शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

एक किलोमीटरच्या रस्त्यात शंभरांवर खड्डे

By admin | Updated: November 25, 2014 22:48 IST

अमरावती ते परतवाडा या राज्य महामार्गावरील वलगाव ते आष्टी, पूर्णानगर ते आसेगाव आणि मेघनाथपूर फाटा ते चांदूरबाजार नाका या मार्गावर डांबरी रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.

अमरावती : अमरावती ते परतवाडा या राज्य महामार्गावरील वलगाव ते आष्टी, पूर्णानगर ते आसेगाव आणि मेघनाथपूर फाटा ते चांदूरबाजार नाका या मार्गावर डांबरी रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. केवळ एक-एक किलोमिटर अंतरावर शंभरांवर खड्डे पडलेले आहेत. लहान खड्ड्यांची संख्या तर अगिणत आहे. राज्य महामार्ग असलेल्या या रस्त्यावरुन चालणे धोक्याचे ठरत आहे. परिणामी वाहतूक करणारे नागरिक वैतागले आहे. वर्षभराचा कालावधी लोटूनही याकडे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत आहे. अमरावती ते परतवाडा या राज्य महामार्गावरून दररोज शेकडो वाहने धावतात. या मार्गावर रस्ता दुरूस्तीचे काम झाले असले तरी काही ठिकाणच्या टप्प्यात अद्यापही रस्त्याचा प्रवास खडतर होऊन बसला आहे. यात पहिला टप्पा वलगाव बसस्थानकापासून ते आष्टी फाट्यापर्यंत, त्यानंतर पूर्णानगर ते आसेगाव आणि मेघनाथपूर ते चांदूरबाजार स्टॉप या तीन टप्प्यातील राज्य महामार्गावर एक ते तीन किलोमीटर अंतरावर डांबरी रस्त्याचा प्रवास खडतर झाला आहे. गरोदर मातांना दुचाकी वाहनाने जाता-येताना रस्त्याच्या दुरावस्थेमुळे असाह्य वेदनाचा सामना करावा लागतो. ऐवढेच नव्हे तर वयोवृध्द नागरिक व इतर सर्वच नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. तसेच रस्त्यावरील जागोजागी खड्डे, उखडली गिट्टी, डांबर माथ्याचे ठिगळ यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना नाहक मन:स्ताप सहन करावा लागतो. यामुळे अपघाताच्याही घटना घडत आहे. यापूर्वी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या मार्गावर काही महिन्यापूर्वी एसटी बसचा आणि किरकोळ अपघाताच्या घटना घडल्यानंतर बांधकाम विभाग अद्यापही जागा झाला नाही त्यामुळे अमरावती ते परतवाडा या राज्य महामार्गावरील ज्या ठिकाणी मार्गात रस्त्याची चाळण झाली आहे आणि खड्डे पडले आहे. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी होते आहे.