शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

अन् मदतीअभावी तडफडत ‘त्यांनी’ सोडले प्राण !

By admin | Updated: November 19, 2015 00:42 IST

दुचाकीने जाताना अपघात झाला. रक्ताच्या थारोळ्यात तिघे पडलेले. बघ्यांची गर्दी जमलेली. जो-तो हळहळतो.

माणुसकी उरलीय कोठे? : मुलीच्या आक्रोशानेही द्रवले नाही बघ्यांचे हृदय संदीप मानकर अमरावतीदुचाकीने जाताना अपघात झाला. रक्ताच्या थारोळ्यात तिघे पडलेले. बघ्यांची गर्दी जमलेली. जो-तो हळहळतो. कुणी थांबलेला तर कुणी बघून पुढे निघून गेलेला. अपघाताची वार्ता कळताच एका जखमीची मुलगी पोलिसांच्या आधी घटनास्थळी पोहोचली. वडिलांची रक्तबंबाळ अवस्था बघून तिने मदतीसाठी आक्रोश सुरू केला. प्रत्येकाजवळ विनवणी करून पित्याचे प्राण वाचविण्याचे साकडे घातले. मात्र, तेथे जमलेल्यांपैकी कोणालाही पाझर फुटला नाही. शेवटी त्या मुलीला तिच्या पित्याला गमवावे लागले. या हृदयद्रावक घटनेनंतर कुठे गेलीय माणुसकी, हा प्रश्न मात्र प्रकर्षाने बोचू लागला आहे. मंगळवारी दुपारी पाऊण वाजताची वेळ होती. एक गृहस्थ खोलापूरवरुन अमरावतीकडे दुचाकीने जात असताना झांजी या गावाजवळ विरुध्द दिशेने येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. भर रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात चौघे जण पडले. त्यातील दोघांच्या डोक्याला गंभीर तर एकाच्या नाकाला गंभीर इजा झाली. तर एक जण किरकोळ जखमी झाला. सर्वप्रथम अमरावती येथील एका सामाजिक कार्यात रस असलेल्या तरूणीला हा अपघात दिसून आला. तिने दुचाकी थांबवून इतरांच्या मदतीने अपघातग्रस्तांच्या भ्रमणध्वनीवरुन त्यांच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती दिली. इतकेच नव्हे तर त्या मार्गाने ये-जा करणारी वाहने थांबवून अपघातातील जखमींना रूग्णालयात नेण्यासाठी आर्जवदेखील केले. पण, पोलिसांच्या पुढच्या ससेमिऱ्याच्या धास्तीने कोणीही मदतीचा उदारपणा दाखविला नाही. पश्चात या अपघातात मरण पावलेले खोलापूर येथील बाबाराव रावळे यांच्या कुटुंबाला अपघाताची माहिती देण्यात आली. थोड्या वेळाने घटनास्थळी एका वृत्तपत्राचे प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्तेदेखील पोहोचले. त्यांनी प्रथम खोलापूर पोलिसांना सूचना देऊन आरोग्य विभागाच्या १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेला पाचारण केले. परंतु ही रूग्णवाहिका भातकुलीवरुन झांझी येथे पोहोचेपर्यंत बराच वेळ उलटून गेला होता.पाऊण तास चालली मदतीची याचनाअमरावती : पोलीसही सूचना मिळाल्यानंतर तब्बल अर्ध्या तासाने घटनास्थळी पोहोचले. वाहन उपलब्ध नसल्यामुळे उशीर झाला, असे एका पोलिसाने खासगीत सांगितले.विशेष म्हणजे, पोलीस पोहोचण्यापूर्वी मृत बाबाराव रावळे यांची मुलगी माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचली होती.वडिलांची रक्तबंबाळ अवस्था बघून हादरलेल्या या मुलीचा मदतीसाठी गोंधळ सुरू होता. बघ्यांना ती मदतीची मागणी करीत होती. वडिलांना इस्पितळात नेण्यासाठी ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसोर हात जोडत होती. परंतु कोणालाच पाझर फुटत नव्हता. अपघातस्थळी अनेकांची गर्दी होती. त्यात स्वत:ला समाजसेवी म्हणविणारे होते, कथित राजकीय नेते होते तर सर्वसामान्य जनताही होती. मात्र, पोलिसांची भानगड नको म्हणून कोणीही अपघातग्रस्तांची मदत केली नाही. शेवटी अपघातग्रस्तांचे प्राण वाचलेच नाहीत.या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. संवेदनशील मने अंतर्मुख करणारी ही घटना आहे. माणुसकी कुठे हरवलीय, हा प्रश्न देखील यामुळे निर्माण झाला आहे. अमरावती विभागात दोन वर्षात अपघातात १५०० पेक्षा अधिक नागरिकांचे प्राण गेलेत. अपघातग्रस्तांना मदत केल्यानंतर पोलिसांकडून चौकशा सुरू होतात. मदत करणाऱ्यालाच चौकशांना सामोरे जावे लागते. असे अनेकांना वाईट अनुभव असल्याने लोक अपघातग्रस्तांना मदत करण्यास धजावत नाहीत, हे वास्तव आहे. मात्र, समाजाता रूजत असलेली ही भावना चुकीची आहे. त्रयस्थांचा अपघात कोरड्या नजरांनी पाहणारे आपण आपल्या आप्तस्वकियांच्या मदतीसाठी मात्र धावपळ करतो. हिच भावना इतरांसाठीही ठेवल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात. या अपघातातही जखमींना वेळीच मदत मिळाली असती तर बाबाराव रावळे (खोलापूर) व सीताराम खडसे (बुधागड) यांचे प्राण वाचू शकले असते, हे नक्की.