शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

आरागिरण्यांचे प्रदूषण; फायर आॅडिट होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 20:13 IST

आरागिरण्यांना उद्योगाचा दर्जा प्राप्त असल्यामुळे प्रदूषण, फायर आॅडिट झाल्याशिवाय आरागिरणी परवान्यांचे नूतनीकरण करू नये, असे फर्मान अमरावती प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण

गणेश वासनिकअमरावती : आरागिरण्यांना उद्योगाचा दर्जा प्राप्त असल्यामुळे प्रदूषण, फायर आॅडिट झाल्याशिवाय आरागिरणी परवान्यांचे नूतनीकरण करू नये, असे फर्मान अमरावती प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांनी संबंधित वनाधिकाºयांना सोमवारी काढले. त्यामुळे राज्यात सुमारे चार हजार आरागिरणी परवाना नूतनीकरणासाठी आता प्रदूषण प्रमाणपत्र व अग्निशमन विभागाकडून तपासणी या किमान बाबी अनिवार्य असतील, हे स्पष्ट झाले आहे.दरवर्षी आरागिरणी परवान्यांचे नूतनीकरण करावे लागते. गतवर्षीपासून ते आॅनलाइन होत असल्याने राज्यातील आरागिरणी मालकांनी वनविभागाकडे ३१ डिसेंबरपर्यंत आॅनलाइन अर्ज सादर केले. मात्र, राज्य शासनाच्या उद्योग, कामगार व ऊर्जा विभागाने ९ जुलै १९७९ रोजी विभागाने आरागिरणी उद्योग हे ‘डेंजर इंडस्ट्रीज’ जाहीर केल्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आरागिरण्यांना किमान प्रदूषण प्रमाणपत्र, महापालिका किंवा नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाकडून फायर आॅडिट करणे क्रमप्राप्त झाले आहे. वनविभागाने १६ जुलै १९८१ रोजी शासननिर्णयात परिच्छेद (१) मुद्दा क्रमांक २ मध्ये परवानाधारकांनी उद्योगाशी संबंधित बाबी पूर्ण कराव्या लागतील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आरागिरणी परवान्यांचे नूतनीकरण प्रदूषण प्रमाणपत्र, फायर आॅडिटशिवाय होणार नाही, हे वास्तव आहे. यामुळे आरागिरणी मालकांनी परवाना नूतनीकरणासाठी वनविभागाकडे आॅनलाइन अर्ज सादर केले असले तरी प्रदूषण, फायर आॅडिट केल्याशिवाय फाइल पुढे सरकणार नाही, असे संकेत सूत्रांकडून मिळाले आहे. राज्यातील चार हजार आरागिरणी परवाने आॅनलाइन नूतनीकरणाची जबाबदारी नागपूर येथील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) रामजी यादव यांच्याकडे आहे. राज्य शासनाच्या नियमानुसार उद्योगाशी संबंधित बाबी पूर्ण करण्यासाठी आरागिरणी मालकांना नव्याने प्रदूषण प्रमाणपत्र, फायर आॅडिट केल्याशिवाय परवाना नूतनीकरण करता येणार नाही, असा पवित्रा आता वनविभागाने घेतला आहे. त्यामुळे ३१ जानेवारी २०१८ पर्यंत आरागिरण्यांच्या आॅनलाइन परवाना नूतनीकरणासाठी वनविभागाला तारेवरची कसरत करावी लागेल, असे चित्र आहे.

बॉक्सतीन वर्षे शिक्षा अन् एक लाखाचा दंडमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उद्योगाला किमान प्रदूषण प्रमाणपत्र न मिळविता सुरू ठेवल्यास संबंधित मालकांना तीन वर्षे शिक्षा आणि एक लाखाच्या दंडाची तरतूद आहे. १९८१ पासून आरागिरणी मालकांनी प्रदूषण, फायर आॅडिट न करता तशाच सुरू ठेवल्याप्रकरणी वनविभाग त्यांच्याकडून थकीत शुल्काची रक्कम वसूल करणार काय, असा सवाल उपस्थित झाला आहे.

कोटशासन नियमावलींचे पालन व्हावे, यासाठी आरागिरणी मालकांना प्रदूषण, फायर आॅडिट करण्याबाबत नोटीस बजावल्या जातील. संबंधित वनाधिकाºयांना नियमांची अंमलबजावणी करूनच आरागिरणी परवान्यांचे नूतनीकरण करावे, असे निर्देश दिलेत.- प्रवीण चव्हाणमुख्य वनसंरक्षक, प्रादेशिक अमरावती.