शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील खड्डे अजूनही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 22:15 IST

अमरावती जिल्ह्यातील व विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते खड्डेमुक्त झाल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

ठळक मुद्देचांदूरबाजार-खरवाडी रस्ता : सा.बां. विभागाचे दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमतचांदूरबाजार : अमरावती जिल्ह्यातील व विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते खड्डेमुक्त झाल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चांदूरबाजार-वलगाव-अमरावती मार्गातील खड्डे मात्र आजही अपघाताला आमंत्रण देत आहेत.चांदूरबाजार-अमरावती वलगाव मार्गे हा जिल्ह्यातील सर्वांत जुना सार्वजनिक बांधकाम विभागाचा मार्ग आहे. याच मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयसुद्धा आहे. त्यांच्या कार्यालयापासून दोन-तीन किलोमीटरवरच मोठमोठे खड्डे पडलेले आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येत नसल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच या रस्त्यावर मुक्ताई लॉनजवळ टाटा समूह व काळी-पिवळई एकमेकांवर धडकून अपघात झालेला आहे. त्याच ठिकाणी हे खड्डे पडलेले आहे. हा अपघात या खड्ड्यामुळे तर घडला नाही ना, असेही वाहनचालकांमध्ये चर्चा होत आहे. कारण या रस्त्यावरील खड्डे हे मोठमोठे आहे आणि खड्डे वाचविण्याचा प्रयत्न प्रत्येक वाहन चालक करीत असतो व रात्रीच्या वेळी पुढील वाहन हे किती दूर आहे, याचा अंदाज व्यक्त होत नसल्याने रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात बरेच अपघात होतात.चांदूरबाजार ते खरवाडीपर्यंतच्या रस्त्यावर अनेक मोठमोठे खड्डे आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस वाहतूक सुरू राहते. मोठ्या वाहनाबरोबर मोटारसायकल चालकांनादेखील खड्डे चकुविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.खड्ड्यांमुळे लहान-मोठे अपघात कित्येकदा होतात. हा मार्ग चांदूरबाजार सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येतो.थातूरमातूर बुजविले खड्डेराज्याच्या बांधकाममंत्र्यांनी विभागातील रस्ते खड्डेमुक्त झाल्याची घोषणा केली असतानाही चांदूरबाजार सार्वजनिक बांधकाम उपविभाग झोपेत आहे. तालुक्यातील काही रस्त्यांवरील खड्डे कायमच आहेत, तर काही रस्त्यावरील खड्डे हे थातूरमातूर बुजविल्याने ते पुन्हा उखडण्यास सुरुवात झाली असल्याचे प्रवासी व वाहनचालकांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.ब्रिटिशकालीन रस्तागॅजेटमध्ये ब्रिटिशांच्या राजवटीत हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचाच होता, असा उल्लेख आहे. या मार्गावर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात निंबाची झाडे लावल्याचा उल्लेख त्यात केलेला आहे. आघाडी शासन असताना तत्कालीन पालकमंत्री वसुधा देशमुख यांच्या कार्यकाळात या मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते.