शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

७.२८ लाख हेक्टरमध्ये खरिपाचे नियोजन

By admin | Updated: May 18, 2017 00:21 IST

सलग तीन वर्षांच्या दुष्काळानंतर गतवर्षी मान्सून समाधानकारक राहिला. यंदा देखील सरसरीइतका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

तीन आठवड्यांवर हंगाम : खरिपपूर्व मशागतींना वेग, २० हजार हेक्टरची क्षेत्रवाढलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सलग तीन वर्षांच्या दुष्काळानंतर गतवर्षी मान्सून समाधानकारक राहिला. यंदा देखील सरसरीइतका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यावर्षी खरिपाच्या हंगामात २० हजार हेक्टरने क्षेत्रवाढ होणार असून सात लाख २८ हजार १२२ हेक्टरमध्ये खरिपाचे पेरणीक्षेत्र कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे. त्यानुसार बियाणे व खतांचे नियोजन केले आहे. यंदाच्या हंगाात सर्वाधिक दोन लाख ७० हजार पेरणीक्षेत्र सोयाबीनचे राहणार आहे. याउलट कपाशीची १८ हजार हेक्टरने क्षेत्रवाढ होणार आहे. यंदा कपाशीसाठी दोन लाख १० हजार हेक्टर पेरणीक्षेत्र आहे तर गतवर्षी एक लाख ८१ हजार हेक्टर कपाशीचे क्षेत्र होते. तुरीचे क्षेत्र यंदा चार हजार हेक्टरने कमी होणार आहे. यावर्षी एक लाख ३० हजार हेक्टर तुरीचे क्षेत्र प्रस्तावित आहे. मात्र, गतवर्षी तुरीचे एक लाख ३४ हजार ४३९ हेक्टर क्षेत्र होते. यावर्षी मुगाचे पेरणीक्षेत्र किमान दोन हजार हेक्टरने वाढण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने ३३ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. गतवर्षी ३१ हजार २९९ हेक्टर क्षेत्र होते. उडिदाचे क्षेत्र देखील यंदा २५०० हेक्टरने वाढणे अपेक्षित आहे. यंदा ३० हजार हेक्टर सरासरी क्षेत्र राहणार आहे. मात्र, गतवर्षी २७ हजार ७४५ हेक्टरमध्ये उडिदाचे पेरणीक्षेत्र होते. खरीप ज्वारीचे पेरणीक्षेत्र अंशत: वाढणार आहे. अलिकडे जिल्ह्यात ज्वारीचे पेरणीक्षेत्र दरवर्षी घटत चालले आहे. यंदा २८ हजार हेक्टर क्षेत्र कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे. तर गतवर्षी २७ हजार ३७६ हेक्टरमध्ये पेरणीक्षेत्र होते. इतर पिकांचे २९ हजार ६१२ हेक्टर क्षेत्र राहणार आहे. गतवर्षी १४ हजार ५९ हेक्टरमध्ये इतर पिकांची पेरणी झाली होती. अशा प्रकारे खरिपाचा अंदाज वर्तविला आहे.१.३० लाख मे.टन खतांचे आवंटन मंजूरयंदाकिमान १ लाख ३० हजार ३०० मे.टन रासानिक खतांचे आवंटन मंजूर केले आहे. यामध्ये युरिया ३८.७०० मे.टन, एसएसपी २९,५०० मे.टन, डीएपी १९,४०० मे.टन, एमओपी ६,९०० मे.टन, संयुक्त खते ३५.८०० मे.टन खतांचा समावेश आहे. खरिपाची मागणी १.४५ लाख मे.टनाची आहे.२३५४ कोटी पीककर्जाचा लक्ष्यांकयंदाच्या खरीप व रबी हंगामासाठी जिल्ह्यास २४५४ कोटी लाखांच्या पीककर्जाचा लक्ष्यांक आहे. यामध्ये जिल्हा बँकेला ५३५ कोटी, ग्रामीण बँकेला ६३०.३० कोटी व राष्ट्रीयीकृत बँकांना १६५५.७० कोटींचा लक्ष्यांक आहे. यातुलनेत मागील वर्षी १४३२.९७ कोटींचा लक्ष्यांक होता. १.४१ लक्ष क्विंटलची मागणीयंदाच्या हंगामाकरिता १.४१ लाख क्विंटल बियाण्यांची मागणी कृषी विभागाद्वारा नोंदविण्यात आली आहे. यामध्ये १.२१ लाख क्विंटल सोयाबीन बियाणे लागणार आहे. बीटी कपाशीची १०.२५ लाख पाकिटे लागणार असून यंदा महाबीज व राष्ट्रीय बिज निगम ६५ हजार क्विंटल, खासगी कंपनीकडून ५६ हजार ५०० क्विंटल व शेतकऱ्यांकडून बिज प्रक्रिया केलेले ८१ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे.