शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

जामीन रद्द करण्यासाठी पोलीस सर्वोच्च न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2016 00:09 IST

सात महिन्यांपूर्वी घडलेल्या अमित बटाऊवाले हत्याकांडातील चार आरोपींना उच्च न्यायालयातून मिळालेला जामीन रद्द करण्यासाठी ...

गृहमंत्रालयाची परवानगी : २९ मार्च रोजी करणार अर्ज अचलपूर : सात महिन्यांपूर्वी घडलेल्या अमित बटाऊवाले हत्याकांडातील चार आरोपींना उच्च न्यायालयातून मिळालेला जामीन रद्द करण्यासाठी पोलीस आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. त्यासाठी राज्याचे मुख्य सचिव व गृहमंत्रालयाने परवानगी दिली आहे. आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची अचलपूरच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. संपूर्ण जिल्ह्यात गाजलेल्या अमित बटाऊवाले हत्याकांडातील १५ आरोपी अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात होते. पैकी मो. शरीक अब्दुल रहमान, मो. मतीन मो. जाफर, अशफाक ऊर्फ मो. जाफर यांना २९ फेब्रुवारी तर मो. आदील मो. अन्वर यांना २ मार्च २०१६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून जामीन मंजूर करण्यात आला होता. पोलीस या निर्णयाविरूध्द सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याने सर्वोच्च न्यायालयातून या आरोपींचा जामीन नामंजूर झाल्यास त्यांना पुन्हा कारागृहात जावे लागेल. जामीन नामंजूर झाल्यास कारागृहातअमरावती : अचलपूर येथे मागील वर्षी ११ आॅगस्टला रेती तस्करांच्या बारूद गँगने अमित बटाऊवाले नामक युवकाची हत्या करून त्याचे वडील मोहन बटाऊवाले यांना गंभीर जखमी केले होते. या हत्याकांडात नगरसेवक मो.शाकीर गुलहुसेन याचेसह १५ आरोपींना अचलपूर पोलिसांनी टप्प्याटप्प्याने अटक केली होती. आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस अधिकारी नरेंद्र ठाकरे व तपास अधिकारी ब्राह्मणवाडा थडीचे ठाणेदार अजय आकरे या दोघांनी कसब पणाला लावले होते. हत्याकांडात सरकारतर्फे मुंबई येथील उमेशचंद्र यादव पाटील यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली होती. दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाला २१ ते २८ मार्च रोजी सुटी असल्याने २९ मार्च रोजी पोलीस या चार आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करणार आहेत. त्यासाठी पोलीस २७ मार्च रोजी दिल्लीला रवाना होणार आहेत. (शहर प्रतिनिधी)