शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

गरिबांच्या योजनेला घरघर

By admin | Updated: February 9, 2015 23:06 IST

गरिबांचे अंधारलेले जीवन प्रकाशमान करण्यासाठी समाजकल्याण विभागाने सुरु केलेली कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना दिवसेंदिवस वाढत असली तरी

अमरावती : गरिबांचे अंधारलेले जीवन प्रकाशमान करण्यासाठी समाजकल्याण विभागाने सुरु केलेली कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना दिवसेंदिवस वाढत असली तरी बाजार भावाच्या चक्रव्यूहात अडकली आहे. योजनेसाठी खरेदी करावयाच्या जमिनीचे बाजारभाव एकरी २० लाखांच्याही पुढे गेल्याने जमिनी खरेदी करणे व लाभार्थ्यांना देणे या दोन्हीही कामात पूर्ण शिथिलता आली आहे. वाढत जाणाऱ्या बाजारभावामुळे अत्यल्प किमतीत जमीन विकावयास कोणी तयार नाहीत व जमीन उपलब्ध होत नसल्याने लाभार्थी त्यापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे वाढलेल्या बाजारभावाने या चांगल्या योजनेला घरघर लागली आहे. अनुसूचित जमाती व नवबौद्ध घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेत सध्या अडचणीत आहेत. लाभार्थीसाठी खरेदी करावयाच्या शेतजमिनीचे बाजारभाव प्रचंड वाढले आहे. त्या तुलनेत शासनाकडून जमिनीस दिले जाणारा बाजारभाव प्रती एकर तीन लाख रुपये इतका कमी असल्याने शासनाला जमिनीच उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात या कमी असलेल्याने योजनेस प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. २००४-२००५ मध्ये सुरु केलेल्या सबलीकरण योजनेस सुरुवातीच्या काळात चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु त्यानंतरच्या तीन वर्षांतच जमिनी मिळण्याचे प्रमाण खालावले. ते २०११-१२ मध्ये अगदी शून्यावर आले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या तीन लाख रुपये प्रतीएकर सरकारी भावामुळे जमिनी द्यावयास कोणी तयार होत नसल्याचा शेरा मारुन अहवाल व शिल्लक राहिलेला निधी सरकारकडे पाठविला गेला. या योजनेला ऊर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी आता शासनस्तरावरुन प्रयत्न होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात २००५ पासून २१६ लाभार्थींना ७६२ एकर जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. चालू वर्षात परिस्थिती बिकट झाली असून आतापर्यंत केवळ २१६ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. दरम्यान, शासनाने जमीन खरेदी करताना ठरवून दिलेल्या दराच्या तुलनेत जमिनीचे बाजारभाव प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे जमिनी खरेदी करण्यात अडचणी निर्माण होत असल्याने लाभार्थीना शेतजमिनी देण्यात अडसर येत असल्याचे सहायक आयुक्तांनी सांगितले. (प्रतिनिधी)