शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

वरूड तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींमध्ये राजकीय खलबते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:17 IST

वरूड : तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींमध्ये राजकीय खलबते रंगू लागली आहेत. एकीकडे सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढण्याचा निर्णय अनेकांच्या जिव्हारी लागला ...

वरूड : तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींमध्ये राजकीय खलबते रंगू लागली आहेत. एकीकडे सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढण्याचा निर्णय अनेकांच्या जिव्हारी लागला असताना, उमेदवार किमान सातवी उत्तीर्ण असावा, या अटीने मुरब्बी गावपुढाऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे.

तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींसाठी ८७ हजार ६३ मतदार आहेत. यामध्ये ४५ हजार २४२ पुरुष, तर ४१ हजार ८२१ स्त्री मतदार मतदानाचा हक्क बजावतील. ४१ ग्रामपंचायतींकरिता ११ आरओ व तेवढ्याच एआरओंची नेमणूक करण्यात आली. १३९ प्रभागांकरिता होणाऱ्या या निवडणुकीसाठी १५५ मतदान केंद्रे आहेत. पाच वर्षे सत्तेची फळे चाखलेल्यांना मात्र मतदारांची पसंती नसून, विधानसभा, लोकसभेच्या वेळी हेवेदावे विसरून हेच सदस्य कोणत्याही पक्षात अर्थपूर्ण प्रवेश करीत असल्याने मतदारांचा विश्वास कमी झाल्याचे चित्र आहे. सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर होणार असल्याने निवडणुकीचा खर्च सर्वांनीच सारखा करावा, यावर मतैक्य होऊ लागले आहे.

‘रामराम’, ‘नमस्कार’ वाढले

ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होताच कधी न बोलणारे बोलू लागले, तर रामराम, नमस्काराला अधिक महत्त्व आले आहे, एकमेकांची ख्यालीखुुशालीसुद्धा विचारली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने आता सरपंचाकरीता शालेय शिक्षणाची अट सातवी उत्तीर्ण असणे अनिवार्य केल्याने अनेकांची भंबेरी उडाली आहे. आदिवासीबहुल भागात केवळ आरक्षणावर सरपंचपद मिळत असल्याने निरक्षर वा अल्पशिक्षित सदस्यांनाही सरपंचपदाची संधी मिळत होती. परंतु, निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे .