शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

पिकविलेली केळी घातक

By admin | Updated: April 19, 2016 00:12 IST

केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या पथ्रोट, अंजनगाव, पांढरी खानमपूर, जवळापूर परिसरात केळी उत्पादनाला घरघर लागली आहे.

कार्बाईडचा अवैध वापर : अंजनगाव, पथ्रोट येथे रोज ५०० टन केळीचे उत्पादनअचलपूर/पथ्रोट अरूण पटोकारकेळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या पथ्रोट, अंजनगाव, पांढरी खानमपूर, जवळापूर परिसरात केळी उत्पादनाला घरघर लागली आहे. जिल्ह्याच्या बाजारात विक्रीसाठी येणारी केळी रासायनिक प्रक्रिया करून पिकविण्यात येत असल्याने अशा केळी आरोग्यासाठी घातक ठरू लागल्या आहेत. हिरवीकंच केळी ‘इथेनॉल’ या रासायनिक द्रव्याचा वापर करून पिकविण्यात येतात.केळी लावण्यापूर्वी शेतकरी जमिनीची मशागत करून शेतात शेणखत टाकणे, उच्च प्रतीची नवनवीन जातीची प्रमाणित टिश्यूकल्चर, श्रीमंती, आरु, महालक्ष्मी ही गावरानी बेणी १५ ते २० रुपये प्रति बेण्यानुसार विकत घेतात. ५ बाय ५ फूट अंतरावर जुलै ते आॅगस्ट महिन्यात केळीची लागवड केली जाते. साधारणत: एक एकरात १८०० झाडे लावली जातात. लागवडीचा, वाफे बांधणीचा, ऊखरी चाळणी, ड्रीप, स्प्रेर्इंग आणि २५ ते ३० पोते रासायनिक खताचा वापर केला जातो. यासाठी शेतकऱ्याला एकरी एक लाख रुपये खर्च येतो. पूर्वी खर्चाच्या मानाने केलेला दरही चांगला मिळत होता. त्यामुळे येथील शेतकरी केळी पिकाकडे वळला होता. मात्र, दोन वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, वाढते तापमान, घटलेला जलस्तर, लोडशेडिंग, खताचे वाढते दर, वाढती मजुरी व मुख्य म्हणजे उत्पादन खर्चाच्या मानाने केळीला मिळणारा अत्यल्प म्हणजे फक्त ४०० ते ५०० रूपये प्रतिक्विंटल त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा होत असल्यामुळे शेतकरी केळी पिकापासून दिवसेंदिवस लांब जात जात आहेत. या विपरित परिस्थितीमुळे या भागातील केळीच्या बागा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. उत्पादन खर्चाच्या मानाने केळीला कमीत कमी प्रति क्विंटल ९०० ते ११०० रुपयाचे दर मिळाले तर केळी पीक घेणे परवडेल, असे केळी बागायतदारांचे मत आहे. तीन वर्षापासून पथ्रोट-अंजनगाव सुर्जी येथे केळी पिकविण्याचे रायप्लिंग चेम्बर्स सुरू झाले. पथ्रोट येथे तीन, पांढरी खानमपूर येथे चार व अंजनगाव सुर्जी येथे दोन रायप्लिंग चेम्बर्स आहेत. या चेम्बर्समुळे शेतकऱ्यांना होणारा एक फायदा म्हणजे पूर्वी व्यापारी शेतकऱ्यांकडून दलाली व शेतातून घड काढण्याची मजुरी घेत होते. ते आता बंद झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक बचाव होऊन शेतकऱ्यांच्या मालाला बाराही महिने बाजारपेठ मिळते. पूर्वी उन्हाळ्यात केळीला बाजारभाव मिळत नव्हता व व्यापारी माल घेत नव्हते. आता तसे नाही. चेम्बर्समुळे व्यापाऱ्यांची सोय झाली आहे. आता शेतकरी त्यांचे मजूर व ट्रॅक्टर्स घेऊन शेतात जाऊन केळीचा माल काढतात, काढलेल्या मालाच्या फण्या करून त्या मोठ्या गंजामध्ये तुरटीच्या पाण्यात टाकून धुतल्या जातात. त्यानंतर त्या कॅरेटमध्ये भरून चार दिवसपर्यंत चेम्बर्समध्ये ठेवल्या जातात व पाचव्या दिवशी त्या फण्यांवर इथेनॉलची फवारणी करण्याची प्रक्रिया केली जाते. यानंतर तीन दिवसांनी केळी पिवळी (पिकेपर्यंत) होईपर्यंत वातानुकुलित चेम्बर्समध्येच ठेवून चौथ्या दिवशी ती बाजारात पाठविली जातात. येथील केळी नागपूर, भोपाळ, इटारसी, बल्लारशा, वरोरा, आमला, शिवनी आदी ठिकाणी जातात. सुमारे ५०० टन पिकलेला माल दरदिवसाला येथून पाठविला जातो.