शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सत्ता हे सेवेचे साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 22:43 IST

सत्ता हे सेवेचे साधन आहे व याच विचाराने केंद्र अन् राज्यातील सरकार काम करीत आहे. देशातील सरकार परिवर्तनशील असल्याने शेवटच्या टोकावरील माणसाचे परिवर्तन झाले पाहिजे, हाच प्रयत्न होत आहे. यासाठीच देशात नरेंद्र मोदी सरकारने मूलभूत परिवर्तनाच्या योजना दिल्याची ग्वाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिली.

ठळक मुद्देमुख्यमंत्री : विभागाच्या भाजप मेळाव्यात कार्यकर्त्यांना कानमंत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सत्ता हे सेवेचे साधन आहे व याच विचाराने केंद्र अन् राज्यातील सरकार काम करीत आहे. देशातील सरकार परिवर्तनशील असल्याने शेवटच्या टोकावरील माणसाचे परिवर्तन झाले पाहिजे, हाच प्रयत्न होत आहे. यासाठीच देशात नरेंद्र मोदी सरकारने मूलभूत परिवर्तनाच्या योजना दिल्याची ग्वाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिली.येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित ‘चलो लक्ष्य की ओर’ या भाजपच्या विभागीय मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष व खासदार रावसाहेब दानवे, पालकमंत्री प्रवीण पोटे, ना. रणजित पाटील, खा.संजय धोत्रे, खा.रामदास तडस, संघटनमंत्री विजय पुराणिक, आ.चैनसुख संचेती, आ.सुनील देशमुख, आ.प्रकाश भारसाकळे, आ. अनिल बोंडे, आ. रमेश बुंदेले, आ. प्रभुदास भिलावेकर, आ. गोवर्धन शर्मा, आ. संजय कुटे, आ. राजेंद्र पाटणी, आ.रणधीर सावरकर, आ.राजू तोडसाम, आ.रामदास आंबटकर, महापौर संजय नरवणे, आ. संजीव रेड्डी बोडकूरवार, माजी आमदार अरूण अडसड, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्यासह सर्व जिल्हा व शहराध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. दर चार महिन्यांनी झालेली प्रत्येक निवडणूक भाजपा जिंकला आहे. २०१४ मध्ये देशात भाजप सत्तेवर आले, तेव्हा १७ कोटी मतदान झाले. आता तर मोदी सरकारच्या योजनेचा लाभ घेतलेले २४ लाख लाभार्थी आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत २८५ पेक्षा अधिक जागा मिळतील. यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्याने त्या लाभार्थीपर्यंत जाऊन हा लाभ मोदी सरकारच्या योजनेमुळे मिळाला, यासाठी संवाद साधायला पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यांनी राज्य शासनाच्या लोककल्यानकारी योजना, बोंडअळीचे अनुदान, प्रत्येक बेघर नागरिकांना निवारा, प्रत्येक घरी स्वच्छ भारत अतंर्गत शौचालय, नैसर्गिक आपत्ती निधी, राज्याततील रस्त्यांची विक्रमी कामे आदींवर प्रकाश टाकून कार्यकर्त्यांनी याची माहिती शेवटच्या घटकापर्यंत दिली पाहिजे, असे सांगितले. यावेळी शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी कामाचे वृत्तनिवेदन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार आ. रामदास आंबटकर यांनी मानले.युतीसाठी आशावादीराज्यात मागील वेळी युती नसताना पक्षाचे अस्तित्व दाखवून दिले. त्यामुळे यावेळी शिवसेनेसोबत युती होणार किंंवा नाही, याची चिंता न करता पक्षाने जो कार्यक्रम दिला तो राबवावा. युतीची चिंता आमच्यावर सोडून द्या. समविचारी पक्षांशी युती व्हावी, यासाठी आम्ही आशावादी आहोत. युद्धाची तयारी असताना सैनिक तयार असला पाहिजे. भाजपाची खरी ताकद बुथवर आहे. यासाठी पक्षाचा विचार, कार्य व योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.