शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

सुप्रीम कोर्टात पोलीस देणार आव्हान

By admin | Updated: July 5, 2014 00:32 IST

शहरातील बहुचर्चीत अमोल वैद्य हत्याकांडप्रकरणी तीन आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर...

अमरावती : शहरातील बहुचर्चीत अमोल वैद्य हत्याकांडप्रकरणी तीन आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली. उच्च न्यायालयाच्या या आदेशाला नांदगाव पेठ पोलीस सुप्रीम कोर्टात अपिल दाखल करून आव्हान देणार आहेत. अमोल वैद्य यांची १३ आॅगस्ट २००६ रोजी चार मारेकऱ्यानी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रिंग रोड मार्गावर निर्घूण हत्या केली होती. याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून सैफुल्ला खान, संजय कानोसे, मेहबूब खान पठाण यांच्यासह चौघांना अटक केली होती. यातील चौथ्या आरोपीबद्दल कुठलेही ठोस पुरावे न मीळाल्याने येथील न्यायालयाने त्याची निर्दोश सुटका केली. उर्वरीत तीन आरोपीवर आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या आदेशाला बचाव पक्षांच्या वकिलाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान करुन अपील दाखल केली होती. ४ मार्च २०१४ व ६ मार्च २०१४ रोजी न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आरोपींची निर्दोष सुटका केली. उच्च न्यायालयाचा हा निर्णय पोलिसांना मान्य नव्हता. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाविरूध्द सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल करण्याचा विनंती अर्ज सहसचिव विधी व न्यायविभाग महाराष्ट्र शासन नागपूर यांच्याकडे दाखल केला होता.९ जून २०१४ रोजी पोलिसांना सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल करण्याची परवानगी प्राप्त झाली आहे. नांदगाव पेठ पोलीस याप्रकरणी लवकरच सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल करणार असल्याची माहिती विधी अधिकारी अनिल विश्वकर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.