शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
4
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
5
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
6
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
7
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
8
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
9
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
10
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
11
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
12
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
13
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
14
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
15
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
16
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
17
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
18
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
19
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
20
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...

ग्रामपंचायतींच्या सौर दिव्यांची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 22:25 IST

सौर पथदिवे हा ग्रामीण भागातील उत्तम पर्याय आहे. त्यातील बॅटरी १०-११ तास पुरेल इतकी ऊर्जा ठेवून सक्षम असते.

ठळक मुद्देदेखभाल-दुरुस्ती केव्हा ? : पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे चांगल्या योजनेचा फज्जा

आॅनलाईन लोकमतअमरावती : सौर पथदिवे हा ग्रामीण भागातील उत्तम पर्याय आहे. त्यातील बॅटरी १०-११ तास पुरेल इतकी ऊर्जा ठेवून सक्षम असते. यात हे दिवे चालू, बंद करण्याची सुविधा स्वयंचलित आहेत. या दिव्याचे आयुष्य १५ ते २० वर्षे आहे. याच्यातील बॅटरीची देखभालीची आवश्यकता असते. याची किंमत सुमारे २५ हजाराच्या पुढे एका दिव्याची आहे. यांच्यामुळे दुसऱ्या विजेची गरज नाही. हे दिवे बसवण्यास सोपे असून पर्यावरण स्रेही आहेत. मात्र याची योग्य देखभाल न केल्याने अनेक ग्रामपंचायतींच्या सौर दिव्यांची दुर्दशेसाठी आहे.रस्त्यावर बसवल्या जाणाऱ्या सौर दिव्यात फोटो व्होल्टिक तंत्रज्ञानाचा उपयोग असतो. या दिवसांत सूर्यप्रकाशापासून सौर ऊर्जा निर्माण होते व रात्री या विजेचा उपयोग होतो. याला शासनाचे अनुदान असते. या योजनेमार्फत ग्रामसभेच्या मान्यतेने हे दिवे बसवण्यात येतात. ग्रामपंचायतीने याची योग्य अंमलबजावणी केली असता याचा दीर्घकालीन उपयोग होऊ शकतो. काही भागातील बºयाच ग्रामपंचायतींनी सौर दिव्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. बऱ्याच गावांत या दिव्याचे सांगाडेच उभे आहेत. या दिव्याची योग्य देखभाल न केल्यामुळे बहुतांश सौरदिवे निकामी झाले आहेत. काही भुरट्या चोरांनी ते दिवे लंपास केले आहे. यामुळे चांगल्या योजनेचा फज्जा उडाला आहे.विविध गावांतील योग्य ठिकाणी सौर दिवे जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना मोफत दिले आहेत. मात्र, बहुतांश ग्रामपंचायतींनी या दिव्याची योग्य देखभाल न केल्यामुळे हजारो रूपये किमतीचे हे दिवे बंद पडले आहेत. काही दिव्यांची चोरी झाली आहे. बॅटऱ्या खराब झाल्या आहेत. जिल्हा परिषदेने याबाबत युद्धपातळीवर योग्य त्या अधिकाऱ्यांनी गाववार चौकशीचा अहवाल घेण्यात यावेत व वसुली करावी, अशी मागणी जोर धरत आहे.यासंदर्भात ग्रापंचायतींची माहिती घेऊन बंद असलेले सौरदिवे पुन्हा सुरू करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना आवश्यक त्या सूचना देण्यात येतील.- माया वानखडे,डेप्युटी सीईओ, पंचायत