शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण नियंत्रण मंडळाची रतन इंडियात धाव

By admin | Updated: April 1, 2016 00:18 IST

वाघोली येथील पेयजल पिण्यास अयोग्य असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याच्या वृत्ताची दखल घेत प्रदुषण नियंत्रण मंडळाने रतन इंडियात धाव घेतली.

पाणी तपासले : नमुने प्रयोगशाळेत, लवकरच अहवालअमरावती : वाघोली येथील पेयजल पिण्यास अयोग्य असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याच्या वृत्ताची दखल घेत प्रदुषण नियंत्रण मंडळाने रतन इंडियात धाव घेतली. प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी ए.जे. कुडे यांच्या नेतृत्वात मनोज वाटाणे आणि जितेंद्र पुरके यांनी २९ मार्चला रतन इंडियामधील परिसरात प्रदुषण विषयक तपासणी केली. वाघोली ग्रामपंचायतजवळील स्टॅन्ड पोस्टमधून घेतलेला पाण्याच्या नमुना प्रयोगशाळेने पिण्यासाठी अयोग्य ठरविला, असे वृत्त ‘सोफियामुळे पेयजल बाधीत’ या शिर्षकाखाली ‘लोकमत’ने २९ मार्चला प्रकाशित केले होते. त्या वृत्ताची तत्काळ दखल घेण्यात आली तथा कोलयार्ड, रेल्वेपरिसर व अन्य ठिकाणच्या जलस्त्रोतातील पाण्याचे नमुने घेण्यात आले. रतन इंडियाच्या सोफिया औष्णिक विद्युत प्रकल्पातून निघणारे पाणी पेयजलाच्या स्त्रोतामध्ये मिसळून वाघोलीसह नजीकच्या अन्य गावामधील पेजयल पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल जिल्हा प्रयोग शाळेने दिला होता. त्या अनुषंगाने येथील ग्रामस्थही पेयजलातून उद्भवणाऱ्या आरोग्याच्या चिंतेने हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अमरावती प्रादेशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी रतन इंडिया प्रकल्प परिसरासह अन्य ठिकाणचे पाणी नमुने घेतले व ३० मार्चला तपासणीसाठी पाठविले आहेत. याबाबत अहवाल अद्याप अप्राप्त असताना पाण्यातील पीएच हा घटक योग्य प्रमाणात आढळून आल्याचा दावा रतन इंडियाकडून करण्यात आला आहे. हा दावा प्रदुषण नियंत्रण मंडळाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.