शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

वरूड तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींमध्ये राजकीय खलबते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:17 IST

वरूड : तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींमध्ये राजकीय खलबते रंगू लागली आहेत. एकीकडे सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढण्याचा निर्णय अनेकांच्या जिव्हारी लागला ...

वरूड : तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींमध्ये राजकीय खलबते रंगू लागली आहेत. एकीकडे सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढण्याचा निर्णय अनेकांच्या जिव्हारी लागला असताना, उमेदवार किमान सातवी उत्तीर्ण असावा, या अटीने मुरब्बी गावपुढाऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे.

तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींसाठी ८७ हजार ६३ मतदार आहेत. यामध्ये ४५ हजार २४२ पुरुष, तर ४१ हजार ८२१ स्त्री मतदार मतदानाचा हक्क बजावतील. ४१ ग्रामपंचायतींकरिता ११ आरओ व तेवढ्याच एआरओंची नेमणूक करण्यात आली. १३९ प्रभागांकरिता होणाऱ्या या निवडणुकीसाठी १५५ मतदान केंद्रे आहेत. पाच वर्षे सत्तेची फळे चाखलेल्यांना मात्र मतदारांची पसंती नसून, विधानसभा, लोकसभेच्या वेळी हेवेदावे विसरून हेच सदस्य कोणत्याही पक्षात अर्थपूर्ण प्रवेश करीत असल्याने मतदारांचा विश्वास कमी झाल्याचे चित्र आहे. सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर होणार असल्याने निवडणुकीचा खर्च सर्वांनीच सारखा करावा, यावर मतैक्य होऊ लागले आहे.

‘रामराम’, ‘नमस्कार’ वाढले

ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होताच कधी न बोलणारे बोलू लागले, तर रामराम, नमस्काराला अधिक महत्त्व आले आहे, एकमेकांची ख्यालीखुुशालीसुद्धा विचारली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने आता सरपंचाकरीता शालेय शिक्षणाची अट सातवी उत्तीर्ण असणे अनिवार्य केल्याने अनेकांची भंबेरी उडाली आहे. आदिवासीबहुल भागात केवळ आरक्षणावर सरपंचपद मिळत असल्याने निरक्षर वा अल्पशिक्षित सदस्यांनाही सरपंचपदाची संधी मिळत होती. परंतु, निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे .