शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला राजकीय बाधा

By admin | Updated: May 7, 2017 00:06 IST

तत्कालीन वेळी राजकीय कुरघोडीत अडकलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या उभारणीबाबत महापालिकेतील सत्ताधिशांनी सोईस्कर मौन धारण केले आहे.

प्रशासनाचे प्रयत्न अपुरे : राजकीय इच्छाक्तीचा अभाव, महापालिका आयुक्तांनी घ्यावा पुढाकारप्रदीप भाकरे । लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तत्कालीन वेळी राजकीय कुरघोडीत अडकलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या उभारणीबाबत महापालिकेतील सत्ताधिशांनी सोईस्कर मौन धारण केले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर स्वच्छतेचा डोलारा असताना त्यातील अडसर कसा दूर होईल, यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करीत असले तरी महापालिकेतील राजकीय आघाडीवर सामसूम असल्याने हा तिढा सुटण्याऐवजी अधिक गुंतत चालला आहे.पीपीपी तत्वावर साकारण्यात येणाऱ्या १५.९८ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला राजकीय बाधा पोहोचली आहे.प्रकल्प उभारणीची प्रक्रिया रखडल्याचा फटका स्वच्छ सर्वेक्षणाला सामोरे गेलेल्या महापालिका यंत्रणेलाही बसला. या प्रकल्पाचे कार्यान्वयन न झाल्याने स्वच्छ शहरांच्या क्रमवारीत शहराचे गुणांकन माघारले आणि शहर पहिल्या शंभरातही येऊ शकले नाही. १०० कोटींचे स्वप्न चकनाचूर करून आता न्यायालयाच्या दालनात गेलेल्या मालमत्ता सर्वेक्षण व करनिर्धारणाच्या प्रकल्पानंतर रखडलेला महापालिकेतील हा दुसरा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.प्रकल्प प्रत्यक्षात केव्हा कार्यान्वित होईल, याचे उत्तर सत्ताधिशांसह यंत्रणेजवळ नाही. या प्रकल्पाच्या निविदा प्रकियेसह अन्य काही बाबींवर डिसेंबर २०१६ मध्ये आक्षेप नोंदवण्यात आला होता. त्याला सहा महिने उलटून गेल्यानंतरही हा तिढा सोडविण्यासाठी विद्यमान सत्ताधिशांनी कुठलाही पुढाकार घेतलेला नाही. नगरविकास विभागाने या प्रकल्पाचा चेंडू निरीच्या दालनात टोलवला आहे. तत्कालीन स्थायी समितीने शिक्कामोर्तब केल्यानंतर ‘कोअर प्रोजेक्ट’ या एजंसीशी करारनामा करण्याची तयारी पर्यावरण अधिकाऱ्यांनी चालविली असताना तत्कालीन सदस्य राजू मसराम यांनी या प्रक्रियेवर आक्षेप घेत मंत्रालयात धाव घेतली. नगरविकास विभागाने तीन चार महिने या प्रकल्पाबाबत आणि त्यातील त्रुट्यांबाबत वेळकाढू धोरण अवलंबविले व शेवटी या प्रकल्पाच्या योग्यतेचा चेंडू ‘नीरी’ कडे टोलविला.त्यातही प्रस्ताव तपासणीचे अडीच लाख रुपये घ्यायचे की कसे, असा प्रश्न नीरीला पडल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगतात. विशेष म्हणजे स्थायी समितीचे विद्यमान सभापती तुषार भारतिय यांनी या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेसह अन्य अनुषंगिक बाबींवर डिसेंबर १६ मध्ये आक्षेप घेतला होता. त्यावेळी महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत आक्षेप घेणाऱ्या तत्कालिन नगरसेवकांसाठी सादरीकरण करण्यात आले होते.त्यावेळी तुषार भारतिय यांनी आता कुठलाही आक्षेप नसल्याचे मान्य केले होते. आता तेच भारतिय सत्तेच्या परिघात आहेत.भारतिय यांच्यासह भाजपच्या सत्ताधिशांनी यात लक्ष घातले तर ते हा रखडलेला प्रकल्प चुटकीसरशी सोडवू शकतात. मात्र तूर्तास तरी या आघाडीवर स्मशानशांतता आहे. त्यामुळे प्रशासनही पेचात अडकले आहे.प्रकल्पाची निकड ओव्हरफ्लो झालेल्या सुकळी कंम्पोस्ट डेपोमध्ये ७ ते ८ लाख टन कचरा विनाप्रक्रिया पडून आहे. त्यात शहरातून निघणाऱ्या २०० ते २५० टन कचऱ्याची दिवसाकाठी भर पडते. दैनंदिन कचरा तसाच कंटेनरमध्ये पडून राहतो. याशिवाय राज्य शासनानेही नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारणे बंधनकारक केले आहे. त्याअनुषंगाने महापालिकेने पुढाकार घेऊन गतवर्षी निविदा प्रक्रिया राबविली. १५.९८ कोटी रुपये खर्च करुन दिवसाकाठी ४०० टन क्षमतेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याचा मार्ग प्रशस्त झाला होता.यात महापालिका आणि कोअर प्रोजेक्ट ही कंपनी प्रत्येकी ७.९९ कोटी रुपये खर्च करणार होती.