शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस म्हणतात, ‘इकडे आड...’

By admin | Updated: February 22, 2016 00:42 IST

फे्रजरपुरा वाहतूक शाखेत कार्यरत दोन पोलिसांच्या निलंबनाचे खात्यात तीव्र पडसाद उमटले आहे.

निलंबनाचे पडसाद : वाहतूक शाखेत खळबळ, कारवाई करायची कशी?अमरावती : फे्रजरपुरा वाहतूक शाखेत कार्यरत दोन पोलिसांच्या निलंबनाचे खात्यात तीव्र पडसाद उमटले आहे. रीतसर चालान देऊन पावती फाडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळत असेल तर काम करायचे कसे, असा प्रश्न यानिमित्ताने वाहतूक कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. शनिवारी २० फेब्रुवारीला दुपारी ५ च्या सुमारास गजानन तायडे आणि राजेश इंगोले (ब.नं.१२२८) या वाहतूक कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तांच्या आदेशाने निलंबित करण्यात आले. आदेश डावलून ते चालान बुकचा वापर करताना आयुक्तांच्या नजरेस पडले होते. निलंबन आदेश धडकल्यानंतर इर्विन चौकातील वाहतूक शाखेसह अन्य कार्यालयातही खळबळ माजली. ‘कारवाई केली तरी कारवाई आणि नाही केली तरी कारवाई’ अशा परिस्थितीत वाहतूक कर्मचाऱ्यांसाठी ‘इकडे आड तिकडे विहिर’ अशी नवी विवंचना निर्माण झाल्याची प्रतिक्रिया अनेक वाहतूक पोलिसांनी नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’कडे व्यक्त केली. वाहतूक नियंत्रण ही आमची जबाबदारी आहेच. मात्र नियमभंग करणाऱ्यास मग तसेच सोडून द्यायचे का? आणि तसे झाल्यास कारवाईचा बडगा उगारला जाणार नाही, याची शाश्वती देता येणेसुध्दा शक्य नसल्याची या कर्मचाऱ्यांची संयुक्त प्रतिक्रिया आहे. यासंदर्भात निलंबित झालेल्या एका पोलिसाने आपली व्यथा मांडली. हेड मोहररने चालान बुक दिले होते. त्यामुळेच पोलीस पेट्रोलपंपानजीक चालान फाडले, असे त्याचे म्हणणे आहे.शहरातील मुख्य चार चौकांसह पीएसआय, एपीआय आणि पीआयकडेच चालानबुक ठेवण्याचे आदेश झाल्यानंतर अन्य कर्मचाऱ्यांजवळचे चालान बुक काढून घेण्यात आले. शुक्रवारी पोलीस पेट्रोलपंपाजवळ कार्यरत असलेल्या वाहतूक कर्मचाऱ्यांकडून केवळ १ केस करण्यात येऊन १०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला होता. त्यावर पोलीस उपायुक्तांनी संबंधित निरीक्षकांना जाबही विचारला. त्या पार्श्वभूमीवर फे्रजरपुरा वाहतूक विभागातील हेडमोहररने त्या वाहतूक कर्मचाऱ्यांना चालान बुक दिल्याचे अन्य वाहतूक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. शनिवारी दुपारी ५ च्या सुमारास डीसीपी मोरेश्वर आत्राम यांनी या वाहतूक कर्मचाऱ्यांना एका पोलीस कर्मचाऱ्याच्या विनाक्रमांकाच्या दुचाकीवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. कारवाई करीत असतानाच आयुक्त त्या मार्गावरून गेले व पुढील कारवाई केल्या गेली.यंत्रणेचा उपायुक्तांशी असहकारअपूर्वा देऊळगावकरच्या अपघाती मृत्यूनंतर का होईना वाहतूक नियंत्रणाचा प्रयत्न होऊ लागला. उपायुक्त नितीन पवार यांनी याबाबत स्तुत्य पुढाकार घेतला. मात्र अन्य यंत्रणेचे त्यांना फारसे सहकार्य मिळू शकले नाही. फंडिंग येईपर्यंत अन्य यंत्रणा कामाला लागणार नाहीत. त्यामुळे निव्वळ कागदी घोडे नाचवून सहकार्याचा बागुलबुवा करणे सुरू आहे. इर्विन चौकातील वाहतूक कार्यालयाजवळ गतिरोधक बनविण्यात यावे, अशा मागणीचे पत्र वाहतूक शाखेने वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठविले. मात्र अद्यापपर्यंत पोलिसांनीच मागणी केलेल्या, गतिरोधकालाही मुहूर्त मिळालेला नाही. अन्य यंत्रणेचा असहकार यातून स्पष्ट होतो.