शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

तापाने फणफणतोय जिल्हा

By admin | Updated: September 22, 2014 23:11 IST

सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात ढग, उन्ह व पावसाचा खेळ सुरु असल्याने वातारवणात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ताप आजारांने प्रमाण वाढले आहे.

अमरावती : सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात ढग, उन्ह व पावसाचा खेळ सुरु असल्याने वातारवणात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ताप आजारांने प्रमाण वाढले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील चार आठवड्यातच तापाचे २५५१ रुग्ण दाखल झाले असूनही यामध्ये डेंग्यू, मलेरिया, निमोनिया व टायफाईड आजारांच्या रुग्णांचा समावेश आहे. याकडे आता आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. ताप व डायरियाची प्रतिबंध करण्याकरिता डास निर्मूलन व दूषित पाण्याचा वापर टाळणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच जिल्हा सामान्य रुग्णालयात तापाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जुलै महिन्यात १ हजारांच्यावर तापाचे रुग्ण दाखल झाले होते. दर दिवसाला ५० ते ६० रुग्ण नुसत्या ताप आजारांचे दाखल केले जात होते. हीच स्थिती पुढेही पहायला मिळत आहे. १८ ते १४ सप्टेंबरदरम्यान ही संख्या मोठ्या संख्येत वाढल्याचे दिसून येत आहे. या चार आठवडयामध्ये २५५१ तापाचे रुग्ण दाखल करण्यात आले आहे. आॅगस्ट मध्ये डेंग्युचे १३ रुग्ण आढळून आले होते. तेव्हापासून आजपर्यंत पुन्हा डेंग्युचे १५ रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्याचप्रमाणे १८ आॅगस्ट ते १४ सप्टेंबरपर्यंत टायफाईटचे १००९ रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे टायफाईडच्या रुग्णांमध्येही कमालीची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान मलेरियाचे १४८१, निमोनियाचे १६ व गॅस्ट्रोचे ( डायरिया) ३८० रुग्ण दाखल करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त तापाचे शेकडो रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल केले जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यावासी ताप आजारांने फणफणत आहे, असे चित्र आहे. अशा वातावरणामध्ये प्रत्येक घरात एक तापाचा रुग्ण आढळून येत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात तापाचा प्रभाव वाढता आहे.