शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
4
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
5
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
7
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
8
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
9
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
10
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
11
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
12
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
13
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
14
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
15
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
16
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
18
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
19
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
20
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?

ग्रामपंचायतींच्या सौर दिव्यांची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 22:25 IST

सौर पथदिवे हा ग्रामीण भागातील उत्तम पर्याय आहे. त्यातील बॅटरी १०-११ तास पुरेल इतकी ऊर्जा ठेवून सक्षम असते.

ठळक मुद्देदेखभाल-दुरुस्ती केव्हा ? : पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे चांगल्या योजनेचा फज्जा

आॅनलाईन लोकमतअमरावती : सौर पथदिवे हा ग्रामीण भागातील उत्तम पर्याय आहे. त्यातील बॅटरी १०-११ तास पुरेल इतकी ऊर्जा ठेवून सक्षम असते. यात हे दिवे चालू, बंद करण्याची सुविधा स्वयंचलित आहेत. या दिव्याचे आयुष्य १५ ते २० वर्षे आहे. याच्यातील बॅटरीची देखभालीची आवश्यकता असते. याची किंमत सुमारे २५ हजाराच्या पुढे एका दिव्याची आहे. यांच्यामुळे दुसऱ्या विजेची गरज नाही. हे दिवे बसवण्यास सोपे असून पर्यावरण स्रेही आहेत. मात्र याची योग्य देखभाल न केल्याने अनेक ग्रामपंचायतींच्या सौर दिव्यांची दुर्दशेसाठी आहे.रस्त्यावर बसवल्या जाणाऱ्या सौर दिव्यात फोटो व्होल्टिक तंत्रज्ञानाचा उपयोग असतो. या दिवसांत सूर्यप्रकाशापासून सौर ऊर्जा निर्माण होते व रात्री या विजेचा उपयोग होतो. याला शासनाचे अनुदान असते. या योजनेमार्फत ग्रामसभेच्या मान्यतेने हे दिवे बसवण्यात येतात. ग्रामपंचायतीने याची योग्य अंमलबजावणी केली असता याचा दीर्घकालीन उपयोग होऊ शकतो. काही भागातील बºयाच ग्रामपंचायतींनी सौर दिव्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. बऱ्याच गावांत या दिव्याचे सांगाडेच उभे आहेत. या दिव्याची योग्य देखभाल न केल्यामुळे बहुतांश सौरदिवे निकामी झाले आहेत. काही भुरट्या चोरांनी ते दिवे लंपास केले आहे. यामुळे चांगल्या योजनेचा फज्जा उडाला आहे.विविध गावांतील योग्य ठिकाणी सौर दिवे जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना मोफत दिले आहेत. मात्र, बहुतांश ग्रामपंचायतींनी या दिव्याची योग्य देखभाल न केल्यामुळे हजारो रूपये किमतीचे हे दिवे बंद पडले आहेत. काही दिव्यांची चोरी झाली आहे. बॅटऱ्या खराब झाल्या आहेत. जिल्हा परिषदेने याबाबत युद्धपातळीवर योग्य त्या अधिकाऱ्यांनी गाववार चौकशीचा अहवाल घेण्यात यावेत व वसुली करावी, अशी मागणी जोर धरत आहे.यासंदर्भात ग्रापंचायतींची माहिती घेऊन बंद असलेले सौरदिवे पुन्हा सुरू करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना आवश्यक त्या सूचना देण्यात येतील.- माया वानखडे,डेप्युटी सीईओ, पंचायत