शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींच्या सौर दिव्यांची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 22:25 IST

सौर पथदिवे हा ग्रामीण भागातील उत्तम पर्याय आहे. त्यातील बॅटरी १०-११ तास पुरेल इतकी ऊर्जा ठेवून सक्षम असते.

ठळक मुद्देदेखभाल-दुरुस्ती केव्हा ? : पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे चांगल्या योजनेचा फज्जा

आॅनलाईन लोकमतअमरावती : सौर पथदिवे हा ग्रामीण भागातील उत्तम पर्याय आहे. त्यातील बॅटरी १०-११ तास पुरेल इतकी ऊर्जा ठेवून सक्षम असते. यात हे दिवे चालू, बंद करण्याची सुविधा स्वयंचलित आहेत. या दिव्याचे आयुष्य १५ ते २० वर्षे आहे. याच्यातील बॅटरीची देखभालीची आवश्यकता असते. याची किंमत सुमारे २५ हजाराच्या पुढे एका दिव्याची आहे. यांच्यामुळे दुसऱ्या विजेची गरज नाही. हे दिवे बसवण्यास सोपे असून पर्यावरण स्रेही आहेत. मात्र याची योग्य देखभाल न केल्याने अनेक ग्रामपंचायतींच्या सौर दिव्यांची दुर्दशेसाठी आहे.रस्त्यावर बसवल्या जाणाऱ्या सौर दिव्यात फोटो व्होल्टिक तंत्रज्ञानाचा उपयोग असतो. या दिवसांत सूर्यप्रकाशापासून सौर ऊर्जा निर्माण होते व रात्री या विजेचा उपयोग होतो. याला शासनाचे अनुदान असते. या योजनेमार्फत ग्रामसभेच्या मान्यतेने हे दिवे बसवण्यात येतात. ग्रामपंचायतीने याची योग्य अंमलबजावणी केली असता याचा दीर्घकालीन उपयोग होऊ शकतो. काही भागातील बºयाच ग्रामपंचायतींनी सौर दिव्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. बऱ्याच गावांत या दिव्याचे सांगाडेच उभे आहेत. या दिव्याची योग्य देखभाल न केल्यामुळे बहुतांश सौरदिवे निकामी झाले आहेत. काही भुरट्या चोरांनी ते दिवे लंपास केले आहे. यामुळे चांगल्या योजनेचा फज्जा उडाला आहे.विविध गावांतील योग्य ठिकाणी सौर दिवे जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना मोफत दिले आहेत. मात्र, बहुतांश ग्रामपंचायतींनी या दिव्याची योग्य देखभाल न केल्यामुळे हजारो रूपये किमतीचे हे दिवे बंद पडले आहेत. काही दिव्यांची चोरी झाली आहे. बॅटऱ्या खराब झाल्या आहेत. जिल्हा परिषदेने याबाबत युद्धपातळीवर योग्य त्या अधिकाऱ्यांनी गाववार चौकशीचा अहवाल घेण्यात यावेत व वसुली करावी, अशी मागणी जोर धरत आहे.यासंदर्भात ग्रापंचायतींची माहिती घेऊन बंद असलेले सौरदिवे पुन्हा सुरू करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना आवश्यक त्या सूचना देण्यात येतील.- माया वानखडे,डेप्युटी सीईओ, पंचायत