शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

सांगावे पोलिसांनी, सोसावे किती अमरावतीकरांनी?

By admin | Updated: November 24, 2014 22:48 IST

रविवारचा गोळीबार शहरातील शांतता भंग करून गेला. विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या या इंद्रपुरीत सामान्य माणसाचा डोळा अलिकडच्या काळात तसाही निवांतपणे मिटू शकलेला नाही.

गणेश देशमुख - अमरावतीरविवारचा गोळीबार शहरातील शांतता भंग करून गेला. विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या या इंद्रपुरीत सामान्य माणसाचा डोळा अलिकडच्या काळात तसाही निवांतपणे मिटू शकलेला नाही. काळजात धस्स व्हावे अशा गुन्हेगारी कारवायांची मालिकाच शहरात सुरू झाली आहे. गुन्हेगारांवरील धाक गमावलेल्या शहर पोलिसांच्या डोळ्यांदेखत दबदबा निर्माण करण्याची होडच जणू असामाजिक तत्त्वांमध्ये लागली आहे.रविवारी पठाणपुऱ्यातील चांदणी चौकात भरदिवसा गोळीबार झाला. पूर्वी शेख जफरसोबत राहणाऱ्या अहेफाज खानने त्याचे गुन्हेगारीतील स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ही 'फायरींग' केली. लोकांनी ती बघितली. लोकांनी बघावी याच उद्देशाने त्याने ती केलीही होती. या घटनेनंतर कुटुंबियांसोबत घालविण्यासाठी मिळणारा हक्काचा रविवार शहरवासियांना दहशतीच्या छायेत घालवावा लागला. 'भाईगिरी'ला विटलेल्या सामान्य माणसाच्या काळजात आणखी एकदा धस्स झाले. 'गँगवार'चे भय अस्वस्थ करून गेले. कुण्या गुंडाने स्वत:च्या टोळीचा दबदबा निर्माण करण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी मुद्दामहून 'फायरींग' करावे ही घटनाच अमरावती शहर पोलिसांची गुन्हेगारी नियंत्रणावरील पकड सुटल्याचे जाहीर करणारी आहे. रविवारच्या घटनेतील गांभीर्य येथेच संपत नाही. फायरींगनंतर शेख जफर टोळीचा सदस्य शेख नईम आणि विरोधी टोळीचा म्होरक्या अहेफाज खान हे नागपुरी गेट पोलीस ठाण्यासमोर तक्रार नोंदविण्याच्या निमित्ताने आमनेसामने आले. तेथेच त्यांनी एकमेकांशी 'फ्री स्टाईल' सुरू केली. महत्प्रयासांनी पोलिसांनी त्यांना रोखले. ज्यांच्या खांद्यावर निवांत मान ठेवता यावी, ज्यांच्या भरवशावर सुरक्षिततेची खात्री बाळगता यावी, त्या पोलिसांचे शक्तिस्थळ असलेल्या पोलीस ठाण्यासमोरच एकमेकांशी भिडताना गुन्हेगारांना यत्किंचितही भय वाटत नसेल तर सामान्यजनांनी त्याचा काय अर्थ काढावा? गुन्हेगारांच्या टोळ्या शहरात सक्रीय असतात. त्यांच्याकडे बंदुका असतात. टोळ्या निर्माण करण्याच्या ते योजना आखतात. दबदबा निर्माण करण्यासाठी भरवस्तीत फायरींग करण्याचे इरादे ते बाळगतात. नियोजितपणे फायरींग करतात. अपेक्षित असलेली दहशत निर्माण करतात. पुन्हा उजळ माथ्याने तक्रार करण्यासाठी पोलीसठाणे गाठतात. ‘डॉन’पणा सिद्ध करण्यासाठी तेथेही एकमेकांशी भिडतात आणि आमच्या पोलिसदलाला यापैकी एकाही घटनेची खबरबात नसते. सुमारे दोन हजार पोलिसांचा फौजफाटा हाताशी असताना गुन्हेगारांच्या या कारवायांची 'टीप'ही मिळू शकत नसेल तर यालाच म्हणायचे काय पोलिसिंग, असा प्रश्न पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांना विचारावासा वाटतो.