शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

फिरते पोलीस ठाणे अभियान ठरले ‘रोल मॉडेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 22:57 IST

मागील तीन वर्षापासून भंडारा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोलीस प्रशासनाने नवनवीन प्रयोग केले आहेत. गावातील वाद गावातच मिटावा, क्षुल्लकशा प्रकरणामुळे त्याचा फटका कुणालाही बसू नये. वेळ, श्रम आणि पैसाची बचत व्हावी यासाठी फिरते पोलीस ठाणे हा उपक्रम सुरू केला.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षक विनिता साहू : सिटीझन कॉप ठरणार गुन्हेगारीसाठी कर्दनकाळ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मागील तीन वर्षापासून भंडारा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोलीस प्रशासनाने नवनवीन प्रयोग केले आहेत. गावातील वाद गावातच मिटावा, क्षुल्लकशा प्रकरणामुळे त्याचा फटका कुणालाही बसू नये. वेळ, श्रम आणि पैसाची बचत व्हावी यासाठी फिरते पोलीस ठाणे हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाला जनतेचा भरभरून प्रतिसाद लाभत असून आता हा उपक्रम राज्यातील विविध पोलीस ठाण्यात अंमलात आणला असून फिरते पोलीस ठाणे हे ‘रोल मॉडेल’ ठरल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी सांगितले.फिरते पोलीस ठाण्याच्या यशस्वी प्रयोगानंतर त्या ‘लोकमत’शी बोलत होत्या. राज्यात आजपर्यंत कोणत्याही जिल्ह्यात फिरते पोलीस ठाणे ही संकल्पना नाही. गावात कुणाला तक्रार नोंदवायची असेल तर त्यांना पोलीस ठाण्यात जाण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु पोलीस अधीक्षक साहू यांनी पुढाकार घेत पोलीस ठाणेच जनतेपर्यंत नेण्याचा संकल्प करून हा उपक्रम सुरू केला.भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या लहान मोठ्या गावात फिरते पोलीस ठाणे पथक जावून नागरिकांच्या तक्रारी स्वीकारतात.या तक्रारींचे निराकरण त्याच ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातो. आतापर्यंत शंभराच्यावर गावात हे फिरते पोलीस ठाणे पथक पोहोचले आणि नागरिकांच्या हजारो तक्रारींचे निराकरण करण्यात आले. हा उपक्रम आजही सुरूच आहे. दरम्यान, या उपक्रमाची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा उपक्रम राज्यातील सर्वच जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी या नाविण्यपूर्ण उपक्रमाबद्दल त्यांनी पोलीस अधीक्षक विनिता साहू यांना गौरविले होते.अवैधधंदेमुक्तीसाठी धाडसत्रभंडारा जिल्ह्यात आजही मोठ्या प्रमाणात दारूची अवैध विक्री, घरफोडी, वाहनचोरीच्या अनेक घटना घडलेल्या असून २०१६ मध्ये खूनाच्या २३ घटना घडल्या होत्या त्यापैकी २० घटनांमधील आरोपींना अटक करण्यात आली.दरोड्याचे दोन आणि घरफोडीचे ३९, सोनसाखळी पळवून नेल्याच्या आठ घटना उघडकीस आणले आहेत. त्यापूर्वी आयपीलच्या धाडीत ३० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय जिल्ह्यात कुठेही अवैध व्यवसाय सुरू असल्यास त्याची माहिती देण्यासाठी कक्ष सुरू करण्यात आला असून नागरिकांनी निसंकोचपणे तक्रारी कराव्यात असे आवाहनही केले आहे.‘निर्भय बनो’ उपक्रमाला प्रतिसादशिक्षण घेण्याच्या वयात केवळ आमिषांचे प्रलोभन दाखवून त्यांना पळवून नेण्याचे प्रमाण अधिक आहे. यात समज नसलेल्या लहान मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण खूप आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासत जिल्हा पोलीस प्रशासनाने भंडारा, तुमसर, साकोली आणि पवनी या चारही उपविभागातील शाळांमधील कार्यशाळा घेऊन विद्यार्थिनीमध्ये जनजागृती करण्यात आली. या कार्यशाळेत ज्या विद्यार्थिनीने सहभाग घेऊन हा विषय समजून घेतला त्यांना इतर विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या उपक्रमात जिल्ह्यातील दोन हजाराहून अधिक मुलींनी सहभाग घेतला. या उपक्रमासाठी यशदाचे प्रशिक्षक, डॉक्टर्स, स्त्रीरोग तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे, यासाठी सर्वांना आमंत्रित केल्याचे विनिता साहू यांनी ‘सांगितले.‘टेक-एक्स्पो’च्या माध्यमातून जनजागृतीभंडारा जिल्ह्यातील जनतेला सायबर गुन्हेगारीची माहिती होऊन जनजागृती व्हावी या उद्देशाने पोलीस मैदानावर टेक-एक्सपो या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. याशिवाय वाहन चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात न जाता घरबसल्या करता यावी, यासाठी ‘सीटीझन कॉप’ याविषयी जनजागृती करण्यात आली. आता तर दरवर्षी टेक एक्सपो या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यात अत्याधुनिक सायबर सेलचे कामकाज अवघ्या सहा दिवसात पूर्ण करण्यात आले होते. याच तंत्राचा वापर करून कुख्यात वाघ तस्कर कुट्टू पारधीला अटक करण्यात मदत झाल्याचे साहू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.