शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पेट्रोल, डीझेल, गॅस दरवाढीने मोडले सर्व सामान्यांचे कंबरडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:17 IST

वरूड :- पेट्रोल, डीझेल, गॅस मध्ये सातत्याने होणारी दरवाढ हि सर्वसामान्यांना न परवडणारी आहे . महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे ...

वरूड :- पेट्रोल, डीझेल, गॅस मध्ये सातत्याने होणारी दरवाढ हि सर्वसामान्यांना न परवडणारी आहे . महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून अनेक कुटुंबे अर्धपोटीच राहून जीवन व्यतीत करीत आहे . महागाईने त्रस्त झालेल्या गोरगरीब, कष्टकरी सर्वसामान्य नागरिकांना एक दिवसाच्या मजुरीत केवळ तेलच खरेदी होते तर उर्वरित जीवनाश्यक वस्तू कश्या खरेदी कराव्या हा प्रश्न गोरगरिबांना पडला आहे . यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने महागाई कमी करण्याची मागणी केल्या जात आहे .

अच्छे दिन चे स्वप्न दाखवणा-या केंद्र सरकारच्या ध्येय-धोरणांनामुळे जनता त्रस्त झाली आहे. दोन वर्षांपासून पेट्रोल, डीझेलच्या किमती दिवसागणिक वाढत असल्याने शंभरी लाही शेंडी फोडली तर घरगुती गॅस च्या दरात सुद्धा मोठी वाढ करून अनुदानाची रक्कम कमी केली .

यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह, शेतकरी, शेतमजूर यांच्या खिशाला कात्री लागत आहे . पेट्रोल, डीझेल, गॅस मध्ये सातत्याने होणारी दरवाढ हि सर्वसामान्यांना न परवडणारी आहे . महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून अनेक कुटुंबे अर्धपोटीच राहून जीवन व्यतीत करीत आहे .. महागाईने त्रस्त झालेल्या गोरगरीब, कष्टकरी सर्वसामान्य नागरिकांना एक दिवसाच्या १०० ते २०० रुपये मोलमजुरीत केवळ १४० ते १५० रुपये लिटर चे तेलच खरेदी होते तर उर्वरित जीवनाश्यक वस्तू कश्या खरेदी कराव्या हा प्रश्न गोरगरिबांना पडला आहे .प्रत्येकाच्या बँक खात्याला १५ लाख रुपये देणारे सरकार रकुठे गेले हा प्रश्न पडला असून महागाईच्या भस्मासुरामुळे गोरगरिबांची मारावे कि जगावे हा प्रश्न पडला आहे .. एकीकडे हाताला काम तर दुसरीकडे पोट कसे भरावे हा प्रश्न असल्याने सर्वसामान्य नागरिकत्रस्त झाला आहे . पालेभाज्या सुद्धा ४० ते ६० रुपये किलो , डाळ १२० ते १४० रुपये किलो , शेंगदाणा ते २०० रुपये लिटर अश्या एक ना वस्तू महागल्या आहे . वाहतूकदारमध्ये सुद्धा हाच प्रश्न असून डिझेल ९० रुपये तर पेट्रोल १०४ रुपये असल्याने प्रवासा सह मालवाहतूकदारांनी दर वाढविले . याचा परिणाम सर्वसामान्य कुटुंबाना पडायला लागला आहे . परंतु केंद्र आणि राज्य सरकारचे याकडे दुर्लक्ष असून केवळ राजकीय पोळी शिकण्याचे प्रकार सुरु आहे . यामुळे लोकांनी निवडून दिलेले खासदार , आमदार , विरोधी पक्ष सुद्धा गप्प असून केवळ देखावा करणारे नाममात्र आंदोलन करून प्रसिद्धी करवून नागरिकांची दिशाभूल केल्या जाते . मात्र सर्व एकाच माळेचे मणी असून सत्तेची मुक्ताफळे चाखण्याकरिता मतदारांचा वापर करणे एवढाच उद्देश असल्याने सर्वसामान्य नागरिक या महागाईच्या भस्मासुराने त्रस्त झाला आहे .

* कुठे गेले विरोधक , नागरिकांचा सवाल ! .

पूर्वी विरोधक सत्ताधार्यांना वठणीवर आणण्याकरिता नांदोलने मोर्चे काढून महागाईपासून तर विविध प्रश्नावर आंदोलन करीत होते . मात्र स्वस्वार्थ जडल्याने प्रत्येक जण खुर्चीच्या मागे लागला आहे , विकासकामात भ्रष्टचा रवाढला असून निकृष्ट कामे उत्कृष्ट दाखविण्याचे प्रकार सुरु असतात . केवळ मतदारनचा छळ सुरु आहे . महागाईसह अनेक सार्वजनिक प्रश्नावर बोलण्यास कोणीही तयार होत नाही हि सर्वसामान्यांची शोकांतिका आहे . अलीकडे सेटिंग आंदोलनाचा प्रकार वाढीस लागला असल्याचे चित्र आहे . परंतु महागाई कोण कमी करणार विरोधक कि सत्ताधारी हा प्रश्न नागरिकांना पडला आहे .