव रावळे (खोलापूर) व सीताराम खडसे (बुधागड) यांचे प्राण वाचू शकले असते, हे नक्की.