शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

पाणी बचाव कृती समितीने रोखले पाईपलाईनचे खोदकाम

By admin | Updated: June 20, 2016 00:08 IST

चांदी प्रकल्पात पाण्याचा मुबलक साठा असूनसुद्धा शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्यास आधीच ...

नांदगावात जलसंकट : नगरपंचायतीचा तुघलकी निर्णय मनोज मानतकर नांदगाव खंडेश्वरचांदी प्रकल्पात पाण्याचा मुबलक साठा असूनसुद्धा शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्यास आधीच असमर्थ ठरलेल्या नगरपंचायतच्या आणखी एका तुघलकी निर्णयाने नांदगावात जलसंकट निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नगरपंचायतीने वसतीगृहाला पाणीपुरवठा करण्यासाठी दिलेल्या एनओसीचा गैरफायदा घेत प्राधिकरणने सुरू केलेल्या पाइपलाईनच्या खोदकामाला पाणी बचाव समितीने वेळीच ब्रेक लावल्याने तुर्तास खोदकाम थांबले आहे. परंतु शहरवासियांवरील जलसंकटाची गडद छाया अद्यापही कायम आहे. लोकवर्गणीतून तसेच शासनाच्या सहकार्याने राबविल्या जाणाऱ्या कोट्यवधीच्या योजनेतून नांदगाववासीयांची तहान भागविण्यासाठी टाकण्यात आलेल्या पाइपलाईनमध्ये झालेला भ्रष्टाचार व पाणीपुरवठा समितीच्या नियोजनशून्यतेमुळे शहरवासीयांची पाण्यासाठी तारांबळ होत आहे. मात्र, नगरपंचायतीने शहरवासीयांचा कुठलाही विचार न करता वसतिगृहाला पाणीपुरवठा करण्यासाठी जीवन प्राधिकरणला नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. प्राधिकरणने याचा गैरफायदा घेत वसतिगृहापासून चार इंचाच्या पाईपलाइनचे खोदकाम सुरू करून शहरवासीयांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु येथील काही जागरूक नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी खोदकामाला विरोध करून पाईपलाईनचे काम बंद पाडल्याने तुर्तास शहरवासियांवरील जलसंकट टळले आहे. पाणीबचाव कृती समिती स्थापन करून राजेश पाठक, प्रकाश मारोटकर, शाम शिंदे, संजय पोपळे, सतीश पटेल, प्रमोद पिंजरकर, अरुण लहाबर, निकेत ब्राह्मणवाडे, शिवानी मेश्राम, मनोज बनारसे, सागर सोनोने यांचेसह विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार सादर केली. जोपर्यंत शहरातील नागरिकांना दैनंदिन मुबलक पाणी मिळणार नाही तोपर्यंत इतरत्र पाणी न देण्याचा निर्धार पाणी बचाव कृती समितीने केला आहे.मुख्याधिकाऱ्यांचा अहवाल गावकऱ्यांच्या बाजूने, सत्ताधारी मात्र गुलदस्त्यात पाणी बचाव कृती समितीच्या तक्रारीनुसार नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व प्राधिकरणकडे खोदकाम बंद करण्याबाबत अहवाल पाठवून नागरिकांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु सत्ताधारी मात्र अद्यापही गुलदस्त्यात असून ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ अशी परिस्थिती सत्ताधाऱ्यांची झाली आहे.