शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मातीचा बिनबोभाट उपसा

By admin | Updated: November 13, 2016 00:08 IST

जिल्ह्यातील वीटभट्ट्या अनधीकृपणे सुरू असतानाही चालक दंड स्वीकारून पुन्हा मातीचा उपसा करतात.

अनधिकृत वीटभट्ट्या : पर्यावरणावर परिणामाची शक्यताअमरावती : जिल्ह्यातील वीटभट्ट्या अनधीकृपणे सुरू असतानाही चालक दंड स्वीकारून पुन्हा मातीचा उपसा करतात. वारंवार होणाऱ्या या माती उत्खननामुळे पर्यावरणास धोका निर्माण होण्याची शक्यता भूर्गभशास्त्र तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे या अनधिकृत वीटभट्टी बंद कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यात अनधिकृत वीटभट्ट्या अनेक ठिकाणी सुरू असल्याची शासकीय दप्तरी नोंद आहे. मात्र, माती उपस्याची रॉयल्टी घेऊन या माती माफियांना पुन्हा माती उपस्यासाठी खुले सोडण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे येत आहे. तहसीलदार सुरेश बगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वीटभट्टीचालकांना पर्यावरण विभाग व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र आवश्यक असते. मात्र, शहरातील वीटभट्टीचालकांनी असे कोणतेही प्रमाणपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे सर्व वीटभट्ट्या या अनधिकृतपणे सुरू आहे. तसेच काही वीटभट्ट्या अतिक्रमित आहे. या वीटभट्टी चालकांकडून माती उपस्याची रॉयल्टी स्वरुपात दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामध्ये अमरावती शहर क्षेत्रात २०१५ ला ७९ वीटभट्टीचालकाकडून ३० लाख १८ हजार १२० रुपयांचा दंड, तर मार्च २०१६ मध्ये ५७ वीटभट्टी चालकांकडून ३५ लाख ६२ हजारांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. या वीटभट्टीचालकांचा व्यवसाय अनधिकृत आहे, ही बाब महसूल विभागाला माहिती आहे. मात्र, त्यांच्यावर केवळ दंडात्मक कारवाई का केली जाते. त्यांचे व्यवसाय कायमस्वरुपी बंद का केले जात नाहीत, असा सवाल जनसामान्याचा आहे. वीटभट्टीचालकांकडून होणारा मातीचा उपसा हे जमिनीचा स्तर बिघडवीत आहे. वारंवांर मातीचा उपसा होत असेल, तर जमिनीत पाणी झिरपण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होते. त्या ठिकाणी वृक्षलागवडसुद्धा होऊ शकत नाही. माती तयार होण्यास हजारो वर्ष लागतात, जर एकाच ठिकाणाची वारंवार माती काढण्यात आल्याने तो जमिनीचा तुकडा पर्यावरणासाठी धोकादायक ठरत असल्याचे मत भूगर्भशास्त्र तज्ज्ञांचे आहे. असे असतानाही वीटभट्टीचालक राजरोसपणे विटा बनविण्यासाठी मातीचा उपसा करीत आहेत. ही बाब जिल्ह्यातील पर्यावरणासाठी भविष्यात घातक ठरणारीच आहे. याबाबत कठोर पाऊल उचलण्याची गरज असून शासकीय यंत्रणेने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)माती तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. उपस्यामुळे मातीचे वरचे लेयर नष्ट होते. पाणी झिरपण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे वृक्षलागवडीवर मोठा प्रभाव पडतो. त्या ठिकाणी झाडे उगवत नाही. पर्यावरणासाठी ही बाब धोकादायक आहे. - सैय्यद फजल रहेमान खादरी, भूगर्भशास्त्र विभागप्रमुख, अमरावती