शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
4
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
5
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
6
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
7
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
8
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
9
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
10
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
11
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
12
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
13
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
14
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
15
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
16
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
17
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
18
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
19
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
20
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार

रस्त्यावरील खड्डे अजूनही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 22:15 IST

अमरावती जिल्ह्यातील व विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते खड्डेमुक्त झाल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

ठळक मुद्देचांदूरबाजार-खरवाडी रस्ता : सा.बां. विभागाचे दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमतचांदूरबाजार : अमरावती जिल्ह्यातील व विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते खड्डेमुक्त झाल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चांदूरबाजार-वलगाव-अमरावती मार्गातील खड्डे मात्र आजही अपघाताला आमंत्रण देत आहेत.चांदूरबाजार-अमरावती वलगाव मार्गे हा जिल्ह्यातील सर्वांत जुना सार्वजनिक बांधकाम विभागाचा मार्ग आहे. याच मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयसुद्धा आहे. त्यांच्या कार्यालयापासून दोन-तीन किलोमीटरवरच मोठमोठे खड्डे पडलेले आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येत नसल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच या रस्त्यावर मुक्ताई लॉनजवळ टाटा समूह व काळी-पिवळई एकमेकांवर धडकून अपघात झालेला आहे. त्याच ठिकाणी हे खड्डे पडलेले आहे. हा अपघात या खड्ड्यामुळे तर घडला नाही ना, असेही वाहनचालकांमध्ये चर्चा होत आहे. कारण या रस्त्यावरील खड्डे हे मोठमोठे आहे आणि खड्डे वाचविण्याचा प्रयत्न प्रत्येक वाहन चालक करीत असतो व रात्रीच्या वेळी पुढील वाहन हे किती दूर आहे, याचा अंदाज व्यक्त होत नसल्याने रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात बरेच अपघात होतात.चांदूरबाजार ते खरवाडीपर्यंतच्या रस्त्यावर अनेक मोठमोठे खड्डे आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस वाहतूक सुरू राहते. मोठ्या वाहनाबरोबर मोटारसायकल चालकांनादेखील खड्डे चकुविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.खड्ड्यांमुळे लहान-मोठे अपघात कित्येकदा होतात. हा मार्ग चांदूरबाजार सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येतो.थातूरमातूर बुजविले खड्डेराज्याच्या बांधकाममंत्र्यांनी विभागातील रस्ते खड्डेमुक्त झाल्याची घोषणा केली असतानाही चांदूरबाजार सार्वजनिक बांधकाम उपविभाग झोपेत आहे. तालुक्यातील काही रस्त्यांवरील खड्डे कायमच आहेत, तर काही रस्त्यावरील खड्डे हे थातूरमातूर बुजविल्याने ते पुन्हा उखडण्यास सुरुवात झाली असल्याचे प्रवासी व वाहनचालकांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.ब्रिटिशकालीन रस्तागॅजेटमध्ये ब्रिटिशांच्या राजवटीत हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचाच होता, असा उल्लेख आहे. या मार्गावर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात निंबाची झाडे लावल्याचा उल्लेख त्यात केलेला आहे. आघाडी शासन असताना तत्कालीन पालकमंत्री वसुधा देशमुख यांच्या कार्यकाळात या मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते.