शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
2
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
3
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
4
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
5
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
6
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
7
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
8
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
9
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
10
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
11
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
12
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
13
मुझम्मिलचा जवळचा सहकारी मुस्तकीम सापडला; या कामासाठी ९ नोव्हेंबरला दिल्लीला आला होता, मोठा खुलासा
14
परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला ३ लाखात विकला BMC चा फुटपाथ; शिंदेसेनेच्या नेत्याचा अजब प्रताप
15
भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश
16
ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार...
17
बापरे! कूल वाटणारं कव्हर ठरू शकतं रिस्की; अचानक होईल स्मार्टफोनचा स्फोट, वेळीच व्हा सावध
18
Bihar Election Results: ओवेसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा ठरली भारी; बिहारमध्ये कामगिरी कशी?
19
...तर मी संन्यास घेईन; प्रशांत किशोरांनी केलेली घोषणा, आता आपले वचन पाळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

पेसा निधीत भ्रष्टाचार; ग्रामसेवकांना अभय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 22:23 IST

मेळघाटातील आदिवासी जनतेचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी शासनाने पेसा अंतर्गत कोट्यवधीचा निधी ग्रामपंचायत स्तरावर थेट हस्तांतरित केला. संबंधित ग्रामसेवकांनी नियमांचे पालन न करता विविध प्रकारचे साहित्य मनमानी पद्धतीने खरेदी करून लाखो रुपयांची अफरातफर केली आहे.

ठळक मुद्देसावलीखेडा ग्रामपंचायत : सीईओंचे मौन

श्यामकांत पाण्डेय।लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : मेळघाटातील आदिवासी जनतेचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी शासनाने पेसा अंतर्गत कोट्यवधीचा निधी ग्रामपंचायत स्तरावर थेट हस्तांतरित केला. संबंधित ग्रामसेवकांनी नियमांचे पालन न करता विविध प्रकारचे साहित्य मनमानी पद्धतीने खरेदी करून लाखो रुपयांची अफरातफर केली आहे. या गंभीर प्रकरणाला ‘लोकमत’ने वाचा फोडली. पंचायत समितीचे सभापती रोहित राजकुमार पटेल यांचे या प्रकरणात नवनीवन खुलासे होत आहेत. तरीदेखील धडक कारवाईचा अद्याप पत्ताच नाही. प्रशासन ग्रामसेवकांना पाठीशी घालत आहे का, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.सभापती रोहित पटेल यांनी सावलीखेडा ग्रामपंचायत अंतर्गत पेसा निधीतून अंगणवाडी साहित्य खरेदीचे प्रकरण सप्रमाण उचलून धरले आहे. जवळपास नऊ प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात आले. एका अंगणवाडी केंद्रात सरासरी दीड लाख रुपयांचे तफावतीचे देयक ग्रामसेवकांनी काढले. सावलीखेडा ग्रामपंचायत अंतर्गत चार अंगणवाडी केंद्रांमध्ये एकाच प्रकारचे साहित्य खरेदी करून सहा लाख रुपयांची अफरातफर करण्यात आल्याची तक्रार रोहित पटेल यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्याकडे केली होती.दोन आठवडे लोटूनही या तक्रारीच्या अनुषंगाने अद्याप या गंभीर प्रकरणाकडे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काहीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे सदर ग्रामसेवकाला प्रशासन पाठीशी घालत तर नाही ना, अशी चर्चा मेळघाटात नागरिकांमध्ये होत आहे. तक्रारीवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नसल्यामुळे पंचायत समिती सभापती रोहित पटेल यांनी याप्रकरणी पुन्हा नव्याने तक्रार करण्याची तयारी चालविली आहे.कोणतेही जिल्ह्यातील अधिकारी रुजू होताच मेळघाटातील आदिवासींचे समस्या प्रकषार्ने निकाली काढण्याचे आश्वासन देऊन प्रसिद्धी माध्यमांना आपलेसे करून घेतात. परंतु, कालांतराने असे प्रकरण समोर आले असताना त्यांच्याकडून कारवाईमध्ये सातत्य जाणवत नाही. यामुळे अशा अधिकाºयांकडून मेळघाटातील विकास साध्य होण्याची स्वप्न भंगले आहे.इतर क्षेत्रातील भ्रष्टाचाराची होणार का चौकशी?सावलीखेडा ग्रामपंचायत अंतर्गत सहा लाख रुपयांच्या निधीचा केवळ पेसा अंतर्गत घोळ झालेला असताना, कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संबंधित ग्रामसेवकाने पेसाव्यतिरिक्त अन्य निधीमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याची चर्चा आता सुरू झाली. जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.