शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

नियोजनाचा मुद्दा; सीईओंचे बहिर्गमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 23:25 IST

नोटीस सदस्यांना मिळत नाही. तान्हापोळा सण असताना जिल्हा परिषदेची आमसभा बोलावल्याने अगोदरच सदस्य संप्तत होते. अशातच सभेच्या पटलावर ४१ पैकी नियोजनाचे ८ विषय न ठेवल्याने प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त करीत सदस्यांनी गोंधळ घातला. या सर्व प्रकाराला सीईओंसह अन्य अधिकाऱ्यांना जबाबदार मानून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करा, अशी मागणी सदस्यांची होती. दरम्यान सीईओ मनीषा खत्री यांनी गदारोळाला उत्तर देताना 'माझ्याशी चर्चा करण्याचा हा मार्ग नाही', असे म्हणत त्या सभागृहातून बाहेर पडल्या.

ठळक मुद्देआमसभा : विषय सूचीवरील आठ विषय पटलावर नसल्याने सदस्य आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नोटीस सदस्यांना मिळत नाही. तान्हापोळा सण असताना जिल्हा परिषदेची आमसभा बोलावल्याने अगोदरच सदस्य संप्तत होते. अशातच सभेच्या पटलावर ४१ पैकी नियोजनाचे ८ विषय न ठेवल्याने प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त करीत सदस्यांनी गोंधळ घातला. या सर्व प्रकाराला सीईओंसह अन्य अधिकाऱ्यांना जबाबदार मानून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करा, अशी मागणी सदस्यांची होती. दरम्यान सीईओ मनीषा खत्री यांनी गदारोळाला उत्तर देताना 'माझ्याशी चर्चा करण्याचा हा मार्ग नाही', असे म्हणत त्या सभागृहातून बाहेर पडल्या.दरम्यान सभागृहातून बहिर्गमन करणे, हे नियमबाह्य असल्याचे सीईओंच्या लक्षात येताच त्या अवघ्या १० मिनिटांनी सभागृहात आसनस्थ झाल्या. या प्रकाराबद्दल संतप्त सदस्यांनी लगेच सीईओंनी सभागृहात दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी रेटली. मात्र, मी कामानिमित्त बाहेर गेले, असे म्हणत त्यांनी याविषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु सदस्य आपल्या मागणीवर ठाम राहिले. काहींनी सीईओंच्या या उत्तरावर समाधान न मानता त्यांचा निषेध केला. सभागृहातील घटनाक्रम बघून सीईओेंना अखेर दिलगिरी व्यक्त करावी लागली, हे विशेष.डॉ पंजाबराव देशमुख सभागृहात सोमवारी जि.प. अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या पीठासीनाखाली सभा घेण्यात आली. चालू आर्थिक वर्षाचा ९० कोटींच्या नियोजनातील विषयांवर निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र, जिल्हा वार्षिक योजनेतील सन २०१८-१९ ग्रामीण मार्ग रस्त्यांचा विकास व मजबुतीकरण यासाठी झेडपी अनुदान लेखाशिर्ष ३०५४-२०१६ अंतर्गत नवीन कार्यक्रमाचे नियोजन मंजूर करणे, बांधकामचे चार, याशिवाय पंचायत विभागाचा एक व समाजकल्याणचा तीन असे आठ महत्त्वाचे विषय पटलावर नव्हते. त्यामुळे सत्ताधाºयांसह विरोधकांनी प्रशासनाविरुद्ध एकीचे दर्शन घडविले. यात काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, शरद मोहोड, प्रकाश साबळे, सुनील डिके, प्रताप अभ्यंकर, बाळासाहेब हिंगणीकर, देवेंद्र भुयार हे आघाडीवर होते. ही सभा संस्थगित करीत अध्यक्षांनी पुन्हा आठ दिवसांनी सभा घेण्याचे जाहीर केले.कोरड्या दुष्काळाचा ठरावजिल्हा परिषदेच्या आमसभेत सोमवारी गदारोळातच सदस्य गौरी देशमुख यांनी जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, असा प्रस्ताव मांडला. तो गोंधळातच मंजूर करण्यात आला. याशिवाय प्रकाश साबळे यांनी समाजकल्याण विभागामार्फत २० टक्के अनुदानावर लाऊडस्पीकर पुरवठा करण्याचा प्रस्ताव ठेवला. हा ठरावदेखील मान्य करण्यात आला.आमसभेच्या अनुषंगाने दोन महिन्यांपूर्वी नियोजनाचे पत्र प्रशासनाला दिले होते. त्यानुसार कारवाईची जबादारी प्रशासनाचे प्रमुख म्हणून सीईओंची आहे. नियोजनाचे आठ विषय पटलावर ठेवण्यात आले नाही; उलट प्रशासनच पदाधिकारी व सदस्यांवर दबाब आणत आहे. - नितीन गोंडाणे, अध्यक्ष, जि.प.सभागृहातील मर्यादा न पाळता अरेरावी, गोंधळ घालून महिलांबाबत अपशब्द वापरले जातात. याबाबत नियम ३२ नुसार कारवाई केली जाऊ शकते. विषयसूची प्रकरणात अंतिम दिवसापर्यंत विषय रेटला जातो. दबाव झुगारल्यामुळे माझ्यावर आरोप होत आहेत.- मनीषा खत्री, सीईओ, झेडपीनियोजनाचे पत्र दिल्यावर अधिकाºयांकडून काम करून घेण्याची सीईओंची जबाबदारी आहे. मात्र, ते टाळून प्रशासनाकडूनच दबाब आणला जात आहे. अध्यक्षांनी परवानगी न घेता, सभागृहातून आसन सोडून जाणे हा आमचा अपमान आहे.- बबलू देशमुख, गटनेतालोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. विकासाचे नियोजन अद्याप नाही. आमसभेच्या नोटीसवर नियोजनाचे विषय नव्हते. यात प्रशासनाची चूक आहे. याला दोषी असलेल्या अधिकाºयावर कारवाई करावी.- शरद मोहोडसदस्य, भाजप