शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

६० गावांना मिळणार सक्षम पोलीस पाटील

By admin | Updated: October 10, 2015 00:38 IST

शासनाच्या निर्देशाप्रमाणे प्रशासनाने आपले धोरण राबविले तर सर्वसामान्य माणसांना न्याय मिळू शकतो, हे पोलीस पाटील ....

पारदर्शक परीक्षा : गरीब, हुशार तरुणांना संधीधामणगाव रेल्वे : शासनाच्या निर्देशाप्रमाणे प्रशासनाने आपले धोरण राबविले तर सर्वसामान्य माणसांना न्याय मिळू शकतो, हे पोलीस पाटील पदाच्या अलीकडेच झालेल्या परीक्षेवरून पहायला मिळते़ ८४ पैकी ६० गावातील गरीब, होतकरू, हुशार, युवक, युवती या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. पोलीस पाटीलपद भरणे म्हणजे ‘वशिलेगिरी’ या शब्दालाच चांदूररेल्वे उपविभागात लगाम बसला आहे़ पारदर्शकपणे परीक्षा घेतल्यामुळे आपल्याला पुढील काळात संधी मिळणार, याचा आनंद हलाखीच्या परिस्थितीत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तरूणांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे़गावातील अत्यंत महत्त्वाचे, मानाचे आणि तेवढ्याच जबाबदारीचे पद म्हणजे पोलीस पाटील. गावातील हालचालींमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असते़ आजही गावात दोन कुटुंबात वाद झाल्यास पोलीस पाटलाला बोलावून मध्यस्थी केली जाते़ सर्वसामान्यांचा आधारवड म्हणजे पोलीस पाटील अशीच त्यांची प्रतिमा आहे.महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानात पोलीस पाटलाची महत्त्वाची भूमिका असते. या पार्श्वभूमिवर तालुक्यातील तब्बल ८४ गावांतील पोलीस पाटीलपदे अनेक वर्षांपासून रिक्त होती़ त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. विभागीय आयुक्त व जिल्हाप्रशासनाकडूनपरवानगी मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे यांनी पदभरती प्रक्रियेला सुरूवात केली़ संबंधित गावात आरक्षित पदाप्रमाणे जाहीरनामा लावण्यात आले. तब्बल ८०६ उमेदवारांनी या परीक्षेकरिता अर्ज सादर केलेत़ त्यांना परीक्षेचा प्रवेशपत्र पाठवून ४ आॅक्टोबर रोजी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत तब्बल १२१ विद्यार्थी उर्तीण झाले आहेत़ गुरूवारी चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तहसील कार्यालयात पहिल्या तीन गुणवंतांची यादी लावण्यात आली़ विशेषत: पोलीस पाटीलपदावर अनेकांची नजर असताना गावातील शेतात राब-राब राबणाऱ्या आणि अभ्यासात हुशार असणाऱ्या गरीब मुलामुलींची नावे यादीत झळकलीत. सायंकाळी आपले नाव या यादीत असल्याचे पाहून त्यांना आर्श्चयाचा धक्का बसला. एकीकडे भ्रष्टाचार व वशिलेगिरीमुळे कोणत्याही उमेदवारांचा नंबर या यादीत लागणे कठीण असल्याचा ठाम समज काही जणांचा असताना परीक्षेसाठी घेतलेले अथक परिश्रम त्यांच्या नजरेतून झळकत होते़ महसूल प्रशासनाने पारदर्शकपणे घेतलेल्या पोलीस पाटीलपदाच्या परीक्षेचे समाधान त्यांच्या चेहेऱ्यावर दिसून येत होते. जिल्ह्यात पोलीस पाटील पदे भरताना विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी विशेष लक्ष दिले़ पारदर्शक परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाल्याचे उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे यांनी सांगितले़ उर्वरित २४ गावांतील पोलीस पाटील पदे वरिष्ठ प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे भरण्यात येतील, असे व्यवहारे म्हणाले़