शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
2
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
3
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
4
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
5
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
6
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
7
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
8
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
9
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
10
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
11
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
12
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
14
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
15
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
16
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
17
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
18
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
19
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
20
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे

पीक विम्याची मुदतवाढ ठरली कुचकामी

By admin | Updated: August 12, 2015 00:08 IST

केंद्र शासनाने पीक विमा योजनेची मुदत वाढविली असली तरी तांत्रिक बाबींमुळे वाढीव मुदतही केवळ फार्सच ठरली आहे.

जितेंद्र दखने अमरावतीकेंद्र शासनाने पीक विमा योजनेची मुदत वाढविली असली तरी तांत्रिक बाबींमुळे वाढीव मुदतही केवळ फार्सच ठरली आहे. केवळ १ ते ७ आॅगस्ट दरम्यान पेरणी केलेल्या पिकांचा विमा प्रस्ताव करून घेण्याचा आदेश शासनाने काढला होता. परिणामी १ आॅगस्ट पूर्वी पेरणी झालेल्या कोणत्याच पिकांचा प्रस्ताव दाखल करून घेण्यास सहकारी बँकांनी नकार दिल्याने वाढीव मुदतीचा कोणताच लाभ शेतकऱ्यांना झाला नाही यामुळे वाढीव मुदतीत विना प्रस्ताव देण्यास गेलेल्या अनेक शेतकऱ्यांना मन:स्ताप सहन करावा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी शासनाने मुदत वाढविली. पण या मुदतीत मागील पेरणीची नोंद घेतली नाही. या योजनेत सहभागी होण्यासाठी बँका पीक परिस्थितीबाबत तलाठ्यांचा दाखला ग्राह्य धरतात. अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे दाखल्याची मागणी केली असता पाऊस नसताना तुम्ही पेरणी केलीच कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना विचारल्या जात आहे.आॅगस्टपूर्वीची पेरणी ग्राह्य नाहीवाढीव मुदतीचा आदेश काढताना शासनाने पेरणी केलेली मुदत १ ते ७ आॅगस्टच्या दरम्यानच असावी, असे म्हटले होते. जर एखाद्या शेतकऱ्याचा या मुदती अगोदर पेरण्या केलेल्या पिकांचा प्रस्ताव राहिला असेल व तो शेतकरी प्रस्ताव द्यायला गेला तर त्याला आदेश दाखवीत प्रस्ताव नाकारल्याचे अनेक उदाहरणे आहेत. प्रस्तावच घ्यायचे नाही तर मुदतवाढ कशाला, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. आॅगस्टमध्ये कोणत्या पिकाची पेरणी करावी ?शासनाने मुदतवाढ दिली असली तरी आॅगस्टमध्ये कोणती पेरणी करायची, असा सवाल अनेक शेतकऱ्यांचा आहे. शासनाने केवळ नावालाच ही मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रशासनाकडून उदासीनता दाखविण्यात येत आहे. मुदत वाढवून तांत्रिक चूक ठेवल्याने विविध बँकांमध्ये वाढीव मुदतीचे पीक विमा प्रस्ताव दाखल झाले नाहीत. वंचित शेतकऱ्यांना योजनेत सामावून घ्याशासनाने पीक विमा योजनेला मुदतवाढ दिली असली तरी अनेक बँकांनी शासनाच्या आदेशाला हरताळ फासत परिपत्रक मिळाले नसल्याचे कारण देत शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यास टाळाटाळ केल्याचे उदाहरणे आहेत. त्यामुळे योजनेच्या मुदतवाढीच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला असून वंचित शेतकऱ्यांना योजनेत सामावून घेण्याची मागणी होत आहे. शासनाने १ ते ७ आॅगस्टपर्यंत पिक विमा काढण्यासाठी मुदत वाढ दिली होती. मात्र वरील कालावधीत पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनाच यामध्ये सहभागी करून घेतले. ज्यानी ३१ जुलैपर्यंत पीक पेरणी केली अशांना वाढीव मुदतीत सहभाग करूण घेता येत नाही.- दत्तात्रय मुळे, कृषी अधिक्षक अधिकारी अमरावती.