शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

गरिबांच्या योजनेला घरघर

By admin | Updated: February 9, 2015 23:06 IST

गरिबांचे अंधारलेले जीवन प्रकाशमान करण्यासाठी समाजकल्याण विभागाने सुरु केलेली कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना दिवसेंदिवस वाढत असली तरी

अमरावती : गरिबांचे अंधारलेले जीवन प्रकाशमान करण्यासाठी समाजकल्याण विभागाने सुरु केलेली कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना दिवसेंदिवस वाढत असली तरी बाजार भावाच्या चक्रव्यूहात अडकली आहे. योजनेसाठी खरेदी करावयाच्या जमिनीचे बाजारभाव एकरी २० लाखांच्याही पुढे गेल्याने जमिनी खरेदी करणे व लाभार्थ्यांना देणे या दोन्हीही कामात पूर्ण शिथिलता आली आहे. वाढत जाणाऱ्या बाजारभावामुळे अत्यल्प किमतीत जमीन विकावयास कोणी तयार नाहीत व जमीन उपलब्ध होत नसल्याने लाभार्थी त्यापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे वाढलेल्या बाजारभावाने या चांगल्या योजनेला घरघर लागली आहे. अनुसूचित जमाती व नवबौद्ध घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेत सध्या अडचणीत आहेत. लाभार्थीसाठी खरेदी करावयाच्या शेतजमिनीचे बाजारभाव प्रचंड वाढले आहे. त्या तुलनेत शासनाकडून जमिनीस दिले जाणारा बाजारभाव प्रती एकर तीन लाख रुपये इतका कमी असल्याने शासनाला जमिनीच उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात या कमी असलेल्याने योजनेस प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. २००४-२००५ मध्ये सुरु केलेल्या सबलीकरण योजनेस सुरुवातीच्या काळात चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु त्यानंतरच्या तीन वर्षांतच जमिनी मिळण्याचे प्रमाण खालावले. ते २०११-१२ मध्ये अगदी शून्यावर आले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या तीन लाख रुपये प्रतीएकर सरकारी भावामुळे जमिनी द्यावयास कोणी तयार होत नसल्याचा शेरा मारुन अहवाल व शिल्लक राहिलेला निधी सरकारकडे पाठविला गेला. या योजनेला ऊर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी आता शासनस्तरावरुन प्रयत्न होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात २००५ पासून २१६ लाभार्थींना ७६२ एकर जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. चालू वर्षात परिस्थिती बिकट झाली असून आतापर्यंत केवळ २१६ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. दरम्यान, शासनाने जमीन खरेदी करताना ठरवून दिलेल्या दराच्या तुलनेत जमिनीचे बाजारभाव प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे जमिनी खरेदी करण्यात अडचणी निर्माण होत असल्याने लाभार्थीना शेतजमिनी देण्यात अडसर येत असल्याचे सहायक आयुक्तांनी सांगितले. (प्रतिनिधी)