शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

पॉलिटेक्निकचे ‘तंत्र’ बिघडणार; २० दिवसांत केवळ ३० टक्के विद्यार्थ्यांचे अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:10 IST

दहावी निकालानंतर प्रवेशाला संथगती, स्कूल कनेक्टचा फारसा परिणाम नाही, ५०५ विद्यार्थ्यांची नोंदणी अमरावती : नोकरी, रोजगाराचा मर्यादित संधी आणि ...

दहावी निकालानंतर प्रवेशाला संथगती, स्कूल कनेक्टचा फारसा परिणाम नाही, ५०५ विद्यार्थ्यांची नोंदणी

अमरावती : नोकरी, रोजगाराचा मर्यादित संधी आणि व्यवसाय अभ्यासक्रमात अनेक पर्याय उपलब्ध असल्याने गत काही वर्षांपासून तंत्रनिकेतनच्या प्रवेशाचे ‘तंत्र’ बिघडले आहे. प्रवेशाअभावी दरवर्षी रिक्त जागा कायम आहेत. यावर्षीही प्रवेशाची मुदत संपण्यास दोन दिवस शिल्लक असताना आतापर्यंत ५०५ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.

अमरावती जिल्ह्यात सहा तंत्रनिकेतन असून,१७६३ प्रवेश क्षमता आहे. दोन शासकीय, एक अनुुदानित आणि तीन अनुदानित असे एकूण सहा तंत्रनिकेतन विद्यालये आहेत. तंत्रनिकेतनच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १७६३ जागा असल्या तरी आतापर्यंत ५०५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ३० जूनपासून प्रवेशास प्रारंभ झाला असून, २३ जुलैपर्यंत तंत्रनिकेतनच्या प्रवेशाची मुदत आहे. अवघे तीन दिवस प्रवेशासाठी शिल्लक असताना १,७३६ जागांसाठी ५०५ एवढ्याच विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. शासनाने तंत्रनिकेतनच्या प्रवेशास मुदतवाढ दिली नाही तर पुन्हा यंदाही प्रवेशाअभावी जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

-----------------

जिल्ह्यातील पॉलिटेक्निक : ०६

एकूण प्रवेश क्षमता : १७६३

आतापर्यंत गेले अर्ज : ५०५

अर्ज भरण्याची अखेरची मुदत : २३ जुलै

------------------

विद्यार्थ्यांकडे बैठक क्रमांक नाही

- दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला आहे. मात्र, मूळ गुणपत्रिका अद्यापही विद्यार्थ्यांना मिळाली नाही. त्यामुळे प्रवेशाच्यावेळी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतरही बैठक क्रमांक मिळत नसल्याने प्रवेशात अडचणी आहेत.

- पॉलिटेक्निक पदवी घेतल्यानंतरही नोकरीची हमी नाही. त्यामुळे ज्या शिक्षणामुळे नोकरी, रोजगार मिळेल, त्याच अभ्यासक्रमांकङे विद्यार्थ्यांचा कल आहे.

------------------

दहावी निकालानंतर प्रवेशास गती संथ

- दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तंत्रनिकेतनच्या प्रवेशास गती मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

- तंत्रनिकेतनच्या प्रवेशास गती येण्यासाठी स्कूल कनेक्ट हा उपक्रम राबविला. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. प्रवेशास केवळ दोन दिवस शिल्लक असताना १२६८ जागा रिक्त आहेत.

- दहावीनंतर उत्तीर्ण विद्यार्थी हे रोजगार,नोकरीसाठी तंत्रनिकेतनपेक्षखा आयटीआयला प्राधान्य देतात. परिणामी पॉलिटेक्निकच्या प्रवेशावर परिणाम होत आहे.

-----------------

गेल्यावर्षी १० टक्के जागा रिक्त

गतवर्षी क्षमतेपेक्षा कमीच प्रवेश झाले हाेते. त्यामुळे तंत्रनिकेतनच्या १० टक्के जागा रिक्त होत्या. गेल्या काही वर्षापासून प्रवेशासाठी वानवा आहे. विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचूनही प्रवेश घेत नसल्याने अनेक ‘तंत्र’ शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.

----------------

तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ मिळेल, असे संकेत आहेत. ‘स्कूल कनेक्ट’ या उपक्रमातून २४ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता आले. पॉलिटेक्निक पदवीतून नोकरी, रोजगाराची संधी आहेत. पुढे अभियांत्रिकीत प्रवेश घेता येताे. आतापर्यत जिल्ह्यात ३० टक्के प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

- राजेंद्र मोगरे, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन

-----------------

आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नाही नोकरी मिळाली तर काही रोजगार उभारता येतो. मात्र, तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाची पदवी घेतल्यानंतर काहीच हमी नाही.

- विशाल बोरकर, विद्यार्थी

---------------------

तंत्रनिकेतन अभ्यासक्रम चांगला आहे. पण, या पदवीतून नोकरी, रोजगार मिळेल का? हा महत्वाचा प्रश्न आहे. निव्वळ पदवी घ्यायची आणि वेळ, श्रम वाया घालवावा लागतो. त्यामुळे रोजगाराभिमुख अभ्यासक्रमास पसंती आहे.

- निशांत देशमुख, विद्यार्थी