शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे गाड्यात चोरीच्या घटनांनी प्रवासी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 23:13 IST

धावत्या रेल्वे गाड्यात चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अवघ्या २० ते २५ वयोगटातील युवकांची टोळी या चोऱ्यांमध्ये सामील असून, अकोला ते बडनेरा आणि बडनेरा ते नागपूर अशी सीमा चोरट्यांनी आखली आहे.

ठळक मुद्दे२० ते २५ वयोगटातील युवकांची टोळी : अकोला-नागपूर दरम्यान सर्वाधिक उचलेगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : धावत्या रेल्वे गाड्यात चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अवघ्या २० ते २५ वयोगटातील युवकांची टोळी या चोऱ्यांमध्ये सामील असून, अकोला ते बडनेरा आणि बडनेरा ते नागपूर अशी सीमा चोरट्यांनी आखली आहे.रेल्वेत अनधिकृत खाद्य पदार्थ विक्रेते, तृतीयपंथ्याचा हैदोस, आरक्षण डब्यात अन्य प्रवाशांची गर्दी, चढ्या दराने खाद्य पदार्थाची विक्री अशा एक ना अनेक समस्यांनी रेल्वे प्रवाशी त्रस्त आहे. मात्र, हल्ली उन्हाळा असल्यामुळे रेल्वे गाड्यात तुंडूब गर्दी आहे. नेमके या गर्दीचा फायदा घेत चोरटे प्रवाशाचे साहित्य, सामान, मोबाईल, पर्स आदी लंपास करीत असल्याचे चित्र आहे. अमरावती आणि बडनेरा रेल्वे स्थानकावरील आरक्षण कक्ष व तिकीट केंद्रावरही चोरट्यांचा खुला वावर हे रेल्वे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहे. धावत्या रेल्वे गाड्यात चोºयांची मोहिम फत्ते करण्यासाठी नवे चेहरे उद्यास आले आहे. अकोलापासून निघालेले चोरटे हे बडनेरा रेल्वे स्थानकादरम्यान चोरीची मोहीम यशस्वी करतात, अशी विश्वसनीय माहिती आहे. पुढे बडनेरा ते वर्धा आणि नागपूर अशा सीमा देखील चोरट्यांनी निश्चित केल्या आहेत. धावत्या रेल्वे गाड्यात चोरटे कोण? याची माहिती रेल्वे पोलिसांना असुनही ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा रेल्वे पोलिसांचा कारभार आहे. प्रमुख धावत्या रेल्वे गाड्यात प्रवाशांच्या संरक्षणासाठी रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलिसांची गस्त असते. मात्र, चोरी करणाºया युवकांची टोळी पोलिसांना दिसू नये, याबाबत आश्चर्य मानले जात आहे. मध्यंतरी रेल्वे गाड्यात चोरीच्या घटनांना आवर घालण्यात आले होते. मात्र, गत तीन ते चार महिन्यांपासून लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये नवख्या युवकांच्या टोळीने चोरींसाठी लक्ष्य केले आहे. अकोला ते नागपूर यादरम्यान रेल्वे गाड्यात सर्वाधिक चोरीच्या घटना होत असल्याचे दिसून येत आहे. गत आठवड्यात अकोला रेल्वे स्थानकावर काचीगुडा- नरखेड एक्स्प्रेसमधून एका युवतीचा चोरट्याने मोबाईल हिसकावून पळ काढला. रेल्वे गाड्यात सतत होणाºया चोरीच्या घटनांवर पोलिसांचे अंकुश नसल्याने चोरट्यांचे मनोबल उंचावले आहे. बरेचदा प्रवाशांची बॅग, सुटकेस अथवा साहित्य चोरीस जात असल्याने तिकीट, पैसे आदी काहीच प्रवाशांकडे राहत नाही. लांबचा प्रवास असल्याने रेल्वेतून उतरून पोलिसात तक्रार करण्यास कोणतेही प्रवासी समोर येत नाही. त्यामुळे रेल्वेत चोरीच्या सातत्याने घटना होत असताना तक्रारी नोंदविल्या जात नसल्याने पोलिसात गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण नगण्य आहे.पोलिसांची गस्ती ठरतेय ‘वसुली’ पथकलांब पल्ल्याच्या धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाची गस्त अनिवार्य आहे. त्यानुसार ही गस्त देखील असते. मात्र, गाड्यांमधील पोलिसांचे हे पथक आता ‘वसुली’ गस्त ठरत आहे. या पथकाला रेल्वे पोलिसांच्या सुरक्षिततेचे काहीही घेणे-देणे नाही. गस्तीवर पोलीस हे अनधकिृत खाद्य पदार्थ विक्रेते, विनातिकीट प्रवासी, तृतीयपंथी यांच्याकडून ‘वसुली’ करण्यातच मश्गूल असल्याचे वास्तव आहे.चोरट्यांमध्ये विशेष समूहाचे युवकरेल्वे गाड्यांमध्ये चोरीच्या घटनांची मोहिम फत्ते करण्यासाठी २० ते २५ वयोगटातील युवकांचा समावेश असून, हे युवक विशेष समूहाचे असल्याचे सूत्रांनी सांगितले. यातील काही युवक खाद्य पदार्थ विक्रीच्या नावाखाली रेल्वे गाड्यात शिरकाव करतात. प्रसंगी संधी साधून ते चोरी करून धावत्या रेल्वेतून पळ काढत असल्याची माहिती आहे. या प्रकाराला रेल्वे पोलीस जबाबदार आहे.