शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पीएम किसान योजना वांध्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:16 IST

शेतकरी हवालदिल, आर्थिक लाभापासून वंचित अनिल कडू परतवाडा : महसूल व कृषी विभागाच्या श्रेयवादात प्रधानमंत्री किसान सन्मान ...

शेतकरी हवालदिल, आर्थिक लाभापासून वंचित

अनिल कडू

परतवाडा : महसूल व कृषी विभागाच्या श्रेयवादात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना वांध्यात आली आहे. यात शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, योजनेच्या लाभापासून त्यांना वंचित राहावे लागत आहे.

शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी असलेली ही योजना खरे तर कृषी विभागाकडे असायला हवी होती. पण, ती महसूल विभागाकडे दिली गेली. महसूल विभागाने ही योजना यशस्वी केली. राज्यस्तरावर १.०५ कोटी शेतकरी कुटुंबांना ११६६५.७६ कोटी रकमेचा लाभ मिळवून दिला. संपूर्ण महसूल यंत्रणा याकरिता राबली. पण, या यशाचे श्रेय कृषी विभागाने घेतले. महसूल विभागाला डावलून कृषी विभागाला सन्मानपत्रही दिले गेले. यात महसूल विभाग दुखावला गेला आणि त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सांघिक पातळीवर हा निर्णय घेतला गेल्यामुळे जवळ जवळ संपूर्ण राज्यातच महसूल विभागाने प्रधानमंत्री किसान योजनेचे कामच बंद केले आहे. मागील तीन महिन्यांपासून या योजनेंतर्गत महसूल विभागाने एकाही शेतकऱ्याची नोंदणी केली नाही. आलेल्या शेतकऱ्यांना थेट कृषी विभागाकडे पाठविणे सुरू केले. कृषी विभागाकडे पोहोचलेल्या शेतकऱ्यांना महसूल विभागाकडे आल्यापावली परतविले जात आहे. त्यामुळे शेतकरी विनाकारण भरडला जात असून, लाभापासून वंचित राहत आहे.

- हे असे वागणे बरे नव्हे

अचलपूर तालुका कृषी अधिकारी प्रफुल्ल सातव यांनी या अनुषंगाने १२ एप्रिलला अचलपूर तहसीलदारांना पत्र दिले. प्रधानमंत्री किसान योजनेसंबंधी शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण आपण करावे, शेतकऱ्यांना कृषी विभागाकडे पाठविणे सयुक्तिक नसल्याचे त्यांनी म्हटले. अशाच आशयाचे एक पत्र कृषी विभागाच्या आयुक्तांनी १ एप्रिलला राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले. पण, महसूल विभाग आपल्या भूमिकेवर ठाम आहे.

योजना कृषी विभागाची

प्रधानमंत्री किसान योजनेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची एकूण संख्या द्यायला महसूल किंवा कृषी विभाग तयार नाही. योजना कृषी विभागाची आहे. कृषी विभागाकडूनच याची माहिती मिळू शकेल, असे महसूल विभाग सांगत आहे. कृषी विभाग मात्र याची जबाबदारी महसूल विभागावर टाकत आहे.