शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शकुंतलेच्या उद्धाराकरिता कविसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 21:59 IST

अचलपूर ते मूर्तिजापूर लोहमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून शकुंतलेचा उद्धार व्हावा, ती अधिक सक्षमपणे व्हावी, यांसह तिच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याकरिता साहित्यिकांनी चक्क शकुंतलेतच कविसंमेलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देशब्दांचा जागर : सरकारचे लक्ष वेधण्याकरिता साहित्यिकांचा उपक्रम, खासदारही करणार प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर ते मूर्तिजापूर लोहमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून शकुंतलेचा उद्धार व्हावा, ती अधिक सक्षमपणे व्हावी, यांसह तिच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याकरिता साहित्यिकांनी चक्क शकुंतलेतच कविसंमेलन करण्याचा निर्णय घेतला आहे. १६ डिसेंबर रोजी अचलपूर-दर्यापूर प्रवासादरम्यान धावत्या शकुंतलेत साहित्यिक वऱ्हाडी कवी शब्दांचा जागर मांडणार आहेत. यात खा. आनंदराव अडसूळ यांच्यासह अनेक गणमान्य तिकीट काढून हा रेल्वे प्रवास करणार आहेत.दिवंगत खा. सुदाम देशमुख यांच्यानंतर आनंदराव अडसूळ हे शकुंतलेतून प्रवास करणारे दुसरे खासदार ठरतील. या कविसंमेलनाच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर शकुंतला हाउसफुल्ल धावणार आहे. तिचे चारही डबे खचाखच भरतील. प्रतिभा साहित्य संघाच्या विद्यमाने हा अभिनव उपक्रम होत आहे.प्रतिभा साहित्य संघाचे अध्यक्ष विठ्ठल कुलट व जितेंद्र रोडे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. या कविसंमेलनात सतीश तराळ, अनिल पाटील, विजय सोसे, गजानन मते, राजा धर्माधिकारी, नितीन देशमुख, मंगेश वानखडे, गौतम गुडधे, राजीव शिंदे, ओमप्रकाश ढोरे, चंद्रकांत तारे, प्रवीण कावरे, प्रशांत कोल्हे, गौतम खोब्रागडे या कवींसह काशीनाथ बराटे, प्रमोद गारोडे, एकनाथ तट्टे, रूपेश ढेपे, प्रवीण पाटील, सुनील भालेराव व नागरिक तसेच मित्रमंडळीचा सहभाग राहणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहेअचलपुरातून प्रारंभअचलपूर रेल्वे स्थानकावर सकाळी १० पासून कवी, साहित्यिक, गणमान्य नागरिक व नेते शकुंतलेकरिता उपस्थित राहतील. शकुंतला येण्यापूर्वीच शब्दांचा जागर सुरू होईल. खा. अडसूळ, नगराध्यक्ष सुनीता फिसके, पं.स.सभापती देवेंद्र पेटकर, अचलपूर बाजार समितीचे सभापती अजय टवलारकर, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, सुरेखा ठाकरे, केवलराम काळे, नयना बच्चू कडू, सुरेश ठाकरे, गजानन कोल्हे आदी उपस्थित राहतील.अंजनगावात स्वागतअचलपूरहून निघालेल्या मंडळींचे दुपारी अडीच वाजता अंजनगाव रेल्वे स्थानकावर आमदार रमेश बुंदिले व नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे स्वागत करतील. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रेमकुमार बोके, माजी सभापती शशिकांत मंगळे, प्रवीण पेटकर, बंडू येवले, कपिल देशमुख यांची उपस्थिती राहील.समारोप दर्यापुरातकविसंमेलनाचा समारोप दर्यापूर रेल्वे स्थानकावर सायंकाळी ४ वाजता होईल. याप्रसंगी नगराध्यक्ष नलिनी भारसाकळे, जि.प. आरोग्य सभापती बळवंत वानखडे, सदस्य बाळासाहेब हिंगणीकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुधाकर भारसाकळे, शेतकरी नेते विजय विल्हेकर, शिवसेनेचे विकास येवले, गोपाल अरबट, रवींद्र गणोरकर उपस्थित राहतील.सर्व काही शकुंतलेसाठीपाच ते दहा किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या शकुंतला रेल्वे मार्ग यवतमाळ, अकोला व अमरावती असे तीन जिल्हे जोडतो. मात्र, सुदामकाका देशमुख यांचा एकमेव अपवाद वगळता, या रेल्वे मार्गाच्या आधुनिकीकरणासाठी जोरकस आवाज लोकप्रतिनिधींनी उठवला नाही. त्यामुळे शासनानेही काही कार्यवाही केली नाही. हा मुद्दा प्रकर्षाने पुढे यावा, यासाठी हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.