शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

काढणीपश्चात नुकसान, पीकविमा भरपाई होणार निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:13 IST

अमरावती : आपत्तीमुळे बाधित क्षेत्र एकूण पेरणी क्षेत्राच्या २५ टक्क्यांपर्यंत असेल तर वैयक्तिक स्तरावर व यापेक्षा जास्त नुकसान असल्यास ...

अमरावती : आपत्तीमुळे बाधित क्षेत्र एकूण पेरणी क्षेत्राच्या २५ टक्क्यांपर्यंत असेल तर वैयक्तिक स्तरावर व यापेक्षा जास्त नुकसान असल्यास अधिसूचित क्षेत्रातील बाधित शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरणार आहेत. यासाठी विमा कंपनीस व सूचित पर्यायाच्या ठिकाणी विहित मुदतीत पूर्वसूचना देणे शेतकऱ्यांना अनिवार्य आहे. जिल्हास्तरावर यंत्रणेद्वारा संनियंत्रणाचे आदेश कृषी आयुक्तांनी शुक्रवारी दिले आहेत.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पीक पेरणी ते काढणीपर्यंतच्या कालावधीत उत्पन्नात येणारी घट याशिवाय नैसर्गिक कारणांंमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान झाल्यास विमा संरक्षण दिले जाते. याशिवाय २९ जून २०२० च्या शासनादेशानुसार हंगाम कालावधीत अधिसूचित पिकांची शेतात कापणी करून सुकण्यासाठी पसरून ठेवलेल्या व कापणीपासून जास्तीत जास्त दोन आठवड्यांपर्यंत गारपीट, चक्रीवादळामुळे झालेला पाऊस व अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसानभरपाई निश्चित केली जाते.

पिकांचे नुकसान झाल्याच्या ७२ तासांच्या आत विमा कंपनीला कळविणे बंधनकारक आहे. कंपनीद्वारा ४८ तासांच्या आत नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी पर्यवेक्षकांची नियुक्ती करावी लागते. विमा कंपनीद्वारा माहिती प्राप्त झाल्यानंतर कंपनीचा पर्यवेक्षक, कृषी विभागाचे अधिकारी व संबंधित शेतकरी या समितीद्वारा सर्व्हेक्षण करण्यात येऊन १० दिवसांच्या आत अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे कृषी आयुक्तांच्या पत्रात नमूद आहे.

बॉक्स

अशी आहे भरपाईची पद्धत

हंगामाच्या शेवटी प्राप्त होणाऱ्या सरासरी उत्पन्नाच्या आधारे निश्चित होणारी नुकसानभरपाई ही जर काढणीपश्चात नुकसान यामध्ये मिळालेल्या नुकसानभरपाईपेक्षा जास्त असेल तर हा फरक शेतकऱ्यांना अदा करण्यात येणार आहे. मात्र, मिळालेली नुकसानभरपाई जास्त असल्यास फरकाची रक्कम शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणार नसल्याचे कृषी विभागाने सांगितले.

बॉक्स

तालुका, जिल्हास्तरावर कंपनी कार्यालय

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पीक विमा कंपनीला तालुका व जिल्हास्तरावर कार्यालय स्थापन करणे व याठिकाणी पुरेसा प्रशिक्षित असणे महत्त्वाचे आहे. याशिवाय पीक नुकसानीच्या पूर्वसूचना कंपनीद्वारा स्वीकारल्या जात असल्याची खात्री कृषी विभागाला करावी लागणार आहे. पूर्वसूचना प्राप्त झाल्याचे दहा दिवसांत संयुक्त समितीद्वारा सर्व्हेक्षण आवश्यक राहणार आहे.