शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी प्लॉट सिलिंग आवश्यक

By admin | Updated: May 7, 2016 00:48 IST

पंतप्रधान घरकूल योजनेत घरकूल मिळावे, यासाठी अचलपूर नगरपरिषदेच्या कार्यालयात अर्ज भरण्यासाठी झुंबड उडाली आहे.

हजारो भूखंड रिकामे : एकाची किंमत कोटीच्या घरातअचलपूर : पंतप्रधान घरकूल योजनेत घरकूल मिळावे, यासाठी अचलपूर नगरपरिषदेच्या कार्यालयात अर्ज भरण्यासाठी झुंबड उडाली आहे. कित्येक लोकांना राहण्यासाठी घरे नसल्याने शासनाला पंतप्रधान आवास योजना राबवावी लागत आहे. दुसरीकडे जुळ्या शहरालगत सुपीक जमिनीवर भूखंड पाडून त्या अव्वाच्या सव्वा भावात विकल्या जात आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने भूखंडाच्या (प्लॉट) सिलिंगचा अनेक वर्षांपासून रिक्त असलेले प्लॉट ताब्यात घेऊन त्यावर बेघरांना घरकूल बांधून द्यावे. त्यामुळे काही प्रमाणात आर्थिक समानता येऊन रिकाम्या जागांचा सदुपयोग होईल, अशी मागणी आहे. अनेक अवैध व्यावसायिक, आयकर चुकविणारे, लाच घेऊन धनाढ्य झालेले काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अचलपूर-परतवाडा शहराला लागून मोठमोठे ३ ते ५ भूखंड अडकवले आहेत. यातील एकेका भूखंडाची किंमत एक कोटीच्या जवळपास आहे. बँकेत पैसा ठेवल्यास त्याची चौकशी होण्याची भीती असल्याने अनेकांनी शेती किंवा प्लॉट खरेदी करून आपला पैसा यात गुंतवणूक करून ठेवला आहे. काळ्या कसदार सुपीक जमिनीवर प्लॉट पाडण्यात आलेले आहेत. काही अधिन्यासाला परवानगी नसतानाही सपाट्याने विकले गेले आहेत. काहींची अजूनही विक्री सुरू आहे.एखाद्या अवैध अधिन्यासाविषयी कुणी आवाज उचलल्यास किंवा अवैध मार्गाने पैसा जमा केलेल्या संबंधित अधिकारी किंवा व्यावसायिकांविरुद्ध आवाज उठविल्यास त्याचा आवाज साम, दाम, दंड हे तत्त्व वापत्रून संबंधितांनी बंद केल्याची घटना घडल्या आहेत. घरातील सदस्यांच्या नावावर एकाच मालकाचे अनेक असून एका कुटुंबाकडे किती फूट जागा असावी, हे शासनाने ठरवून द्यावे. त्याच्याकडे अतिरिक्त असलेल्या जागेचा शासकीय दराप्रमाणे मोबदला देऊन ते भूखंड ताब्यात घ्यावे व त्याच जागेवर गोरगरिबांची घरकुले बांधून ती घरे पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना वितरित करावे म्हणजे काहीअंशी आर्थिक समानता येऊन अवैध मार्गाने संपत्ती जमा करणाऱ्यांना धडा मिळेल, असे जनतेचे मत आहे. (शहर प्रतिनिधी)गोरगरिबांकडे जागाही नाही, घर बांधणार कुठे ?प्रधानमंत्री घरकूल आवास योजनेत ३३४ चौरस मीटर जागा घरकुलासाठी लागणार आहे. काही गोरगरिबांकडे जागाही नसल्याने त्यांनी घरकूल कुठे बांधावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. रिकामे प्लॉट शासनाने ताब्यात घेऊन त्यावर घरकुले बांधल्यास अनेक प्रश्न मिटू शकतात असे मत माजी नगरसेवक माणिक देशपांडे, विनय चतूर, नितीन भुयार, संजय कोरे, अमोल गोहाड, सोमेश ठाकरे, बबल्या पोटे, सतीश आकोलकर, सचिन गणगणे, नंदू राऊत, प्रकाश महाजन यांचेसह आदींनी व्यक्त केले आहे.