शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

मातीचा बिनबोभाट उपसा

By admin | Updated: November 13, 2016 00:08 IST

जिल्ह्यातील वीटभट्ट्या अनधीकृपणे सुरू असतानाही चालक दंड स्वीकारून पुन्हा मातीचा उपसा करतात.

अनधिकृत वीटभट्ट्या : पर्यावरणावर परिणामाची शक्यताअमरावती : जिल्ह्यातील वीटभट्ट्या अनधीकृपणे सुरू असतानाही चालक दंड स्वीकारून पुन्हा मातीचा उपसा करतात. वारंवार होणाऱ्या या माती उत्खननामुळे पर्यावरणास धोका निर्माण होण्याची शक्यता भूर्गभशास्त्र तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे या अनधिकृत वीटभट्टी बंद कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यात अनधिकृत वीटभट्ट्या अनेक ठिकाणी सुरू असल्याची शासकीय दप्तरी नोंद आहे. मात्र, माती उपस्याची रॉयल्टी घेऊन या माती माफियांना पुन्हा माती उपस्यासाठी खुले सोडण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे येत आहे. तहसीलदार सुरेश बगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वीटभट्टीचालकांना पर्यावरण विभाग व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र आवश्यक असते. मात्र, शहरातील वीटभट्टीचालकांनी असे कोणतेही प्रमाणपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे सर्व वीटभट्ट्या या अनधिकृतपणे सुरू आहे. तसेच काही वीटभट्ट्या अतिक्रमित आहे. या वीटभट्टी चालकांकडून माती उपस्याची रॉयल्टी स्वरुपात दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामध्ये अमरावती शहर क्षेत्रात २०१५ ला ७९ वीटभट्टीचालकाकडून ३० लाख १८ हजार १२० रुपयांचा दंड, तर मार्च २०१६ मध्ये ५७ वीटभट्टी चालकांकडून ३५ लाख ६२ हजारांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. या वीटभट्टीचालकांचा व्यवसाय अनधिकृत आहे, ही बाब महसूल विभागाला माहिती आहे. मात्र, त्यांच्यावर केवळ दंडात्मक कारवाई का केली जाते. त्यांचे व्यवसाय कायमस्वरुपी बंद का केले जात नाहीत, असा सवाल जनसामान्याचा आहे. वीटभट्टीचालकांकडून होणारा मातीचा उपसा हे जमिनीचा स्तर बिघडवीत आहे. वारंवांर मातीचा उपसा होत असेल, तर जमिनीत पाणी झिरपण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होते. त्या ठिकाणी वृक्षलागवडसुद्धा होऊ शकत नाही. माती तयार होण्यास हजारो वर्ष लागतात, जर एकाच ठिकाणाची वारंवार माती काढण्यात आल्याने तो जमिनीचा तुकडा पर्यावरणासाठी धोकादायक ठरत असल्याचे मत भूगर्भशास्त्र तज्ज्ञांचे आहे. असे असतानाही वीटभट्टीचालक राजरोसपणे विटा बनविण्यासाठी मातीचा उपसा करीत आहेत. ही बाब जिल्ह्यातील पर्यावरणासाठी भविष्यात घातक ठरणारीच आहे. याबाबत कठोर पाऊल उचलण्याची गरज असून शासकीय यंत्रणेने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)माती तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. उपस्यामुळे मातीचे वरचे लेयर नष्ट होते. पाणी झिरपण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे वृक्षलागवडीवर मोठा प्रभाव पडतो. त्या ठिकाणी झाडे उगवत नाही. पर्यावरणासाठी ही बाब धोकादायक आहे. - सैय्यद फजल रहेमान खादरी, भूगर्भशास्त्र विभागप्रमुख, अमरावती