शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

पिकविलेली केळी घातक

By admin | Updated: April 19, 2016 00:12 IST

केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या पथ्रोट, अंजनगाव, पांढरी खानमपूर, जवळापूर परिसरात केळी उत्पादनाला घरघर लागली आहे.

कार्बाईडचा अवैध वापर : अंजनगाव, पथ्रोट येथे रोज ५०० टन केळीचे उत्पादनअचलपूर/पथ्रोट अरूण पटोकारकेळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या पथ्रोट, अंजनगाव, पांढरी खानमपूर, जवळापूर परिसरात केळी उत्पादनाला घरघर लागली आहे. जिल्ह्याच्या बाजारात विक्रीसाठी येणारी केळी रासायनिक प्रक्रिया करून पिकविण्यात येत असल्याने अशा केळी आरोग्यासाठी घातक ठरू लागल्या आहेत. हिरवीकंच केळी ‘इथेनॉल’ या रासायनिक द्रव्याचा वापर करून पिकविण्यात येतात.केळी लावण्यापूर्वी शेतकरी जमिनीची मशागत करून शेतात शेणखत टाकणे, उच्च प्रतीची नवनवीन जातीची प्रमाणित टिश्यूकल्चर, श्रीमंती, आरु, महालक्ष्मी ही गावरानी बेणी १५ ते २० रुपये प्रति बेण्यानुसार विकत घेतात. ५ बाय ५ फूट अंतरावर जुलै ते आॅगस्ट महिन्यात केळीची लागवड केली जाते. साधारणत: एक एकरात १८०० झाडे लावली जातात. लागवडीचा, वाफे बांधणीचा, ऊखरी चाळणी, ड्रीप, स्प्रेर्इंग आणि २५ ते ३० पोते रासायनिक खताचा वापर केला जातो. यासाठी शेतकऱ्याला एकरी एक लाख रुपये खर्च येतो. पूर्वी खर्चाच्या मानाने केलेला दरही चांगला मिळत होता. त्यामुळे येथील शेतकरी केळी पिकाकडे वळला होता. मात्र, दोन वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, वाढते तापमान, घटलेला जलस्तर, लोडशेडिंग, खताचे वाढते दर, वाढती मजुरी व मुख्य म्हणजे उत्पादन खर्चाच्या मानाने केळीला मिळणारा अत्यल्प म्हणजे फक्त ४०० ते ५०० रूपये प्रतिक्विंटल त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा होत असल्यामुळे शेतकरी केळी पिकापासून दिवसेंदिवस लांब जात जात आहेत. या विपरित परिस्थितीमुळे या भागातील केळीच्या बागा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. उत्पादन खर्चाच्या मानाने केळीला कमीत कमी प्रति क्विंटल ९०० ते ११०० रुपयाचे दर मिळाले तर केळी पीक घेणे परवडेल, असे केळी बागायतदारांचे मत आहे. तीन वर्षापासून पथ्रोट-अंजनगाव सुर्जी येथे केळी पिकविण्याचे रायप्लिंग चेम्बर्स सुरू झाले. पथ्रोट येथे तीन, पांढरी खानमपूर येथे चार व अंजनगाव सुर्जी येथे दोन रायप्लिंग चेम्बर्स आहेत. या चेम्बर्समुळे शेतकऱ्यांना होणारा एक फायदा म्हणजे पूर्वी व्यापारी शेतकऱ्यांकडून दलाली व शेतातून घड काढण्याची मजुरी घेत होते. ते आता बंद झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक बचाव होऊन शेतकऱ्यांच्या मालाला बाराही महिने बाजारपेठ मिळते. पूर्वी उन्हाळ्यात केळीला बाजारभाव मिळत नव्हता व व्यापारी माल घेत नव्हते. आता तसे नाही. चेम्बर्समुळे व्यापाऱ्यांची सोय झाली आहे. आता शेतकरी त्यांचे मजूर व ट्रॅक्टर्स घेऊन शेतात जाऊन केळीचा माल काढतात, काढलेल्या मालाच्या फण्या करून त्या मोठ्या गंजामध्ये तुरटीच्या पाण्यात टाकून धुतल्या जातात. त्यानंतर त्या कॅरेटमध्ये भरून चार दिवसपर्यंत चेम्बर्समध्ये ठेवल्या जातात व पाचव्या दिवशी त्या फण्यांवर इथेनॉलची फवारणी करण्याची प्रक्रिया केली जाते. यानंतर तीन दिवसांनी केळी पिवळी (पिकेपर्यंत) होईपर्यंत वातानुकुलित चेम्बर्समध्येच ठेवून चौथ्या दिवशी ती बाजारात पाठविली जातात. येथील केळी नागपूर, भोपाळ, इटारसी, बल्लारशा, वरोरा, आमला, शिवनी आदी ठिकाणी जातात. सुमारे ५०० टन पिकलेला माल दरदिवसाला येथून पाठविला जातो.