शहरं
Join us  
Trending Stories
1
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
2
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
3
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
4
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
5
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
6
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
7
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
8
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
9
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
10
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
11
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
12
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
13
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
14
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
15
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
16
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
17
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
18
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
20
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला

विजयाच्या जल्लोषात पोलिसांची आडकाठी

By admin | Updated: February 16, 2015 00:18 IST

क्रिकेट विश्वचषकात पारंपारिक प्रतिद्वंद्वी पाकिस्तानचा भारताने पराभव करताच क्रिकेटप्रेमी नागरिक, शिवसेना आणि काही सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी राजकमल चौकात जल्लोष केला.

अमरावती : क्रिकेट विश्वचषकात पारंपारिक प्रतिद्वंद्वी पाकिस्तानचा भारताने पराभव करताच क्रिकेटप्रेमी नागरिक, शिवसेना आणि काही सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी राजकमल चौकात जल्लोष केला. परंतु मिष्ठान्नाचे वाटप सुरू असतानाच पोलिसांनी या क्रिकेटप्रेमींना तेथून हुसकावून लावले.त्यामुळे काही काळ वातावरण तणावसदृश झाले होते. या कारवाईने नागरिकांच्या आनंदावर विरजण पडल्याने पोलिसांविरूध्द रोष निर्माण झाला होता. काहींनी तर चक्क ‘पोलीस मुर्दाबाद’च्या घोषणा देखील दिल्या. देशभरात भारताच्या विजयाचा जल्लोष सुरू असताना शहरात मात्र पोलिसांनी आडकाठी केली. ही घटना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांची अरेरावीअमरावती : सध्या देशावरच नव्हे तर जगावर क्रिकेटचा ज्वर चढलाय. विश्वचषकातील सर्वाधिक आकर्षण असते ते भारतविरूध्द पाकिस्तान या सामन्याचे. भारताने विश्वचषकात पाकिस्तानला हरविण्याची परंपरा कायम ठेवल्याने देशभक्त क्रिकेटप्रेमींचा उत्साह ओसंडून वाहत होता. सामना संपताच क्रिकेटप्रेमी नागरिक व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी राजकमल चौकात ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा करण्यास सुरूवात केली. काही चिमुकले देखील हाती तिरंगे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना थांबवून मिष्ठान्नांचे वाटप करण्यात आले. यावेळी राजकमल चौकातील वाहतूक सिग्नल बंद होते. शिवाय रविवारचा दिवस असल्याने वाहतुकही फारशी नसल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. जल्लोष सुरू होऊन अवघी १५ मिनिटे होत नाहीत तोच कोतवाली पोलिसांचा ताफा राजकमल चौकात पोहोचला. पोलिसांनी उत्साहात नाचणाऱ्या तरूणांना अडविले. इतकेच नव्हे तर ढोल-ताशे वाजविण्यासही मज्जाव केला आणि त्यांना चौकातून हुसकावून लावले. त्यामुळे क्रिकेटप्रेमी नागरिकांची पोलिसांसोबत वादावादी झाली. बँड वादकाला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यामुळे वातावरण अधिकच तापले. पोलीस निघून गेल्यानंतर तेथे उपस्थित काही तरूणांनी ‘पोलीस मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्यात. तूर्तास याप्रकरणी कोणावरही गुन्हे नोंदविण्यात आले नव्हते.