शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
3
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
4
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
5
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
6
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
7
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
8
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
9
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
10
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
11
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
12
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
13
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
14
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
15
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
16
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
17
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
18
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
19
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
20
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

महामार्गाच्या नालीच्या पाण्याने शेतांचे झाले तळे

By admin | Updated: June 22, 2015 00:10 IST

जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. महामार्गावरील पावसाचे पाणी निघून जाण्यासाठी दुतर्फा मातीच्या नाल्या काढल्या आहेत.

नाल्यात सोडावे पाणी : पेरणी कशी करावी? शेतकरी चिंतेतअमरावती : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. महामार्गावरील पावसाचे पाणी निघून जाण्यासाठी दुतर्फा मातीच्या नाल्या काढल्या आहेत. परंतु त्या सदोष आहेत, त्यांची टोके नालीत काढण्यात आलेली नाही. त्यामुळे नालीचे पाणी घुसून रातोरात शेताचे तळे होत असल्याने शेतात पेरणी कशी करावी, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.अमरावती-तिवसा दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. महामार्गावर पडणारे पाणी निघून जाण्यासाठी नाल्या खोदण्यात आल्या आहेत. याच नाल्यालगत पुन्हा केबल टाकण्यासाठी खोदण्यात आल्यामुळे नाल्या बुजल्या आहे व पावसाचे पाणी सरळ लगतच्या शेतात शिरत आहे. शिवणगाव ते तिवसादरम्यान पहिल्याच पावसात अनेक शेतात पाणी शिरले असल्याने शेतात तळे साचले आहे. अशीच स्थिती राहिल्यास शेतात पिके घेणे कठीण होणार आहे. मुळात महामार्गाच्या दुतर्फा केबलसाठी नाल्या खोदल्या असताना पाणी काढणाऱ्या नाल्या बुजल्या जाणार नाही याची काळजी महामार्ग विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी घेतली नसल्याने शेतकऱ्यांवर बिकट प्रसंग ओढावला आहे. किंबहुना महामार्गाची देखभाल दुरूस्ती करणाऱ्या आयआरबी कंपनीने देखील केबलसाठी नाल्या खोदल्या जात असताना दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर सध्या ओढवलेल्या बिकट प्रसंगासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबतच आयआरबी कंपनी व केबलसाठी नाल्या खोदणारे कंत्राटदार तेवढेच जबाबदार असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. (प्रतिनिधी)