शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

‘ट्रायबल’मध्ये निविदा बयाणा रकमेसाठी पुरवठादारांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:21 IST

(कॉमन) अमरावती : राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडे पुरवठादारांकडील बयाणा रक्कम (ईएमडी) पोटी कोट्यवधी रुपये पडून आहेत. ही रक्कम परत ...

(कॉमन)

अमरावती : राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडे पुरवठादारांकडील बयाणा रक्कम (ईएमडी) पोटी कोट्यवधी रुपये पडून आहेत. ही रक्कम परत घेण्यासाठी त्यांची पायपीट सुरू आहे. या विषयात आता कुटुंबीयांसह बेमुदत उपोषण करू, असा निर्वाणीचा इशारा एका पुरवठादाराने दिला आहे. आदिवासी विकास आयुक्तांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

गतवर्षी मार्च महिन्यात कोरोना संसर्गामुळे ई-निविदा प्रसिद्ध झाली नाही; मात्र त्यावेळी पुरवठादारांनी ऑनलाइन भरलेली, कोट्यवधीची बयाणा रक्कम (ईएमडी) अडवून ठेवण्यात आली आहे. गत महिन्याभरापासून नागपूर, अमरावती, नाशिक व ठाणे अपर आयुक्त कार्यालय स्तरावर पुरवठादार ईएमडीचा पाठपुरावा करीत आहेत; मात्र आमच्या हाती काही नाही. मंत्रालयात तोडगा निघेल, असे उत्तर पुरवठादारांना दिले जाते.

कोरोना संसर्गामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाले असताना, ईएमडी रक्कम परत मिळत नसल्याने अमरावती येथील एका पुरवठादाराने कुटुंबीयांसह बेमुदत उपोषण छेडू, असे पत्र आयुक्तांना पाठविले. मंत्रालय स्तरावर याविषयी कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

--------------

ई-निविदा न्यूनतम दराच्या प्रस्तावास मंजुरी नाही

सन २०२०-२०२१ या वर्षात शासकीय आश्रमशाळांंना अन्नधान्य, कडधान्य, किराणा साहित्य, मसाले पुरवठा करण्यासाठी ई-निविदेच्या अनुषंगाने न्यूनतम दराचा प्रस्ताव मंजुरीकरिता शासनाकडे पाठविण्यात आला होता; मात्र या प्रस्तावास अद्याप मान्यता प्रदान करण्यात आली नाही, तसेच निविदा रद्ददेखील करण्यात आली नसल्याने पुरवठादारांना बयाणा रक्कम परत मिळालेली नाही.

------------------

एका पुरवठादाराने जमा केली १० लाखांवर ईएमडी

शासकीय आश्रमशाळांंना अन्नधान्य, कडधान्य, किराणा साहित्य, मसाले पुरवठा करणाऱ्यांसाठी पुरवठादारांनी संकेत स्थळावर व्हर्च्युअल खात्यात एका पुरवठादाराने १० लाखांवर बयाणा रक्कम जमा केली; मात्र ई-निविदा प्रसिद्ध तर झालीच नाही आणि न्यूनतम दराच्या प्रस्तावास मान्यतादेखील मिळाली नाही. मार्च २०२१ पूर्वी ही ईएमडी परत करणे अनिवार्य होते. अद्यापही रक्कम परत मिळण्यासाठी पायपीट सुरू असल्याचे पुरवठादार मुंतजर अली यांनी सांगितले.

------------------

कोट

अपर आयुक्त स्तरावर ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. तेव्हा यासंदर्भातील निर्णय हा एटीसींनीच घ्यायला हवा. ई-निविदा उघडल्याच नाही, तर वर्ष संपताच पुरवठादारांना त्यांची ईएमडी परत करणे अनिवार्य आहे. ईएमडी परत करण्यासाठी अपर आयुक्तांना सूचना केल्या जातील.

- हिरालाल सोनवणे, आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक.