शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:18 IST

दुुर्लक्ष : आश्वासने विरली हवेत कावली वसाड : केंद्र व राज्य सरकार यांच्या विविध योजनेंतर्गत प्रत्येक गावात ‘गाव तिथे ...

दुुर्लक्ष : आश्वासने विरली हवेत

कावली वसाड : केंद्र व राज्य सरकार यांच्या विविध योजनेंतर्गत प्रत्येक गावात ‘गाव तिथे रस्ता’ याप्रमाणे शहरांना रस्त्याच्या माध्यमातून गावांना जोडण्यात आले. परंतु, अलीकडच्या काळात ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे.

धामणगाव रेल्वे तालुक्यातील जुना धामणगाव ते कावली रस्ता मोठ्या प्रमाणात उखडल्याने वसाड येथील नागरिक वाठोडा मार्गाने ये-जा करू लागले आहेत. परंतु, वाठोडा ते वसाड तसेच वाठोडा ते मंगरूळ दस्तगीर फाटा या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. गव्हा निपाणी येथील नागरिक जुना धामणगाव ते अंजनसिंगी रस्त्याचे काम सुरू असल्याने कावली मार्गाने जातात. परंतु, हा रस्तादेखील मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने वाहना चालविणे ही तारेवरची कसरत होऊन बसली आहे. कावली ते पिंपळखुटा या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असल्याने या रस्त्याने पायी चालणेसुद्धा कठीण झाले आहे. पिंपळखुट्याची धामणगाव ही मुख्य बाजारपेठ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक या रस्त्याने ये-जा करतात. परंतु मोठ्या प्रमाणात खड्डे असल्यामुळे चिंचपूर या गावावरून धामणगावकडे वळतात. या रस्त्यांची किमान डागडुजी करावी, अशी निवेदन देण्यात आली. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही.

--------------------------