शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

‘टेक आॅफ’साठी हवी राजकीय इच्छाशक्ती

By admin | Updated: November 27, 2014 23:26 IST

बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण आणि विकासासाठी २५० कोटी रुपयांचा आराखडा तयार करुन भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. ७५० एकर जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले

अमरावती : बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण आणि विकासासाठी २५० कोटी रुपयांचा आराखडा तयार करुन भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. ७५० एकर जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले असून त्याकरीता ५८ कोटी रुपये खर्च आला आहे. विमातळाच्या विस्तारीकरणात आता १४०० मिटर ऐवजी २४०० मिटरची धावपट्टी राहणार आहे. या विमानतळाच्या पुढील विकासाची जबाबदारी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी व भारतीय विमानतळ प्राधिकराकडे सोपविण्यात आली आहे. विमानतळ विस्तारीकरणामध्ये वळण रस्त्याकरीता २० हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले असून त्याकरीता ४ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाला सुरुवात करण्यापूर्वी सद्याचा यवतमाळ मार्ग जळू या गावापर्यंत बंद करण्याची तयारी आहे. जळू या गावापासून पुढे यवतमाळ मार्गावर वाहने वळविण्यासाठी बेलोरा ते अडगाव पुढे जळू पर्यंत वळण रस्ता निर्माण केला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जमिन अधिग्रहनाची प्रक्रिया पूर्ण केली असून या वळण मार्गांचे काम लवकरच सुरु होईल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बेलोरा विमातळाच्या विस्तारीकरणाला मान्यता देत लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला होता. हल्ली केंद्र शासनाने या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक निधी मंजूर केला नाही. मात्र लोकप्रतिनीधी, राजकीय व्यक्तींनी बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण, विकास कामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी स्थानिक उद्योजकांची आहे. विदर्भात अमरावतीच्या नंतर मंजूर झालेल्या विमानतळाचे विस्तारीकरण पूर्ण होऊन येथे विमानांची रेलचेल वाढीस लागली आहे. परंतु बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण, विकास कामे अडगळीत पडल्याचे चित्र आहे.