शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

मातीचा बिनबोभाट उपसा

By admin | Updated: November 13, 2016 00:08 IST

जिल्ह्यातील वीटभट्ट्या अनधीकृपणे सुरू असतानाही चालक दंड स्वीकारून पुन्हा मातीचा उपसा करतात.

अनधिकृत वीटभट्ट्या : पर्यावरणावर परिणामाची शक्यताअमरावती : जिल्ह्यातील वीटभट्ट्या अनधीकृपणे सुरू असतानाही चालक दंड स्वीकारून पुन्हा मातीचा उपसा करतात. वारंवार होणाऱ्या या माती उत्खननामुळे पर्यावरणास धोका निर्माण होण्याची शक्यता भूर्गभशास्त्र तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे या अनधिकृत वीटभट्टी बंद कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यात अनधिकृत वीटभट्ट्या अनेक ठिकाणी सुरू असल्याची शासकीय दप्तरी नोंद आहे. मात्र, माती उपस्याची रॉयल्टी घेऊन या माती माफियांना पुन्हा माती उपस्यासाठी खुले सोडण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे येत आहे. तहसीलदार सुरेश बगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वीटभट्टीचालकांना पर्यावरण विभाग व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र आवश्यक असते. मात्र, शहरातील वीटभट्टीचालकांनी असे कोणतेही प्रमाणपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे सर्व वीटभट्ट्या या अनधिकृतपणे सुरू आहे. तसेच काही वीटभट्ट्या अतिक्रमित आहे. या वीटभट्टी चालकांकडून माती उपस्याची रॉयल्टी स्वरुपात दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामध्ये अमरावती शहर क्षेत्रात २०१५ ला ७९ वीटभट्टीचालकाकडून ३० लाख १८ हजार १२० रुपयांचा दंड, तर मार्च २०१६ मध्ये ५७ वीटभट्टी चालकांकडून ३५ लाख ६२ हजारांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. या वीटभट्टीचालकांचा व्यवसाय अनधिकृत आहे, ही बाब महसूल विभागाला माहिती आहे. मात्र, त्यांच्यावर केवळ दंडात्मक कारवाई का केली जाते. त्यांचे व्यवसाय कायमस्वरुपी बंद का केले जात नाहीत, असा सवाल जनसामान्याचा आहे. वीटभट्टीचालकांकडून होणारा मातीचा उपसा हे जमिनीचा स्तर बिघडवीत आहे. वारंवांर मातीचा उपसा होत असेल, तर जमिनीत पाणी झिरपण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होते. त्या ठिकाणी वृक्षलागवडसुद्धा होऊ शकत नाही. माती तयार होण्यास हजारो वर्ष लागतात, जर एकाच ठिकाणाची वारंवार माती काढण्यात आल्याने तो जमिनीचा तुकडा पर्यावरणासाठी धोकादायक ठरत असल्याचे मत भूगर्भशास्त्र तज्ज्ञांचे आहे. असे असतानाही वीटभट्टीचालक राजरोसपणे विटा बनविण्यासाठी मातीचा उपसा करीत आहेत. ही बाब जिल्ह्यातील पर्यावरणासाठी भविष्यात घातक ठरणारीच आहे. याबाबत कठोर पाऊल उचलण्याची गरज असून शासकीय यंत्रणेने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)माती तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. उपस्यामुळे मातीचे वरचे लेयर नष्ट होते. पाणी झिरपण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे वृक्षलागवडीवर मोठा प्रभाव पडतो. त्या ठिकाणी झाडे उगवत नाही. पर्यावरणासाठी ही बाब धोकादायक आहे. - सैय्यद फजल रहेमान खादरी, भूगर्भशास्त्र विभागप्रमुख, अमरावती