शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

बदल्यांवरील स्थगितीची डेडलाईन संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST

------------------------------------------------------------------------------------------- कोरोनामुळे रखडलेल्या प्रक्रियेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेध अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३० जूनपर्यंत राज्य शासनाने बदल्यांवर स्थगिती दिली होती. ...

-------------------------------------------------------------------------------------------

कोरोनामुळे रखडलेल्या प्रक्रियेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेध

अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३० जूनपर्यंत राज्य शासनाने बदल्यांवर स्थगिती दिली होती. ही डेडलाईन आता संपली आहे. बऱ्याच जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना बदली प्रक्रियेची प्रतीक्षा लागली आहे. मात्र, राज्य शासनाकडून बदल्यांबाबत अद्याप कुठल्याही ठोस निर्णयाची घोषणा झालेली नाही.

गत मार्च-एप्रिलमध्ये जिल्ह्यासह राज्यभरात कोरोना थैमान घातले होते. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाट अनेक नागरिकांनी त्यांचे आप्तस्वकीय आणि जवळच्या व्यक्ती गमावल्या. कोरोना हाहाकार बघता, शासनाने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या होत्या. त्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागल्या. परिणामी या संकटसमयी सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांच्या ३० जूनपर्यंत बदली न करण्याचे आदेश शासनाने दिले होते. परंतु, जूननंतर परिस्थितीचा आढावा घेत बदल्या केल्या जातील, असे स्पष्ट केले होते. सध्या राज्यभरातील तीन ते चार जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये आजघडीला कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. बदल्यांसाठी शासनाने दिलेली मुदत संपुष्टात आली आहे. परिणामी तीन किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत असलेल्या तसेच विनंती बदल्यांसाठी इच्छुकांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा इशारा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. दुर्दैवाने ही लाट ओढवल्यास किमान तीन महिने तिचा प्रभाव राहील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. परिणामी बदल्यांसाठी पुढील मार्च-एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. त्यामुळे शासनाने आता तातडीने बदल्यांची प्रक्रिया सुरू करावी, अशी चर्चा खासगीत अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे.

बॉक्स

बदल्यांसाठी लॉबिंग

बदल्यांकरिता उत्सुक असलेले अधिकारी व कर्मचारी शासकीय यंत्रणेत कमी नाही. मात्र, शासनाकडून बदल्याबाबत कुठलाही ठोस निर्णय घेतला जात नाही. परंतु, बदल्याबाबत शासनस्तरावरून हालचाली सुरू झाल्यास सोईच्या ठिकाणी पदस्थापना मिळावी याकरीता प्रयत्न केले जात आहेत.

----------------