शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
3
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
4
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
5
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
6
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
7
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
9
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
10
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
11
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
12
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
13
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा
14
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
15
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
16
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
17
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
18
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
19
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
20
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

‘ट्रायबल’मध्ये निविदा बयाणा रकमेसाठी पुरवठादारांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:21 IST

(कॉमन) अमरावती : राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडे पुरवठादारांकडील बयाणा रक्कम (ईएमडी) पोटी कोट्यवधी रुपये पडून आहेत. ही रक्कम परत ...

(कॉमन)

अमरावती : राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडे पुरवठादारांकडील बयाणा रक्कम (ईएमडी) पोटी कोट्यवधी रुपये पडून आहेत. ही रक्कम परत घेण्यासाठी त्यांची पायपीट सुरू आहे. या विषयात आता कुटुंबीयांसह बेमुदत उपोषण करू, असा निर्वाणीचा इशारा एका पुरवठादाराने दिला आहे. आदिवासी विकास आयुक्तांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

गतवर्षी मार्च महिन्यात कोरोना संसर्गामुळे ई-निविदा प्रसिद्ध झाली नाही; मात्र त्यावेळी पुरवठादारांनी ऑनलाइन भरलेली, कोट्यवधीची बयाणा रक्कम (ईएमडी) अडवून ठेवण्यात आली आहे. गत महिन्याभरापासून नागपूर, अमरावती, नाशिक व ठाणे अपर आयुक्त कार्यालय स्तरावर पुरवठादार ईएमडीचा पाठपुरावा करीत आहेत; मात्र आमच्या हाती काही नाही. मंत्रालयात तोडगा निघेल, असे उत्तर पुरवठादारांना दिले जाते.

कोरोना संसर्गामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाले असताना, ईएमडी रक्कम परत मिळत नसल्याने अमरावती येथील एका पुरवठादाराने कुटुंबीयांसह बेमुदत उपोषण छेडू, असे पत्र आयुक्तांना पाठविले. मंत्रालय स्तरावर याविषयी कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

--------------

ई-निविदा न्यूनतम दराच्या प्रस्तावास मंजुरी नाही

सन २०२०-२०२१ या वर्षात शासकीय आश्रमशाळांंना अन्नधान्य, कडधान्य, किराणा साहित्य, मसाले पुरवठा करण्यासाठी ई-निविदेच्या अनुषंगाने न्यूनतम दराचा प्रस्ताव मंजुरीकरिता शासनाकडे पाठविण्यात आला होता; मात्र या प्रस्तावास अद्याप मान्यता प्रदान करण्यात आली नाही, तसेच निविदा रद्ददेखील करण्यात आली नसल्याने पुरवठादारांना बयाणा रक्कम परत मिळालेली नाही.

------------------

एका पुरवठादाराने जमा केली १० लाखांवर ईएमडी

शासकीय आश्रमशाळांंना अन्नधान्य, कडधान्य, किराणा साहित्य, मसाले पुरवठा करणाऱ्यांसाठी पुरवठादारांनी संकेत स्थळावर व्हर्च्युअल खात्यात एका पुरवठादाराने १० लाखांवर बयाणा रक्कम जमा केली; मात्र ई-निविदा प्रसिद्ध तर झालीच नाही आणि न्यूनतम दराच्या प्रस्तावास मान्यतादेखील मिळाली नाही. मार्च २०२१ पूर्वी ही ईएमडी परत करणे अनिवार्य होते. अद्यापही रक्कम परत मिळण्यासाठी पायपीट सुरू असल्याचे पुरवठादार मुंतजर अली यांनी सांगितले.

------------------

कोट

अपर आयुक्त स्तरावर ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. तेव्हा यासंदर्भातील निर्णय हा एटीसींनीच घ्यायला हवा. ई-निविदा उघडल्याच नाही, तर वर्ष संपताच पुरवठादारांना त्यांची ईएमडी परत करणे अनिवार्य आहे. ईएमडी परत करण्यासाठी अपर आयुक्तांना सूचना केल्या जातील.

- हिरालाल सोनवणे, आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक.