शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठा विभागाकडे ९ कोटींसाठी तगादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:25 IST

अमरावती: उन्हाळ्यातील पाणी टंचाई निवारणासाठी उपाययोजना राबविणाऱ्या कंत्राटदारांना जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून ९ कोटीहून अधिक रक्कम मिळालेलीच नाही. ...

अमरावती: उन्हाळ्यातील पाणी टंचाई निवारणासाठी उपाययोजना राबविणाऱ्या कंत्राटदारांना जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून ९ कोटीहून अधिक रक्कम मिळालेलीच नाही. त्यांच्याकडून देयकांसाठी सतत तगादा लावला जात असल्याने प्रशासन निधी अभावी हतबल झाले आहे.

जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणी टंचाई निवारणार्थ जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून टंचाई आराखडा तयार केला जातो. या आराखड्यानुसार टंचाईग्रस्त गावांमध्ये टॅंकरने पाणी पुरवठा करणे, विंधन विहिरी, कूपनलिका घेणे, नळयोजनांची विशेष दुरुस्ती, खासगी विहिरींचे अधिग्रहण, तात्पुरत्या नळ योजना, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, विहीर खोलीकरण, गाळ काढणे, बुडक्या घेणे या उपाययोजना केल्या जातात.

सन २०१९-२० मध्ये टंचाई आराखड्यात सुचविलेली कोट्यवधींची कामे करण्यात आली. कामे करून वर्ष लोटले असताना संबंधित कंत्राटदारांना त्यांची देयके मिळालेली नाहीत. त्यांनी पाणी पुरवठा विभागाकडे थकीत देयकांसाठी तगादा लावला आहे. टंचाई कालावधीत करण्यात आलेल्या त्या कामांची देयके अदा करण्यासाठी पाणी पुरवठा विभागाने सुमारे ९ कोटी ७ लाख ३७ हजार रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. मात्र शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. परिणामी कंत्राटदारांकडून तगादा लावला जात आहे.

बॉक्स

यंदाच्या टंचाई पुढ्यात

एकीकडे गतवर्षी टंचाईची कामे होऊन देयके अदा करण्यासाठी निधी नाही. तर दुसरीकडे यंदाच्या उन्हाळयात पाणी टंचाई उपाययोजनांचे नियोजन होत असताना प्रशासन कचाट्यात अडकले आहे. गतवर्षीची देयके मिळाली नसल्याने यंदा कंत्राटदार पुढे येतील काय अशी भीती व्यक्त होत आहे.

बॉक्स

अशी आहे थकबाकीची रक्कम

टॅकरणे पाणी पुरवठा १.२० कोटी

विंधन विहिरी, कूपनलिका १.७५ कोटी

नळ योजनांची विशेष दुरुस्ती ४.४३

खासगी विहिरींचे अधिग्रहण १.२१ कोटी

तात्पुरती पूरक नळ योजना ४७.३० लाख

कोट

गतवर्षीच्या टंचाई आराखड्यानुसार केलेल्या कामांची देयके अदा करण्यासाठी शासनाकडे ९ कोटी रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. हा निधी शासनाकडून प्राप्त होताचा थकीत देयके अदा केली जातील.

राजेंद्र सावळकर

कार्यकारी अभियंता

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग