शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड आरक्षित; पण उद्योग केव्हा उभारणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 23:09 IST

रोजगाराची वानवा असताना स्वयंरोजगारासाठी पुढे आलेल्या युवकांना स्थानिक एमआडीसी प्रशासनाकडून संधी हिरावण्यात आली आहे. भूखंड आरक्षित असल्याने उद्योग कुठे उभारणार, असा या तरुणांचा आक्रोश आहे. याशिवाय उद्योग स्थापित न झाल्याने एमआयडीसी ओस पडली आहे.

ठळक मुद्देबेरोजगारांना रोजगार केव्हा? : तिवस्यातील एमआयडीसी उद्योगविना ओस

सूरज दाहाट।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : रोजगाराची वानवा असताना स्वयंरोजगारासाठी पुढे आलेल्या युवकांना स्थानिक एमआडीसी प्रशासनाकडून संधी हिरावण्यात आली आहे. भूखंड आरक्षित असल्याने उद्योग कुठे उभारणार, असा या तरुणांचा आक्रोश आहे. याशिवाय उद्योग स्थापित न झाल्याने एमआयडीसी ओस पडली आहे.तिवसा येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेलाच एम.आय.डी.सी आहे. या ठिकाणी अवैधरीत्या भूखंड राखीव ठेवण्यात आले. त्यामुळे सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या एमआयडीसीमध्ये रोजगारनिर्मिती झाली नाही. या ठिकाणी दोन किरकोळ उद्योग सुरू आहेत.हा भाग ग्रामीण असल्याने कृषिव्यवसायावर आधारित शेतमाल प्रक्रिया उद्योग उभरण्यास मोठा वाव आहे. तयार मालाची वाहतूक करण्यासाठी विमानतळ व रेल्वे जंक्शन असलेले नागपूर १०० किमी, तर अमरावती ४० किमी अंतरावर आहे. याच मार्गावर नांदगाव पेठची पंचतारांकित एमआयडीसी २२ किमी अंतरावर आहे. त्यामुळे उद्योग स्थापिक होण्याकरिता ही एमआयडीसी उत्तम पर्याय ठरू शकते. मात्र, तिवसा येथील एमआयडीसी राखीव भूखंडांमुळे उद्योगांविना ओस पडली आहे. येथे केवळ १७ भूखंड शिल्लक आहेत. उद्योगाविना शेतकऱ्यांच्या मालाला भाव व बेरोजगारांना काम मिळाले नाही.सर्व सुविधा उपलब्धविजेची सोय, मुबलक पाणीपुरवठा, चकचकीत रस्ते तसेच लघु कालव्यातून पाणीपुरवठ्याची सुविधादेखील तिवस्याच्या एमआयडीसीमध्ये आहे. तरीदेखील उद्योगांची वानवा असल्याने तरुणांच्या हातांना काम नाही.भूखंड परत घेणार का?एमआयडीसीतील भूखंड खरेदी आणि कंपनी सुरू केल्यानंतर ९५ वर्षांकरिता त्याचा ताबा दिला जातो, तर तीन वर्षाच्या आत उत्पादन सुरू न केल्यास प्लॉट सरकार परत घेते आणि पैसे परतविले जातात. आता तिवसा एमआयडीसीमधील भूखंड सरकार परत घेणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.तिवसा एमआयडीसीमध्ये सरकारने पुढाकार घेऊन उद्योगधंदे सुरू केले, तर स्थानिक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. मी अनेकदा यासंदर्भात पाठपुरावा केला. दिलेले भूखंड सरकारने परत घ्यावेत.- वैभव वानखडे,नगराध्यक्ष, तिवसा