शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जुलैमध्ये होणार दोन कोटी वृक्ष लागवड

By admin | Updated: April 6, 2016 00:12 IST

राज्यातील कमी होत जाणारे वृक्षांचे प्रमाण व त्यातून निर्माण होणाऱ्या जागतिक तापमानात वाढ, प्रदूषण यासारख्या समस्या कमी करण्यासाठी राज्यभरात वन महोत्सवाचे औचित्य साधून १ जुलै रोजी ...

वन महोत्सवाचे औचित्य : जिल्ह्याला १५ लाखांच्या उद्दिष्टांची शक्यताअमरावती : राज्यातील कमी होत जाणारे वृक्षांचे प्रमाण व त्यातून निर्माण होणाऱ्या जागतिक तापमानात वाढ, प्रदूषण यासारख्या समस्या कमी करण्यासाठी राज्यभरात वन महोत्सवाचे औचित्य साधून १ जुलै रोजी या एकाच दिवशी तब्बल दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामाजिक वनीकरण व वनविभागाकडून दीड कोटी तर इतर शासकीय विभागाकडून ५० लाख रोपे लागवड करण्याचे प्रस्तावित आहे. याबाबतचे नियोजन करून २० एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश महसूल व वनविभागाने दिले आहेत. राज्यातील वनाच्छादित क्षेत्राची वाढ होण्यासाठी विविध वृक्षरोपणाच्या योजना राबविल्या जात आहेत. वनविभाग, सामाजिक वनीकरण विभागाकडून रोपांची लागवड केली जात असली तरी यामध्ये संस्था, प्रशासकीय संस्था, सहकारी संस्था, खासगी उद्योजक, स्थानिक स्वराज संस्था, लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून रोपे लागवड करण्याचे नियोजन आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा तालुका व गावपातळीवर समित्या गठित केल्या आहेत. या समित्यांच्या अध्यक्षांनी नियमित बैठका घेऊन योजनेचे नियोजन करायचे आहे. रोपांची उपलब्धता रोपे लागवडीच्या जागा, लागवडीसाठी खड्डे खोदले त्यासाठी लोकसहभागातून उपलब्ध होणाऱ्या निधीची निश्चित करून अहवाल नियमित सादर करावयाच्या सूचना दिल्या आहेत. दोन कोटी वृक्षांच्या उद्दिष्टांपैकी अमरावती जिल्ह्याला १२ ते १५ लाखांचे उद्दिष्ट मिळण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)