शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! वरळी डोमच्या बाहेर तुफान गर्दी, अनेक नेते प्रवेशद्वारावरच अडकले
2
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
3
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
4
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
5
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
6
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
7
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
8
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
9
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
10
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
11
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
12
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
13
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
14
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
15
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
16
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
17
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
18
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
20
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी

फुलराणीने केली होती घरी परतण्याची विनंती

By admin | Updated: December 27, 2014 00:33 IST

घरी परतण्यासाठी अंबाने वसतिगृह अधीक्षकांकडे विनंती केली होती, असा उल्लेख असलेला तपोवन बालगृह अधीक्षकांच्या स्वाक्षरीचा अहवाल 'लोकमत'च्या हाती लागला आहे.

गणेश देशमुख अमरावतीघरी परतण्यासाठी अंबाने वसतिगृह अधीक्षकांकडे विनंती केली होती, असा उल्लेख असलेला तपोवन बालगृह अधीक्षकांच्या स्वाक्षरीचा अहवाल 'लोकमत'च्या हाती लागला आहे. वसतिगृहातील वास्तव्यादरम्यान फसगत झाली असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर सुमारे महिनाभर तिने घरी जाण्यासाठी तगादा लावला; तथापि तिला घरी परतू दिले नाही. त्यासाठी दबावतंत्राचा वापर करण्यात आला, असा आरोप अंबाच्या आई-वडिलांचा आहे. अटक आणि निलंबन झालेला तपोवनातील बालगृह अधीक्षक गजानन चुटे याने नागपूर बालकल्याण समितीला लिहिलेल्या पत्रात अंबा घरी जाण्यासाठी इच्छुक असल्याचा उल्लेख आहे. या पत्रात पुढच्या ओळीत तिने दुसरा अर्ज देऊन घरी जाण्याची विनंती रद्द केल्याचेही नमूद करण्यात आले आहे.अंबा दहशतीत, व्हावी चौकशी!आईवडिल असताना मुलगी बालगृहात वास्तव्यास आहे. घरी रहावयाचे नसल्याच्या तिच्याच म्हणण्यानुसारच आम्ही तिला बालगृहात प्रवेश दिला, असे संबंधितांकडून सांगितले जाते.बालकल्याण समितीने घ्यावी दखलअमरावती : अंबा एका षड्यंत्राची बळी आहे. ती फसलेली आहे. तिला घरी परतायचे आहे. आईला बिलगून एकदा ती ढसाढसा रडली होती. मला सोडवा, अशी विनंती तिने केली होती. वसतिगृहाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे दृश्य कैद आहेत. तिच्या दोन मैत्रिणी भेटायला गेल्या त्यावेळीही तिने मला येथून काढा, अशी कळकळीची विनंती केली होती. त्या मुलींची नोंदही वसतिगृहातील रजिस्टरमध्ये आढळेल. ती पडताळावी. त्या मुलींचे बयाण घ्यावे. अंबा काय म्हणाली, याबाबत त्या बोलतील. आजीला फोन करून तिने भेटीला बोलविले होते. आवडीचे पदार्थ मागविले होते. मला घरी न्या, अशी विनंती केली होती. 'कॉल हिस्टरी'मध्ये तिने फोन केलेला क्रमांक सापडेल. अलीकडेच अंबाचा फोन आला. 'माझ्यावर काय बितते हे मी सांगू शकत नाही' असे वाक्य ती बोलली. 'तुम्ही लढा देत असल्यामुळे माझे आयुष्य धोक्यात आहे. तुम्हालाही धोका आहे. तुम्ही शांत रहा.' अशी विनवणी तिने केली होती, अशी माहिती अंबाच्या आईबाबांनी दिली. त्यांनी या सर्व बाबीच्या वेळोवेळी लेखी तक्रारी, अर्ज, माहिती योग्य त्या अधिकाऱ्यांना दिली आहे. - तर ती का बोलली असती?अंबाला घरी यायचे नसते तर ती हे सारे का बोलली असती? तिने फोन का केले असते? ती आईला बिलगून का रडली असती? असे सवाल उपस्थित करतानाच, तिचा वापर केला जात आहे. १८ वर्षांची होईपर्यंत तिला जणू नजरकैद ठेवायचे आहे. त्यानंतर बालगृहातून ती निघाली की तिला इतर गैरमार्गात गुंतवायचे आहे, असे तिचे आईवडील बेंबीच्या देठापासून सांगतात. तिच्यावर ललित अग्निहोत्रीचा दबाव असल्याने, तो तिला मारहाण करीत असल्याने, कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देत असल्याने ती इच्छेविरुद्ध सर्व सहन करीत आहे, असा आक्रोश तिच्या जन्मदात्यांचा आहे. अंबाच्या मातापित्यांचा जो पोटतिडकीचा दावा आहे, त्यापोटी काही पुरावेदेखील उपलब्ध आहेत. त्याची दखल घेऊन बाल कल्याण समितीने स्वतंत्र चौकशी केल्यास अंबाच्या घराबाहेर असण्यामागे काही अपरिहार्यता आहे का, याची खातरजमा केली जाऊ शकेल.