शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

विष घेतलेल्या तरुणाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू, डॉक्टरवर हलगर्जीपानाचा आरोप, नातेवाईक संतप्त

By प्रदीप भाकरे | Updated: June 23, 2024 23:39 IST

रुग्णालयाला पोलीस छावणीचे स्वरूप  

प्रदीप भाकरे, अमरावती : येथील राजापेठस्थित एका खाजगी रुग्णालयात रविवारी रात्री आठच्या सुमारास एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी 12 वाजतापासून रात्री आठ वाजेपर्यंत दवाखान्यातील वीज पुरवठा खंडित असल्याने त्याच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे तो दगवाल्याचा आरोप करून नातेवाईकांनी आक्रोश केला. परिणामी राजापेठ पोलिसांना धाव घ्यावी लागली. रात्री 11 पर्यंत तो तणाव निवळलेला नव्हता.            

तुषार रमेशसिंह चव्हाण (वय 23 वर्ष, रा. बेलपुरा) असे मृताचे नाव आहे. परवा त्याने विषारी द्रव्य घेतल्याने त्याला नजीकच्याच खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र रविवार सकाळपासून विद्युत पुरवठा खंडित झाला.जेनरेटरच्या दुरुस्तीमध्ये अनेक तास वाया गेले. अशात तो रात्रीच्या वेळी दगावला. या प्रकरणात मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात चांगलाच रोष व्यक्त केला. आमदार रवी राणा यांचे बंधू सुनील राणा व माजी नगरसेविका राधा कुरील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणीही ऐकायला तयार नसल्याने राजापेठ पोलिसांना पाचारण  करावे लागले.

संबंधित डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल होईपर्यंत आपण मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा घेतल्याने रुग्णालयातील तणाव वृत्त लिहिसतोवर निवळलेला नव्हता. बेलपुरा येथील तरुणाई व नातेवाईकांनी मोठा रोष व्यक्त करत तेथे गर्दी केली आहे. राजापेठचे ठाणेदार महेंद्र अंभोरे हे रुग्णालयात दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे त्याने आत्महत्या का केली, ते कारण शोधून संबंधितंवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. रुग्णालयाबाहेर अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल