शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

महापालिकेत ‘स्थायी’ वरुन राजकारण

By admin | Updated: February 16, 2015 00:14 IST

महापालिकेत स्थायी समितीत सदस्य नियुक्तीवरुन राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. काँग्रेस वगळता अन्य पक्षात अंर्तगत धुसफूस असून राष्ट्रवादी, शिवसेना, बसपात गटनेतापदाचा वाद कायम आहे.

अमरावती : महापालिकेत स्थायी समितीत सदस्य नियुक्तीवरुन राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. काँग्रेस वगळता अन्य पक्षात अंर्तगत धुसफूस असून राष्ट्रवादी, शिवसेना, बसपात गटनेतापदाचा वाद कायम आहे. स्थायी समितीत नवीन ८ सदस्य नियुक्तीचा वाद कोणते वळण घेणार हे निश्चित नाही. मात्र, सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस गटनेत्याच्या सादर याचिकेच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.स्थायी समिती ही महापालिकेत अतिशय महत्त्वाची समिती आहे. या समितीला आर्थिकदृष्ट्या अनेक अधिकार मुंबई महापालिका अधिनियमानुसार बहुतांश अधिकार बहाल करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेतील प्रत्येक सदस्य हा स्थायी समितीत प्रवेशासाठी ‘जुगाड’ जमवितो. एकदा या समितीत प्रवेश मिळाला की, बरेच प्रश्न आपसुकच सुटतात, असा आजतागायतचा सदस्यांचा अनुभव आहे. येत्या २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आमसभेत नवीन ८ सदस्यांची नियुक्ती होणार आहे. त्यानंतर ६ मार्चपूर्वी स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक प्रशासनाला घ्यावी लागेल. ही निवडणूक जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या १६ सदस्यांच्या स्थायी समितीतून नैसर्गिक प्रक्रियेनुसार ८ सदस्य बाहेर पडतील. या सदस्यांच्या जागी नव्याने ८ सदस्य राजकीय पक्षबलानुसार नियुक्त केले जाईल. सदस्य नियुक्तीला अवघे चार दिवस शिल्लक राहिले असताना न्यायालयीन वाद, गटनेत्यांची भांडणे आदी विषय हे सदस्य नियुक्तीला आडकाठी ठरणारे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता सुनील काळे की, अविनाश मार्डीकर? हा वाद अजूनही शमलेला नाही. १६ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात या वादावर अंतिम सुनावणी होण्याची दाट शक्यता आहे. गटनेत्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निकाल दिला तरच राष्ट्रवादी काँग्रेस गटातून ‘स्थायी’मध्ये सदस्य नियुक्त केले जातील, अन्यथा हा वाद कायम राहील, असे चित्र आहे. एवढेच नव्हे तर शिवसेना, बसपातसुद्धा गटनेतेपदाचा वाद कायम आहे. त्यामुळे अस्तित्वात असलेले शिवसेनेचे गटनेता दिगंबर डहाके आणि बसपाचे गटनेता अजय गोंडाणे हे स्थायी समितीत कोणत्या सदस्यांची नियुक्ती करतात, हे २० फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे. तर दुसरीकडे जनविकास- रिपाइं गटावर आ. सुनील देशमुख यांचे वर्चस्व असून त्यांच्या निर्देशानुसार गटनेता प्रकाश बनसोड यांना स्थायी समितीत सदस्य म्हणून पाठवावे लागेल. भाजप गटात असलेले अपक्ष सदस्य अंबादास जावरे यांनी या गटात प्रवेश करताना पाचही वर्षे स्थायी समितीच लागेल? असा करार केला होता. या करारानुसार येत्या २० फेब्रुवारी रोजी नियुक्ती करावीच लागेल, असे जावरे यांचे म्हणणे आहे. एकमात्र काँग्रेसमध्ये उघडपणे वाद नसून पक्षनेता बबलू शेखावत यांच्याकडे स्थायीत प्रवेशासाठी सदस्यांनी ‘लॉबींग’ सुरु केली आहे. महापालिकेत काँग्रेसची सदस्य संख्या ३० असून स्थायी समितीत तीन सदस्य नव्याने पाठवावे लागणार आहे. त्यानुसार पक्षनेता बबलू शेखावत यांनी चाचपणी सुरु केली आहे. आतापर्यंत ज्या सदस्यांना कोणतीही समिती मिळाली नाही, अशा सदस्यांना ‘स्थायी’मध्ये नियुक्तीबाबतचा विचार काँग्रेसने सुरु केला आहे. नुकतीच उन्हाळ्याची चाहुल सुरु झाली असून महापालिकेतसुद्धा स्थायी समितीत सदस्य नियुक्तीवरुन राजकारण तापायला सुरुवात झाल्याचे चित्र आहे.