शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

काढणीपश्चात नुकसान, पीकविमा भरपाई होणार निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:13 IST

अमरावती : आपत्तीमुळे बाधित क्षेत्र एकूण पेरणी क्षेत्राच्या २५ टक्क्यांपर्यंत असेल तर वैयक्तिक स्तरावर व यापेक्षा जास्त नुकसान असल्यास ...

अमरावती : आपत्तीमुळे बाधित क्षेत्र एकूण पेरणी क्षेत्राच्या २५ टक्क्यांपर्यंत असेल तर वैयक्तिक स्तरावर व यापेक्षा जास्त नुकसान असल्यास अधिसूचित क्षेत्रातील बाधित शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरणार आहेत. यासाठी विमा कंपनीस व सूचित पर्यायाच्या ठिकाणी विहित मुदतीत पूर्वसूचना देणे शेतकऱ्यांना अनिवार्य आहे. जिल्हास्तरावर यंत्रणेद्वारा संनियंत्रणाचे आदेश कृषी आयुक्तांनी शुक्रवारी दिले आहेत.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पीक पेरणी ते काढणीपर्यंतच्या कालावधीत उत्पन्नात येणारी घट याशिवाय नैसर्गिक कारणांंमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान झाल्यास विमा संरक्षण दिले जाते. याशिवाय २९ जून २०२० च्या शासनादेशानुसार हंगाम कालावधीत अधिसूचित पिकांची शेतात कापणी करून सुकण्यासाठी पसरून ठेवलेल्या व कापणीपासून जास्तीत जास्त दोन आठवड्यांपर्यंत गारपीट, चक्रीवादळामुळे झालेला पाऊस व अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसानभरपाई निश्चित केली जाते.

पिकांचे नुकसान झाल्याच्या ७२ तासांच्या आत विमा कंपनीला कळविणे बंधनकारक आहे. कंपनीद्वारा ४८ तासांच्या आत नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी पर्यवेक्षकांची नियुक्ती करावी लागते. विमा कंपनीद्वारा माहिती प्राप्त झाल्यानंतर कंपनीचा पर्यवेक्षक, कृषी विभागाचे अधिकारी व संबंधित शेतकरी या समितीद्वारा सर्व्हेक्षण करण्यात येऊन १० दिवसांच्या आत अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे कृषी आयुक्तांच्या पत्रात नमूद आहे.

बॉक्स

अशी आहे भरपाईची पद्धत

हंगामाच्या शेवटी प्राप्त होणाऱ्या सरासरी उत्पन्नाच्या आधारे निश्चित होणारी नुकसानभरपाई ही जर काढणीपश्चात नुकसान यामध्ये मिळालेल्या नुकसानभरपाईपेक्षा जास्त असेल तर हा फरक शेतकऱ्यांना अदा करण्यात येणार आहे. मात्र, मिळालेली नुकसानभरपाई जास्त असल्यास फरकाची रक्कम शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणार नसल्याचे कृषी विभागाने सांगितले.

बॉक्स

तालुका, जिल्हास्तरावर कंपनी कार्यालय

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पीक विमा कंपनीला तालुका व जिल्हास्तरावर कार्यालय स्थापन करणे व याठिकाणी पुरेसा प्रशिक्षित असणे महत्त्वाचे आहे. याशिवाय पीक नुकसानीच्या पूर्वसूचना कंपनीद्वारा स्वीकारल्या जात असल्याची खात्री कृषी विभागाला करावी लागणार आहे. पूर्वसूचना प्राप्त झाल्याचे दहा दिवसांत संयुक्त समितीद्वारा सर्व्हेक्षण आवश्यक राहणार आहे.