शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

छत्रीतलाव सौंदर्यीकरणात राजकारण

By admin | Updated: June 24, 2017 00:08 IST

सुमारे २५ कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या छत्रीतलाव सौंदर्यीकरण प्रकल्पाला राजकीय बाधा पोहोचली आहे.

२५ कोटींचा प्रकल्प : खा. अडसूळांकडून मुख्य वनसंरक्षकांकडे तक्रारलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सुमारे २५ कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या छत्रीतलाव सौंदर्यीकरण प्रकल्पाला राजकीय बाधा पोहोचली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर मुख्य वनसंरक्षकांकडे ही तक्रार करण्यात आली असून खा. आनंदराव अडसूळ यांनी याबाबत संपूर्ण कारवाईचा अहवाल मागितला आहे. खा.आनंदराव अडसूळ यांनी १६ जूनला मुख्य वनसंरक्षक तथा वनविकास यंत्रणेचे अध्यक्ष प्रवीण चव्हाण यांच्या नावे पत्र लिहून छत्री तलाव सौंदर्यीकरण व सुरूअसलेल्या विकासकामाचा फेरआढावा घेण्याची सूचना केली आहे. २४.७० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून १०० कोटींच्या डीपीआरला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. याशिवाय फोर्स डायमेंशन या कंपनीला ‘पीएमसी’ नेमण्याला स्थायी समितीने विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमिवर खा.अडसूळ यांनी केलेल्या तक्रारीला महत्त्व प्राप्त झाले आहे. अडसुळांच्या मते, ज्या वनजमिनीवर छत्रीतलावाच्या सौंदर्यीकरणासाठी १०० कोटी रुपयांचा खर्चाचा आराखडा सादर करण्यात आला ती वनजमीन वनविभागाची आहे. त्यासाठी केंद्र सरकारचे परवानगी न घेता तेथे बांधकामे केले जाणार आहेत. त्या बांधकामामुळे विहिरीची नैसर्गिक पाणी स्थगिती होणार आहे. सदरच्या राखीव वनजमीनीवर असलेल्या ‘झाडोरा’ हा मौल्यवान प्रजातीचा असल्याने त्या प्रतीचे जंगल उभारण्यास पुढे १०० वर्र्षे लागतील, असे या पत्रातून अडसुळांनी स्पष्ट केले आहे.विशिष्ट व्यक्तींसाठी अनुदानाची खैरात कुणालाही विश्वासात न घेता हा प्रकल्प राबविला जात असल्याने सदर १०० कोटींचे अनुदान हे कोणत्या विशिष्ट व्यक्तीसाठी कसे जात आहे, याची चौकशी करावी. यातून ठेकेदारांचे उखळ पांढरे तर होईल नाही ना! अशी शंका अडसुळांनी व्यक्त केली आहे. सौंदर्यीकरण रखडणार बडनेऱ्याचे आ. रवि राणा हे या कामासाठी प्रचंड आग्रही आहेत. २२ जूनला त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांचीही बैठक घेतली. मात्र पीएमसी नेमण्याचा मुद्दा महापालिकेच्या अखत्यारित असल्याने यात स्थायी व आयुक्तांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे छत्री तलाव प्रकल्प रखडण्याचे दुष्चिन्हे आहेत.