शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

वरूड तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींमध्ये राजकीय खलबते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:17 IST

वरूड : तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींमध्ये राजकीय खलबते रंगू लागली आहेत. एकीकडे सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढण्याचा निर्णय अनेकांच्या जिव्हारी लागला ...

वरूड : तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींमध्ये राजकीय खलबते रंगू लागली आहेत. एकीकडे सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढण्याचा निर्णय अनेकांच्या जिव्हारी लागला असताना, उमेदवार किमान सातवी उत्तीर्ण असावा, या अटीने मुरब्बी गावपुढाऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे.

तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींसाठी ८७ हजार ६३ मतदार आहेत. यामध्ये ४५ हजार २४२ पुरुष, तर ४१ हजार ८२१ स्त्री मतदार मतदानाचा हक्क बजावतील. ४१ ग्रामपंचायतींकरिता ११ आरओ व तेवढ्याच एआरओंची नेमणूक करण्यात आली. १३९ प्रभागांकरिता होणाऱ्या या निवडणुकीसाठी १५५ मतदान केंद्रे आहेत. पाच वर्षे सत्तेची फळे चाखलेल्यांना मात्र मतदारांची पसंती नसून, विधानसभा, लोकसभेच्या वेळी हेवेदावे विसरून हेच सदस्य कोणत्याही पक्षात अर्थपूर्ण प्रवेश करीत असल्याने मतदारांचा विश्वास कमी झाल्याचे चित्र आहे. सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर होणार असल्याने निवडणुकीचा खर्च सर्वांनीच सारखा करावा, यावर मतैक्य होऊ लागले आहे.

‘रामराम’, ‘नमस्कार’ वाढले

ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होताच कधी न बोलणारे बोलू लागले, तर रामराम, नमस्काराला अधिक महत्त्व आले आहे, एकमेकांची ख्यालीखुुशालीसुद्धा विचारली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने आता सरपंचाकरीता शालेय शिक्षणाची अट सातवी उत्तीर्ण असणे अनिवार्य केल्याने अनेकांची भंबेरी उडाली आहे. आदिवासीबहुल भागात केवळ आरक्षणावर सरपंचपद मिळत असल्याने निरक्षर वा अल्पशिक्षित सदस्यांनाही सरपंचपदाची संधी मिळत होती. परंतु, निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे .