शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
5
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
6
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
7
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
8
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
9
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
10
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
11
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
12
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
13
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
14
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
15
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
17
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
18
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
19
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"

दीपाली चव्हाण यांचा मृत्युनंतरही छळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:12 IST

अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येची तपासणी करण्यासाठी वनविभागाने समांतर समिती गठित केली आहे. दीपाली यांनी ...

अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येची तपासणी करण्यासाठी वनविभागाने समांतर समिती गठित केली आहे. दीपाली यांनी आत्महत्येपूर्वी चार पानी सुसाईड नोट लिहून ठेवले असताना यासंदर्भात कारणमीमांसा न शोधता ही समिती तिच्या आत्महत्येवरच प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे. त्यामुळे या समितीला कायदेशीर आधार आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक पी. साईप्रसाद यांनी ३१ मार्च रोजी दीपाली यांच्या मृत्यूप्रकरणी तपासणी करण्यासाठी नऊ सदस्यीय समिती गठित केली आहे. यात पाच आयएफएस अधिकारी, एक आरएफओ, एक एसीएफ, एक सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी, एक स्थानिक स्वयंसेवी संस्थेच्या सदस्याचा समावेश आहे. त्याकरिता १६ मुद्द्यांवर या समितीला दोन महिन्यांत चौकशीअंती निकषाच्या आधारे स्वंयस्पष्ट अहवाल वरिष्ठांना सादर करावा लागणार आहे. पीसीसीएफ साईप्रकाश यांनी दिलेले १६ मुद्दे म्हणजे आरोपी विनोद शिवकुमार आणि निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येते. या समितीच्या तपासणीला कोणताच कायदेशीर आधार नाही. वनविभागाच्या या तपासणी समितीत सेवानिवृत्त न्यायाधीश, सरकारी वकील, सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी अथवा प्रसिद्ध कायदेतज्ज्ञांचा समावेश नाही. त्यामुळे वनविभागाला ही तपासणी समिती गठित करून नेमके काय साध्य करायचे आहे, हेच कळत नाही. दीपाली यांनी २५ मार्च रोजी कशामुळे आत्महत्या केली, याची कारणमीमांसा शाेधण्याऐवजी ही समिती कनिष्ठ वनकर्मचाऱ्यांना विचारपूस करून बयाण नोंदवित आहे. खरे तर आयएफएस अधिकाऱ्यांपुढे कनिष्ठ वनकर्मचारी उभे राहू शकत नाही, ते काय विनोद शिवकुमार, एम.एस. रेड्डी यांच्या जाचाबद्दल बोलतील, हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे ही समिती म्हणजे आरोपी असलेल्या आयएफएस अधिकाऱ्यांना ‘क्लिनचिट’ देण्यासाठी गठित केल्याचा सूर आता वनविभागात उमटू लागला आहे. अमरावती येथील सहायक वनसंरक्षक ज्योती पवार, वनपरिक्षेत्राधिकारी विजया ठाकरे (कोकाटे) या समितीत असल्या तरी आयएफएस लॉबीमुळे त्यांना देखील मर्यादा असणार आहे.

---------------

आरोपींची तपासणीऐवजी वनकर्मचाऱ्यांनाच नाहक त्रास

दीपाली यांच्या मृत्यू प्रकरणाची वनविभागाने गठित केलेली समांतर तपासणी चौकशी समिती ११ व १२ मार्च रोजी जिल्हा दौऱ्यावर आहे. अमरावतीसह मेळघाटात जाऊन या समितीने तपास चालविला आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद शिवकुमार, निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांना बायपास करून नेमका तपास कशाचा, कुणाचा करीत आहे. हेच कळायला मार्ग नाही. वनकर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविणे, दीपाली यांची वागणूक, अतिक्रमण, पुनर्वसन हे तपासाचे मुद्दे असूच शकत नाही. त्यामुळे ही तपासणी समिती दीपाली यांच्या सुसाईड नोटला बोगस तर ठरवित नाही ना, अशी शंका येत आहे.