शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पॉलिटेक्निकचे ‘तंत्र’ बिघडणार; २० दिवसांत केवळ ३० टक्के विद्यार्थ्यांचे अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:10 IST

दहावी निकालानंतर प्रवेशाला संथगती, स्कूल कनेक्टचा फारसा परिणाम नाही, ५०५ विद्यार्थ्यांची नोंदणी अमरावती : नोकरी, रोजगाराचा मर्यादित संधी आणि ...

दहावी निकालानंतर प्रवेशाला संथगती, स्कूल कनेक्टचा फारसा परिणाम नाही, ५०५ विद्यार्थ्यांची नोंदणी

अमरावती : नोकरी, रोजगाराचा मर्यादित संधी आणि व्यवसाय अभ्यासक्रमात अनेक पर्याय उपलब्ध असल्याने गत काही वर्षांपासून तंत्रनिकेतनच्या प्रवेशाचे ‘तंत्र’ बिघडले आहे. प्रवेशाअभावी दरवर्षी रिक्त जागा कायम आहेत. यावर्षीही प्रवेशाची मुदत संपण्यास दोन दिवस शिल्लक असताना आतापर्यंत ५०५ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.

अमरावती जिल्ह्यात सहा तंत्रनिकेतन असून,१७६३ प्रवेश क्षमता आहे. दोन शासकीय, एक अनुुदानित आणि तीन अनुदानित असे एकूण सहा तंत्रनिकेतन विद्यालये आहेत. तंत्रनिकेतनच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १७६३ जागा असल्या तरी आतापर्यंत ५०५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ३० जूनपासून प्रवेशास प्रारंभ झाला असून, २३ जुलैपर्यंत तंत्रनिकेतनच्या प्रवेशाची मुदत आहे. अवघे तीन दिवस प्रवेशासाठी शिल्लक असताना १,७३६ जागांसाठी ५०५ एवढ्याच विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. शासनाने तंत्रनिकेतनच्या प्रवेशास मुदतवाढ दिली नाही तर पुन्हा यंदाही प्रवेशाअभावी जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

-----------------

जिल्ह्यातील पॉलिटेक्निक : ०६

एकूण प्रवेश क्षमता : १७६३

आतापर्यंत गेले अर्ज : ५०५

अर्ज भरण्याची अखेरची मुदत : २३ जुलै

------------------

विद्यार्थ्यांकडे बैठक क्रमांक नाही

- दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला आहे. मात्र, मूळ गुणपत्रिका अद्यापही विद्यार्थ्यांना मिळाली नाही. त्यामुळे प्रवेशाच्यावेळी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतरही बैठक क्रमांक मिळत नसल्याने प्रवेशात अडचणी आहेत.

- पॉलिटेक्निक पदवी घेतल्यानंतरही नोकरीची हमी नाही. त्यामुळे ज्या शिक्षणामुळे नोकरी, रोजगार मिळेल, त्याच अभ्यासक्रमांकङे विद्यार्थ्यांचा कल आहे.

------------------

दहावी निकालानंतर प्रवेशास गती संथ

- दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तंत्रनिकेतनच्या प्रवेशास गती मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

- तंत्रनिकेतनच्या प्रवेशास गती येण्यासाठी स्कूल कनेक्ट हा उपक्रम राबविला. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. प्रवेशास केवळ दोन दिवस शिल्लक असताना १२६८ जागा रिक्त आहेत.

- दहावीनंतर उत्तीर्ण विद्यार्थी हे रोजगार,नोकरीसाठी तंत्रनिकेतनपेक्षखा आयटीआयला प्राधान्य देतात. परिणामी पॉलिटेक्निकच्या प्रवेशावर परिणाम होत आहे.

-----------------

गेल्यावर्षी १० टक्के जागा रिक्त

गतवर्षी क्षमतेपेक्षा कमीच प्रवेश झाले हाेते. त्यामुळे तंत्रनिकेतनच्या १० टक्के जागा रिक्त होत्या. गेल्या काही वर्षापासून प्रवेशासाठी वानवा आहे. विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचूनही प्रवेश घेत नसल्याने अनेक ‘तंत्र’ शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.

----------------

तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ मिळेल, असे संकेत आहेत. ‘स्कूल कनेक्ट’ या उपक्रमातून २४ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता आले. पॉलिटेक्निक पदवीतून नोकरी, रोजगाराची संधी आहेत. पुढे अभियांत्रिकीत प्रवेश घेता येताे. आतापर्यत जिल्ह्यात ३० टक्के प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

- राजेंद्र मोगरे, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन

-----------------

आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नाही नोकरी मिळाली तर काही रोजगार उभारता येतो. मात्र, तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाची पदवी घेतल्यानंतर काहीच हमी नाही.

- विशाल बोरकर, विद्यार्थी

---------------------

तंत्रनिकेतन अभ्यासक्रम चांगला आहे. पण, या पदवीतून नोकरी, रोजगार मिळेल का? हा महत्वाचा प्रश्न आहे. निव्वळ पदवी घ्यायची आणि वेळ, श्रम वाया घालवावा लागतो. त्यामुळे रोजगाराभिमुख अभ्यासक्रमास पसंती आहे.

- निशांत देशमुख, विद्यार्थी