शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

६० गावांना मिळणार सक्षम पोलीस पाटील

By admin | Updated: October 10, 2015 00:38 IST

शासनाच्या निर्देशाप्रमाणे प्रशासनाने आपले धोरण राबविले तर सर्वसामान्य माणसांना न्याय मिळू शकतो, हे पोलीस पाटील ....

पारदर्शक परीक्षा : गरीब, हुशार तरुणांना संधीधामणगाव रेल्वे : शासनाच्या निर्देशाप्रमाणे प्रशासनाने आपले धोरण राबविले तर सर्वसामान्य माणसांना न्याय मिळू शकतो, हे पोलीस पाटील पदाच्या अलीकडेच झालेल्या परीक्षेवरून पहायला मिळते़ ८४ पैकी ६० गावातील गरीब, होतकरू, हुशार, युवक, युवती या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. पोलीस पाटीलपद भरणे म्हणजे ‘वशिलेगिरी’ या शब्दालाच चांदूररेल्वे उपविभागात लगाम बसला आहे़ पारदर्शकपणे परीक्षा घेतल्यामुळे आपल्याला पुढील काळात संधी मिळणार, याचा आनंद हलाखीच्या परिस्थितीत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तरूणांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे़गावातील अत्यंत महत्त्वाचे, मानाचे आणि तेवढ्याच जबाबदारीचे पद म्हणजे पोलीस पाटील. गावातील हालचालींमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असते़ आजही गावात दोन कुटुंबात वाद झाल्यास पोलीस पाटलाला बोलावून मध्यस्थी केली जाते़ सर्वसामान्यांचा आधारवड म्हणजे पोलीस पाटील अशीच त्यांची प्रतिमा आहे.महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानात पोलीस पाटलाची महत्त्वाची भूमिका असते. या पार्श्वभूमिवर तालुक्यातील तब्बल ८४ गावांतील पोलीस पाटीलपदे अनेक वर्षांपासून रिक्त होती़ त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. विभागीय आयुक्त व जिल्हाप्रशासनाकडूनपरवानगी मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे यांनी पदभरती प्रक्रियेला सुरूवात केली़ संबंधित गावात आरक्षित पदाप्रमाणे जाहीरनामा लावण्यात आले. तब्बल ८०६ उमेदवारांनी या परीक्षेकरिता अर्ज सादर केलेत़ त्यांना परीक्षेचा प्रवेशपत्र पाठवून ४ आॅक्टोबर रोजी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत तब्बल १२१ विद्यार्थी उर्तीण झाले आहेत़ गुरूवारी चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तहसील कार्यालयात पहिल्या तीन गुणवंतांची यादी लावण्यात आली़ विशेषत: पोलीस पाटीलपदावर अनेकांची नजर असताना गावातील शेतात राब-राब राबणाऱ्या आणि अभ्यासात हुशार असणाऱ्या गरीब मुलामुलींची नावे यादीत झळकलीत. सायंकाळी आपले नाव या यादीत असल्याचे पाहून त्यांना आर्श्चयाचा धक्का बसला. एकीकडे भ्रष्टाचार व वशिलेगिरीमुळे कोणत्याही उमेदवारांचा नंबर या यादीत लागणे कठीण असल्याचा ठाम समज काही जणांचा असताना परीक्षेसाठी घेतलेले अथक परिश्रम त्यांच्या नजरेतून झळकत होते़ महसूल प्रशासनाने पारदर्शकपणे घेतलेल्या पोलीस पाटीलपदाच्या परीक्षेचे समाधान त्यांच्या चेहेऱ्यावर दिसून येत होते. जिल्ह्यात पोलीस पाटील पदे भरताना विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी विशेष लक्ष दिले़ पारदर्शक परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाल्याचे उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे यांनी सांगितले़ उर्वरित २४ गावांतील पोलीस पाटील पदे वरिष्ठ प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे भरण्यात येतील, असे व्यवहारे म्हणाले़