शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

राज्यात पीएम किसान योजना वांध्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:16 IST

शेतकरी हवालदिल, आर्थिक लाभापासून वंचित अनिल कडू परतवाडा : महसूल व कृषी विभागाच्या श्रेयवादात प्रधानमंत्री किसान सन्मान ...

शेतकरी हवालदिल, आर्थिक लाभापासून वंचित

अनिल कडू

परतवाडा : महसूल व कृषी विभागाच्या श्रेयवादात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना वांध्यात आली आहे. यात शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, योजनेच्या लाभापासून त्यांना वंचित राहावे लागत आहे.

शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी असलेली ही योजना खरे तर कृषी विभागाकडे असायला हवी होती. पण, ती महसूल विभागाकडे दिली गेली. महसूल विभागाने ही योजना यशस्वी केली. राज्यस्तरावर १.०५ कोटी शेतकरी कुटुंबांना ११६६५.७६ कोटी रकमेचा लाभ मिळवून दिला. संपूर्ण महसूल यंत्रणा याकरिता राबली. पण, या यशाचे श्रेय कृषी विभागाने घेतले. महसूल विभागाला डावलून कृषी विभागाला सन्मानपत्रही दिले गेले. यात महसूल विभाग दुखावला गेला आणि त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सांघिक पातळीवर हा निर्णय घेतला गेल्यामुळे जवळ जवळ संपूर्ण राज्यातच महसूल विभागाने प्रधानमंत्री किसान योजनेचे कामच बंद केले आहे. मागील तीन महिन्यांपासून या योजनेंतर्गत महसूल विभागाने एकाही शेतकऱ्याची नोंदणी केली नाही. आलेल्या शेतकऱ्यांना थेट कृषी विभागाकडे पाठविणे सुरू केले. कृषी विभागाकडे पोहोचलेल्या शेतकऱ्यांना महसूल विभागाकडे आल्यापावली परतविले जात आहे. त्यामुळे शेतकरी विनाकारण भरडला जात असून, लाभापासून वंचित राहत आहे.

- हे असे वागणे बरे नव्हे

अचलपूर तालुका कृषी अधिकारी प्रफुल्ल सातव यांनी या अनुषंगाने १२ एप्रिलला अचलपूर तहसीलदारांना पत्र दिले. प्रधानमंत्री किसान योजनेसंबंधी शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण आपण करावे, शेतकऱ्यांना कृषी विभागाकडे पाठविणे सयुक्तिक नसल्याचे त्यांनी म्हटले. अशाच आशयाचे एक पत्र कृषी विभागाच्या आयुक्तांनी १ एप्रिलला राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले. पण, महसूल विभाग आपल्या भूमिकेवर ठाम आहे.

योजना कृषी विभागाची

प्रधानमंत्री किसान योजनेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची एकूण संख्या द्यायला महसूल किंवा कृषी विभाग तयार नाही. योजना कृषी विभागाची आहे. कृषी विभागाकडूनच याची माहिती मिळू शकेल, असे महसूल विभाग सांगत आहे. कृषी विभाग मात्र याची जबाबदारी महसूल विभागावर टाकत आहे.