शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

सत्ता हे सेवेचे साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 22:43 IST

सत्ता हे सेवेचे साधन आहे व याच विचाराने केंद्र अन् राज्यातील सरकार काम करीत आहे. देशातील सरकार परिवर्तनशील असल्याने शेवटच्या टोकावरील माणसाचे परिवर्तन झाले पाहिजे, हाच प्रयत्न होत आहे. यासाठीच देशात नरेंद्र मोदी सरकारने मूलभूत परिवर्तनाच्या योजना दिल्याची ग्वाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिली.

ठळक मुद्देमुख्यमंत्री : विभागाच्या भाजप मेळाव्यात कार्यकर्त्यांना कानमंत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सत्ता हे सेवेचे साधन आहे व याच विचाराने केंद्र अन् राज्यातील सरकार काम करीत आहे. देशातील सरकार परिवर्तनशील असल्याने शेवटच्या टोकावरील माणसाचे परिवर्तन झाले पाहिजे, हाच प्रयत्न होत आहे. यासाठीच देशात नरेंद्र मोदी सरकारने मूलभूत परिवर्तनाच्या योजना दिल्याची ग्वाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिली.येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित ‘चलो लक्ष्य की ओर’ या भाजपच्या विभागीय मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष व खासदार रावसाहेब दानवे, पालकमंत्री प्रवीण पोटे, ना. रणजित पाटील, खा.संजय धोत्रे, खा.रामदास तडस, संघटनमंत्री विजय पुराणिक, आ.चैनसुख संचेती, आ.सुनील देशमुख, आ.प्रकाश भारसाकळे, आ. अनिल बोंडे, आ. रमेश बुंदेले, आ. प्रभुदास भिलावेकर, आ. गोवर्धन शर्मा, आ. संजय कुटे, आ. राजेंद्र पाटणी, आ.रणधीर सावरकर, आ.राजू तोडसाम, आ.रामदास आंबटकर, महापौर संजय नरवणे, आ. संजीव रेड्डी बोडकूरवार, माजी आमदार अरूण अडसड, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्यासह सर्व जिल्हा व शहराध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. दर चार महिन्यांनी झालेली प्रत्येक निवडणूक भाजपा जिंकला आहे. २०१४ मध्ये देशात भाजप सत्तेवर आले, तेव्हा १७ कोटी मतदान झाले. आता तर मोदी सरकारच्या योजनेचा लाभ घेतलेले २४ लाख लाभार्थी आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत २८५ पेक्षा अधिक जागा मिळतील. यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्याने त्या लाभार्थीपर्यंत जाऊन हा लाभ मोदी सरकारच्या योजनेमुळे मिळाला, यासाठी संवाद साधायला पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यांनी राज्य शासनाच्या लोककल्यानकारी योजना, बोंडअळीचे अनुदान, प्रत्येक बेघर नागरिकांना निवारा, प्रत्येक घरी स्वच्छ भारत अतंर्गत शौचालय, नैसर्गिक आपत्ती निधी, राज्याततील रस्त्यांची विक्रमी कामे आदींवर प्रकाश टाकून कार्यकर्त्यांनी याची माहिती शेवटच्या घटकापर्यंत दिली पाहिजे, असे सांगितले. यावेळी शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी कामाचे वृत्तनिवेदन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार आ. रामदास आंबटकर यांनी मानले.युतीसाठी आशावादीराज्यात मागील वेळी युती नसताना पक्षाचे अस्तित्व दाखवून दिले. त्यामुळे यावेळी शिवसेनेसोबत युती होणार किंंवा नाही, याची चिंता न करता पक्षाने जो कार्यक्रम दिला तो राबवावा. युतीची चिंता आमच्यावर सोडून द्या. समविचारी पक्षांशी युती व्हावी, यासाठी आम्ही आशावादी आहोत. युद्धाची तयारी असताना सैनिक तयार असला पाहिजे. भाजपाची खरी ताकद बुथवर आहे. यासाठी पक्षाचा विचार, कार्य व योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.