शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड आरक्षित; पण उद्योग केव्हा उभारणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 23:09 IST

रोजगाराची वानवा असताना स्वयंरोजगारासाठी पुढे आलेल्या युवकांना स्थानिक एमआडीसी प्रशासनाकडून संधी हिरावण्यात आली आहे. भूखंड आरक्षित असल्याने उद्योग कुठे उभारणार, असा या तरुणांचा आक्रोश आहे. याशिवाय उद्योग स्थापित न झाल्याने एमआयडीसी ओस पडली आहे.

ठळक मुद्देबेरोजगारांना रोजगार केव्हा? : तिवस्यातील एमआयडीसी उद्योगविना ओस

सूरज दाहाट।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : रोजगाराची वानवा असताना स्वयंरोजगारासाठी पुढे आलेल्या युवकांना स्थानिक एमआडीसी प्रशासनाकडून संधी हिरावण्यात आली आहे. भूखंड आरक्षित असल्याने उद्योग कुठे उभारणार, असा या तरुणांचा आक्रोश आहे. याशिवाय उद्योग स्थापित न झाल्याने एमआयडीसी ओस पडली आहे.तिवसा येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेलाच एम.आय.डी.सी आहे. या ठिकाणी अवैधरीत्या भूखंड राखीव ठेवण्यात आले. त्यामुळे सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या एमआयडीसीमध्ये रोजगारनिर्मिती झाली नाही. या ठिकाणी दोन किरकोळ उद्योग सुरू आहेत.हा भाग ग्रामीण असल्याने कृषिव्यवसायावर आधारित शेतमाल प्रक्रिया उद्योग उभरण्यास मोठा वाव आहे. तयार मालाची वाहतूक करण्यासाठी विमानतळ व रेल्वे जंक्शन असलेले नागपूर १०० किमी, तर अमरावती ४० किमी अंतरावर आहे. याच मार्गावर नांदगाव पेठची पंचतारांकित एमआयडीसी २२ किमी अंतरावर आहे. त्यामुळे उद्योग स्थापिक होण्याकरिता ही एमआयडीसी उत्तम पर्याय ठरू शकते. मात्र, तिवसा येथील एमआयडीसी राखीव भूखंडांमुळे उद्योगांविना ओस पडली आहे. येथे केवळ १७ भूखंड शिल्लक आहेत. उद्योगाविना शेतकऱ्यांच्या मालाला भाव व बेरोजगारांना काम मिळाले नाही.सर्व सुविधा उपलब्धविजेची सोय, मुबलक पाणीपुरवठा, चकचकीत रस्ते तसेच लघु कालव्यातून पाणीपुरवठ्याची सुविधादेखील तिवस्याच्या एमआयडीसीमध्ये आहे. तरीदेखील उद्योगांची वानवा असल्याने तरुणांच्या हातांना काम नाही.भूखंड परत घेणार का?एमआयडीसीतील भूखंड खरेदी आणि कंपनी सुरू केल्यानंतर ९५ वर्षांकरिता त्याचा ताबा दिला जातो, तर तीन वर्षाच्या आत उत्पादन सुरू न केल्यास प्लॉट सरकार परत घेते आणि पैसे परतविले जातात. आता तिवसा एमआयडीसीमधील भूखंड सरकार परत घेणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.तिवसा एमआयडीसीमध्ये सरकारने पुढाकार घेऊन उद्योगधंदे सुरू केले, तर स्थानिक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. मी अनेकदा यासंदर्भात पाठपुरावा केला. दिलेले भूखंड सरकारने परत घ्यावेत.- वैभव वानखडे,नगराध्यक्ष, तिवसा