शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

पोर्टल बंद, नाफेड केंद्राची वाटचाल थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2022 05:01 IST

नाफेडमार्फत चणा खरेदीला शासनाने मुदतवाढ दिल्यानंतर, २ जूनच्या रात्रीपासून संपूर्ण पोर्टल शासनाने बंद केल्याने, पुन्हा खरेदी बंद झाली. यामुळे नाफेडबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. ३१ मेपर्यंत नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी न झाल्याने शासनाने १८ जून अशी नवी तारीख दिली. तथापि, २४ मेचा कित्ता पुन्हा २ जून रोजी गिरविला गेला. पोर्टल बंद, तर खरेदी ठप्प झाली. ४२५ शेतकरी नोंदणी करून हरभरा विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : स्थानिक खरेदी-विक्री संघ अंतर्गत नाफेड केंद्रावर मुदतवाढीनंतर तालुक्यातील शेतकऱ्यांचा हरभऱ्याची खरेदी जोमात सुरू होती. परंतु, २ जून रोजी अचानक ऑनलाइन पोर्टल बंद पडल्यामुळे केंद्रावरील खरेदी बंद पडले आहे. जवळपास दोन ते अडीच क्विंटल हरभरा बाजार समितीच्या यार्डात खितपत पडून आहे.कित्येक शेतकऱ्यांनी दोन दिवसांपासून नावनोंदणी केली. परंतु, नाफेड केंद्रावर हरभऱ्याची विक्रमी आवक असल्यामुळे शेतकऱ्यांचा नंबर लागला नाही. आता कोणतीही पूर्वकल्पना न देता पोर्टल बंद करण्यात आले आहे. शेतकरी झाले सोकारी शेतकऱ्यांनी भाड्याच्या गाडीत विक्रीसाठी आणलेला हरभरा जागच्या जागीच उभ्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त  भाड्याचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे, शिवाय येथे शेतकऱ्यांना आपल्या मालाची दिवसरात्र सोकारी करावी लागत आहे. पावसाची भीतीकोणत्याही क्षणी पावसाने हजेरी लावल्यास उघड्यावर असलेल्या शेतमालाचे काय होणार, या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने लवकरात लवकर पोर्टल सुरू करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

नाफेडबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप

अंजनगाव सुर्जी : नाफेडमार्फत चणा खरेदीला शासनाने मुदतवाढ दिल्यानंतर, २ जूनच्या रात्रीपासून संपूर्ण पोर्टल शासनाने बंद केल्याने, पुन्हा खरेदी बंद झाली. यामुळे नाफेडबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. ३१ मेपर्यंत नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी न झाल्याने शासनाने १८ जून अशी नवी तारीख दिली. तथापि, २४ मेचा कित्ता पुन्हा २ जून रोजी गिरविला गेला. पोर्टल बंद, तर खरेदी ठप्प झाली. ४२५ शेतकरी नोंदणी करून हरभरा विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. नाफेड केंद्रावरून मालवाहू गाड्यांमध्ये शेतकऱ्यांनी आणलेला माल शेतकऱ्यांना परत घरी न्यावा लागला, त्यामुळे मालवाहू गाडीचे गाडीभाडे शेतकऱ्यांच्या माथी बसले. यापूर्वी बारदान्याअभावी नाफेडचे चणा खरेदी केंद्र तब्बल वीस दिवस बंद होते. अतिशय कमी दरात अनेक शेतकऱ्यांनी आपला माल बाजारात विकून टाकला. आता पुन्हा पोर्टल बंद असल्याने आणि खरिपाची पेरणी जवळ आल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.  

मी दोन दिवसांपूर्वी नावनोंदणी केली. माझा नंबर लागणारच होता की, पोर्टल बंद पडले. आता खरेदी केव्हा सुरू होणार, हे निश्चित नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच दैना होणार आहे. शेतकऱ्यांच्या या महत्त्वाच्या प्रश्नाविषयी सर्वच लोकप्रतिनिधींनी शासनाकडे आवाज उठवावा. - सुरेंद्र मांडवगणे, शेतकरी, शेंदोळा खुर्द

केंद्र शासनाला अचानक पोर्टल बंद करायचे होते, तर अतिरिक्त नावनोंदणी करण्याची गरज नव्हती. नाफेड केंद्रावर बारदान्याचा तुटवडा आहे. तेव्हा पोर्टल सुरू करण्याआधी बारदाना उपलब्ध करून देण्यात यावा, अन्यथा पोर्टल सुरू होऊन काहीच उपयोग होणार नाही.- गजानन अळसपुरे, अध्यक्ष, खरेदी-विक्री संघ, तिवसा

शेतमाल भरून आमच्या गाड्या बाजार समिती आवारात उभ्या आहेत. उभ्या गाडीचे शेतकऱ्यांकडून आम्हाला अर्धे भाडे मिळेल. परंतु, दोन दिवसांपासून एकाच जागेवर गाड्या उभ्या असल्याने हवेचा दाब तयार होऊन गाडीचे टायर फुटण्याची दाट शक्यता आहे.- संजय वऱ्हाडे, गाडीमालक,वणी ममदापूर.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रMarketबाजार