शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

छत्रीतलाव सौंदर्यीकरणात राजकारण

By admin | Updated: June 24, 2017 00:08 IST

सुमारे २५ कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या छत्रीतलाव सौंदर्यीकरण प्रकल्पाला राजकीय बाधा पोहोचली आहे.

२५ कोटींचा प्रकल्प : खा. अडसूळांकडून मुख्य वनसंरक्षकांकडे तक्रारलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सुमारे २५ कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या छत्रीतलाव सौंदर्यीकरण प्रकल्पाला राजकीय बाधा पोहोचली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर मुख्य वनसंरक्षकांकडे ही तक्रार करण्यात आली असून खा. आनंदराव अडसूळ यांनी याबाबत संपूर्ण कारवाईचा अहवाल मागितला आहे. खा.आनंदराव अडसूळ यांनी १६ जूनला मुख्य वनसंरक्षक तथा वनविकास यंत्रणेचे अध्यक्ष प्रवीण चव्हाण यांच्या नावे पत्र लिहून छत्री तलाव सौंदर्यीकरण व सुरूअसलेल्या विकासकामाचा फेरआढावा घेण्याची सूचना केली आहे. २४.७० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून १०० कोटींच्या डीपीआरला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. याशिवाय फोर्स डायमेंशन या कंपनीला ‘पीएमसी’ नेमण्याला स्थायी समितीने विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमिवर खा.अडसूळ यांनी केलेल्या तक्रारीला महत्त्व प्राप्त झाले आहे. अडसुळांच्या मते, ज्या वनजमिनीवर छत्रीतलावाच्या सौंदर्यीकरणासाठी १०० कोटी रुपयांचा खर्चाचा आराखडा सादर करण्यात आला ती वनजमीन वनविभागाची आहे. त्यासाठी केंद्र सरकारचे परवानगी न घेता तेथे बांधकामे केले जाणार आहेत. त्या बांधकामामुळे विहिरीची नैसर्गिक पाणी स्थगिती होणार आहे. सदरच्या राखीव वनजमीनीवर असलेल्या ‘झाडोरा’ हा मौल्यवान प्रजातीचा असल्याने त्या प्रतीचे जंगल उभारण्यास पुढे १०० वर्र्षे लागतील, असे या पत्रातून अडसुळांनी स्पष्ट केले आहे.विशिष्ट व्यक्तींसाठी अनुदानाची खैरात कुणालाही विश्वासात न घेता हा प्रकल्प राबविला जात असल्याने सदर १०० कोटींचे अनुदान हे कोणत्या विशिष्ट व्यक्तीसाठी कसे जात आहे, याची चौकशी करावी. यातून ठेकेदारांचे उखळ पांढरे तर होईल नाही ना! अशी शंका अडसुळांनी व्यक्त केली आहे. सौंदर्यीकरण रखडणार बडनेऱ्याचे आ. रवि राणा हे या कामासाठी प्रचंड आग्रही आहेत. २२ जूनला त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांचीही बैठक घेतली. मात्र पीएमसी नेमण्याचा मुद्दा महापालिकेच्या अखत्यारित असल्याने यात स्थायी व आयुक्तांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे छत्री तलाव प्रकल्प रखडण्याचे दुष्चिन्हे आहेत.