शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

पोलिसांना घ्यावा लागणार ‘झारीतील शुक्राचार्या’चा शोध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:08 IST

धारणी : हरिसाल वनविभागातील कार्यरत वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी ७ वाजता उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या मानसिक ...

धारणी : हरिसाल वनविभागातील कार्यरत वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी ७ वाजता उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. दिलेले काम वेळेत पूर्ण केल्यामुळे ते शेजारच्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात सलत होते. त्या कर्मचाऱ्यांनी डीएफओ विनोद शिवकुमारचे कान भरले. त्यामुळे विनोद शिवकुमारकडृून होणाऱ्या ‘मेंटली टॉर्चर’मध्ये भर पडली, असे दीपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. दीपाली यांच्याविरुद्ध शिवकुमार यांचे कान भरणारे कर्मचारी कोण? त्यांचा शोध घेतला जाणार आहे. तपासादरम्यान अनेक बाबींबा उलगडा होत जाईल, त्यात त्या झारीतील शुक्राचाऱ्यांची नावेदेखील समोर येण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी त्यांच्या हरिसाल वनपरिक्षेत्रात दिलेले कामकाज वेळेत पूर्ण केले जात होते. त्यामुळे हरिसाल वनपरिक्षेत्रातील कामकाजात इतर रेंजच्या पुढे जायला लागले. तेव्हा आजूबाजूच्या कर्मचाऱ्यांनी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याचे कान भरायला सुरुवात झाली. ते इतक्या हलक्या कानाचे निघाले, की त्यांनी कोणत्याही बाबीची चौकशी न करता दीपाली चव्हाण यांच्या नावाच्या नोटीस काढणे सुरू केले. काहीही खटकले दीपाली यांनाच वारंवार निलंबित करण्याची धमकी देऊन चार्जशिटची धमकी देत होते. त्यासह वारंवार दीपाली चव्हाण यांना नियमबाह्य कामे करण्यास भाग पाडत होते. कोणतीही अडचण समस्या सांगितली की, समजून न घेता कमीपणा दाखवण्याचे कारण शोधून गावकरी कर्मचाऱ्यांसमोर शिवीगाळ करून अपमानित करत होते. त्यामुळे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांचे कान आजूबाजूचे कोणते कर्मचारी भरत होते, याचा शोध घेणेसुद्धा महत्वाचे ठरले आहे. कारण कनिष्ठ कर्मचारी विनोद शिवकुमारच्या सावलीतसुद्धा उभे राहत नव्हते. त्यांच्या आक्रस्ताळ्या स्वभावामुळे त्यांच्याशी बोलणे तर कठीणच. त्यामुळे दीपाली यांच्याविषयी कान भरणारे कर्मचारी नक्कीच वरिष्ठ असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तशी चर्चा मेळघाटात रंगली आहे.

बॉक्स

गुगामाल वन्यजीव विभागात चार वनपरिक्षेत्र कार्यालये

गुगामाल वन्यजीव विभागातील चार वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांपैकी हरिसाल वनपरिक्षेत्रातच फक्त महिला वनाधिकारी कार्यरत होत्या. इतर तीनही वनपरिक्षेत्रात पुरुष अधिकारी कार्यरत आहेत. दीपाली चव्हाण या धाडसी आणि प्रामाणिक असल्यामुळे त्यांनी पुरुषाला लाजवेल, अशी कामे करून मांगिया, मालूर व चौराकुंड या तीन गावांचे पुनर्वसन केले. रोजगार हमीची कामे करून सर्वाधिक आदिवासी बांधवांना रोजगार मिळवून दिला. त्यामुळे त्यांचे हरिसाल रेंज अग्रक्रमावर आले. ते नेमके आजूबाजूच्या कोणत्या कर्मचाऱ्यांना खटकले, याचा शोध घेणे गरजेचे झाले आहे.