शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

जि.प.तील बदल्यांच्या राजकारणाला पूर्णविराम

By admin | Updated: May 22, 2014 00:43 IST

जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील कर्मचार्‍यांच्या बदल्यांसाठी

अमरावती : जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील कर्मचार्‍यांच्या बदल्यांसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापतीसाठी असणारा कोटा यावर्षी शासनाने रद्द केला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे काही पदाधिकार्‍यांकडे बदल्यांसाठी भरणारा बाजार बंद होणार आहे. दरम्यान या निर्णयामुळे पदाधिकार्‍यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या बहुतांश सदस्यांना आपल्या भागातील विकास कामांपेक्षा अन्य कामांतच अधिक छंद असतो. त्यामध्ये बदल्यांचा विषय तर काहीच्या जिव्हाळय़ाचा विषय असतो. बदल्यांची प्रक्रिया मार्चपासून सुरु होते. पण यावेळी आचाससंहितेमुळे ती आता सुरु झाली आहे. यावर्षी शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार नाही. त्यामुळे राहिलेल्या कर्मचार्‍यांमध्ये बदलीस पात्र असणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या निश्‍चित केली आहे.

कर्मचार्‍यांच्या बदल्या ही पूर्णपणे प्रशासकीय बाब मानली जाते, तरीही यात अधिकार्‍यांपेक्षा पदाधिकारी आणि सदस्य यांनाच अधिक रस असतो. प्रशासनप्रमुख कडक असतील तर ते पदाधिकारी किंवा सदस्य यांना फारशी किंमत न देता थेट आपल्या पातळीवर पारदश्रीपणे ही प्रक्रिया पार पाडतात. यातून अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असते. हा प्रकार टाळण्यासाठी शासनाने जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापतींसाठी बदल्यांचे काही अधिकार दिले होते.

सर्वसाधारण बदल्या झाल्यानंतर एक महिन्याने जिल्हा परिषद अध्यक्षांना सर्व संवर्ग मिळून २0 बदल्या करण्याचे अधिकार होते. तक्रारी किंवा विनंतीच्या आधारे वर्षभरात केव्हाही बदलीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे बदलीची शिफारस केल्यास मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी संबंधितांची रिक्त पदावर बदलीचे आदेश निर्गमित करण्यात येत होते. यातही तालुक्यात जास्तीत जास्त तीन बदल्या करण्याचे अधिकार अध्यक्षांना होते. तसेच पंचायत समिती सभापतींनाही १0 बदल्या करण्याचे अधिकार होते. यामध्ये गटविकास अधिकारी आदेश निर्गमित करत असत, त्यामुळे प्रशासकीय बदली होत नसलेले कर्मचारी, पदाधिकारी किंवा सदस्यांना आपसी बदली करण्यासाठी पैसे उतळत असत. यावर्षी शासनाने बदलीचा पदाधिकार्‍यांना दिलेला कोटाच रद्द केला आहे. त्यामुळे बदलींसाठी पदाधिकार्‍यांच्या दालनातील गर्दी कमी होणार आहे.